साखर खाल्लेला माणूस

साखर खाल्लेला माणूस हे नाटक प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांचे आहे, त्यावर मी आधी इंग्रजीत(का कोणास ठाऊक!) लिहिले होते. जुलै २०१७ मध्ये पाहिले होते आणि त्याच वेळी लिहिले होते. मराठीत देखील लिहायला सुरुवात केली होती, पण अर्धवट राहिले होते, कच्चा खर्डा तसाच पडला होता. परवा नजरेस पडला. तो पूर्ण करून आज इथे देतो आहे.

नाटकांबद्दल मी माझ्या ब्लॉग वर नेहमीच लिहीत आलो आहे. आज परत योग आला आहे, तेही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर मध्ये पाहिलेल्या नाटकाबद्दल. कित्येक दिवसांनी मी बालगंधर्व मध्ये नाटक पहिले. पूर्वी मी तेथे खुपदा नाटकं पहायचो. नुकतेच बालगंधर्व रंगमंदिर सुरु होऊन गेल्याला ५० वर्षे झाली(सुवर्ण महोत्सवी वर्ष). त्यानिमित्ताने त्याचे नुतनीकरण केले गेल्याचे मी ऐकले होते. तेही पाहायचे राहिले होतेच. तर मी पहिले ते नाटक म्हणजे सध्या गाजत असलेले साखर खाल्लेला माणूस. प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक. दोघेही माझे आवडते कलाकार. शुभांगी गोखले यांची नाटके मी पूर्वी पाहिलेली नाहीत. पण प्रशांत दामलेची तर मी कित्येक नाटके पहिले आहेत. प्रशांत दामलेची रेकॉर्ड असलेली एकाच दिवशी पाच नाटकांचे पाठोपाठ प्रयोग या बालगंधर्व मध्येच होते, त्यावेळेस त्याचे चार दिवस प्रेमाचे हे नाटक पाहिले होते.

साखर खाल्लेला माणूस हे त्याचे नवे नाटक येऊनही बरेच दिवस झाले. आता तर ते नाटक लंडन वारी देखील करून आले आहे. आपण सगळे जण लहानपणी एक कविता वाचली असते ज्याची सुरुवात “ Johnny, Johnny..Yes, Papa, eating sugar? No, Papa!”. मला माहित आहे की, ब्लॉगचे शीर्षक “साखर खाल्लेला माणूस” असे आहे, मुलगा नाही. असो. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मला बर्‍याच काळाने नाटक पहायची संधी मिळाली. पूर्वी मी तिथे नेहमीच नाटकं बघायचो. हे थिएटर आपले 50 वे वर्ष साजरे करीत आहे. खुद्द बालगंधर्वांनीच नाट्यगृहाची पायाभरणी केली होती. गेल्या महिन्यात 5 दिवसाचा उत्सव आयोजित केला होता, ज्याला मी भेट देऊ शकलो नव्हतो.

तर ह्या नाटकात प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दोघेही माझे आवडते अभिनेते आहेत. मी पूर्वी शुभांगी गोखलेचे कुठले नाटक पाहिलेले आठवत नव्हते; तिने स्टेजवर फारसे काम केलेले नाही (पण तिने काम केलेले श्रीयुत गंगाधर टिपरे किंवा अग्निहोत्र ह्या मालिका मला आवडायच्या आणि तिचे काम देखील). यापूर्वी मी प्रशांत दामलेची बरीच नाटके बर्‍याचदा पाहिले आहेत. मी काही वर्षांपूर्वी एकाच दिवशी पाच नाटकांतून त्याला लिम्कामध्ये विक्रमी कामगिरी करताना देखील पाहिले आहे. त्याची स्वतःची वेबसाइट आहे आणि खरं तर मी त्या वेबसाइटवरच या नाटकासाठी तिकिटे बुक केली आहेत. हे नाटक गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. खरं तर, नुकतीच नुकतीच ती लंडनमध्येही गेली होती. या नाटकाची जाहिरात शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी म्हणून केली जाते. हे नाटक शुगर कोटेड तसेच ब्लॅक कॉमेडी देखील नाही. त्यामध्ये प्रशांत दामले असतील तेव्हा हा विनोद नक्कीच कसा आहे हा विनोद नाही. पण मधुमेहाच्या रोगाने ग्रस्त अशा मध्यमवयीन व्यक्तीवर एक विनोदी भाष्य आहे.

मला अशाच थीमवर खूप काळापूर्वी नाटक (वाजे पाउल आपले) पाहिल्याचे आठवले. त्या नाटकात मध्यमवयीन व्यक्तीला हृदयरोग होण्याचे आणि त्याच्याशी कसा सामना करायचा हे दाखवले गेले होते. मला वाटते की हे पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन नावाच्या मंडळाने आयोजित केले होते आणि मुख्य कलाकार दिलीप वेंगुर्लेकर होते. विख्यात मराठी लेखक विश्राम बेडेकर यांनी हे लिहिलेले (Norman Barasch and Caroll Moore यांचे इंग्रजी नाटक Send Me No Flowers वर बेतलेले होते). साखर खाल्लेला माणूस  हे उच्च मध्यमवर्गीय कुटूंबातील नाटक आहे, जिथे एका खाजगी विमा कंपनीत वरिष्ठ कार्यकारी असलेला मध्यमवयीन पतीला, एक दिवस मधुमेह झाल्याचे समजते. मग त्याची नेहमीच काळजी घेणारी पत्नी आणि कुटुंबातील इतर लोक थोडे जास्तीच संवेदनशील होतात आणि टोकाच्या प्रतिक्रिया देत त्याचे जगणे हैराण करतात. हे नाटक प्रेक्षकांना हास्याच्या सागरात डुबक्या मारून आणते,  याचे कारण अनेक प्रेक्षक देखील स्वतःच्या जीवनात ह्याच परिस्थितीतून जात असतात.

प्रशांत दामले त्याच्या अभिनयामुळे प्रसंगानुरूप विनोद निर्माण करण्यात, अचूक टायमिंग, आणि सहकलाकारांबरोबर असलेले tuning या मुले बहार आणतो. या नाटकातील पात्र साकारताना या सर्व गोष्टी करण्याची त्याला पूर्ण संधी आहे. त्याची सहकलाकार शुभांगी गोखलेही त्याची उत्तम साथ करतात. हे एक वेगवान नाटक आहे, प्रेक्षकांना श्वास  उसंत देखील देत नाही. या जोडप्याच्या मुलीचे प्रेम प्रकरण या नाटकाची आणखी एक बाजू आहे. वडीलांचे मुलीशी असलेले नात्याचेही छान सादरीकरण केले आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये तयार झालेल्या विनोदामुळे आणि कलाकारांमधील ऊर्जेमुळे प्रेक्षक खुर्चीवर अडकून राहतात. प्रशांतला गाण्याची आवड आहे, त्याने या नाटकातही गायले आहे. एक छोटीशी चूक मला लक्षात आली ती म्हणजे तो संवादाच्या वेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)चे ‘जिदंगीके साथ, जिंदगीके बाद’ ह्या घोषवाक्याचा संदर्भ येतो. हे घोषवाक्य एलआयसीचे आहे, कुठल्या खाजगी विमा कंपनीचे नाही.

आम्ही थिएटर जवळ जंगली महाराज रस्त्याच्या नुकत्याच नूतनीकरण केलेल्या भागात(smart city प्रकल्पाच्या अंतर्गत) चक्कर मारली. दिवसभर पाऊस पडत होता. या नवीन ओल्या रस्त्याने संध्याकाळी चालताना मस्त वाटत होते. रस्त्याचा नूतनीकरण केलेला विभाग बर्‍याच मोठा आहे. आशा आहे की हे असेच राहील. असो, नाटकाकडे परत येतो . मी प्रशांतच्या दुसर्‍या नाटकाबद्दल ब्लॉग लिहिला आहे (कार्टी काळजात घुसली). जरूर पहा आणि प्रतिक्रिया कळवा!

गोहराबाई कर्नाटकी -शंभरी गाठलेली गायक-नटी

मी गोहराबाई कर्नाटकी यांच्या वरील २००९ मधील मूळ कन्नड लेख, जो डॉक्टर रहमत तरीकेरी यांनी लिहिला होता. त्याचा २००९ मध्येच अनुवाद केला होता तो आज मी येथे देत आहे.

अपूर्व नाट्य अभिनेत्री, गायिका गोहराबाई कर्नाटकी यांच्या निधनानंतरसुद्धा, त्यांना त्यांच्या
प्रतिभेनुसार गौरव प्राप्त झाला नाही. गोहराबाई (१९१०-१९६७) ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष
आहे; तर त्यांची आठवण ही कोणास राहिलेली दिसत नाही.

बेळगीच्या भगिनी
अमीरबाई कर्नाटकी आणि गोहराबाई कर्नाटकी या दोघी बहिणी विसाव्या शतकाच्या
सुरुवातीला नावाजलेल्या गायक-नट्या होत्या. मी अमीरबाई ह्यांचे जीवनचरित्र लिहिले होते.
त्यासाठी मी त्यांचा परिचय असलेल्या व्यक्तींकडे शोध घेत बेलाडी, धारवाड, हुबळी, विजापूर,
पुणे आणि मुंबईपर्यंत गेलो होतो. मुंबईमध्ये अमीरबाईंच्या गायकीचे अभ्यासक आणि
हिंदुस्तानी संगीताचे जाणकार प्रकाश सी बुरडे ह्यांच्याबरोबर चर्चा करायची होती. ते
अमीरबाईंबद्दल आत्मीयतेने बोलले. गोहराबाईंबद्दल बोलताना मात्र त्यांची जीभ कडवट
झाली. गोहराबाईंबद्दल काही मराठी लोकांत अनादर दिसून आला होता. मी प्रकाश यांना परत
परत विचारले असता त्यांनी लिहिलेले लेख मला वाचायला दिले. त्याचा शेवटचा भाग असा
होता:

goharabai on right side with amirbai

गोहरबाई आणि अमीरबाई कर्नाटकी

‘प्रतिगंधर्व अशी प्रसिद्धी मिळालेल्या गोहराबाईंना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आणि
ऐकलेल्या बालगंधर्वांच्या प्रेक्षकांनी आणि हितचिंतकांनी, गोहराबाईंकडे पूर्ण दुर्लक्ष का केले
असावे? गोहराबाई कर्नाटकच्या होत्या म्हणून की मुस्लिम होत्या म्हणून? की त्यांनी अमाप
कीर्ती मिळवून, चित्रपटांत भूमिका करून, दिवसरात्र बालगंधर्वांच्या बरोबर तीस वर्षे
सावलीसारखी सोबत केली म्हणून?’
बुरडे स्वत: कन्नड आहेत(ते नुकतेच मरण पावले). त्यांनी प्रगट केलेली व्यथाश मला बोचून गेली. कन्नड रंगभूमीवरून आलेल्या कलाकारांनी मराठी रंगभूमीवर आपले जीवन अर्पण करूनसुद्धा त्यांना मराठी
लोकांनी आपलेसे का केले नाही, याचे मला कुतूहल वाटू लागले. गतकाळाचा शोध घेता घेता,
तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि रंगभूमी यांचे अवलोकन केले असता, किती प्रतिकूल
परिस्थितीमध्ये, गोहराबाई यांची प्रतिभा, त्यांची महत्त्वाकांक्षा, हट्ट समजून घेतले गेले?
महादेवीअक्का यांच्याप्रमाणे, स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परिस्थितीचा सामना
करण्यामध्ये गोहराबाईंचे आयुष्य खर्ची झाले. त्यांच्या ह्या स्वभावामुळे गोहराबाईंनी एकेवेळ
कीर्ती भोगली पण नंतर त्यांना वाईट दिवस पाहवे लागले!

अनेक गोहर
गोहर नावाच्या अनेक जणी कलाक्षेत्रात होऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ, म्हैसूर दरबारात
हिंदुस्तानी संगीत गाणारी कोलकात्याची गोहरजान(१८७३-१९३०); पारशी रंगभूमीवरील कलाकार

गोहरजान; मुंबईच्या रणजित फिल्म्स स्टुडिओच्या गायक-नटी गोहर ह्या पहिल्या आणि
गोहराबाई कर्नाटकी हे नाव सांगणा-या कर्नाटकाची कन्या त्याच. या गोहराबाई केवळ रंगभूमी
कलाकार नव्हत्या तर हिंदुस्तानी पद्धतीच्या संगीत-गायक कलाकारही होत्या. त्या अमीरबाई
ह्यांच्यासारख्या सुंदर नव्हत्या, पण तीक्ष्ण कटाक्ष असलेले डोळे हे त्यांचे आकर्षण होते. ह्या
दोन बेलागी भगिनींपैकी अमीरबाई अधिक प्रसिद्धी पावल्या, कारण त्या चित्रपटासारख्या
प्रभावी आणि प्रसिद्ध माध्यमात काम करत होत्या. उलट, गोहराबाई चित्रपटांइतके प्रभावी
माध्यम नसलेल्या प्रादेशिक रंगभूमीमध्ये गुरफटून गेल्या. आणि मराठी रंगभूमीवर दंतकथा
झालेल्या नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व ह्यांच्यावर बसलेले त्यांचे प्रेम. बालगंधर्वांचे
अनुकरण करून, गंधर्व कंपनीमध्ये शिरून, शेवटी, त्या बालगंधर्वांच्या जीवनसाथी बनल्या.
त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक रोमांचकारी घटना घडल्या; तसेच, अनेक अपमानित करणारे,
दुःखी करणारे प्रसंग येऊन गेले. ती आणखी दुसरीच शोकात्म कथा आहे.

कलेसाठी पूरक परिसर
त्या काळच्या मुंबई प्रांताचा भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यातील बेलागीमध्ये गोहराबाई
जन्मल्या. त्यांचे वडील हसैनसाब बेलागी स्वतः रंगभूमी कलाकार होते. त्यांची स्वतःची नाटक
कंपनी होती. ती फार काळ चालली नाही. नाट्यसंगीतात चांगले नाव कमावलेले बेऊरचे
बादशाह मास्तर हे गोहराबाईंचे सख्खे मामा होते. ज्येष्ठ रंगभूमी कलाकार येलागी बाळप्पा
बादशाह मास्तरांचे शिष्य. त्या वेळच्या प्रभावशाली असलेल्या बुवा बादशाह मास्तर यांनी
त्यांच्या भाचीला शिक्षण दिले असण्याची शक्यता आहे. गोहराबाई बेलागीच्या कलाक्षेत्रात
प्रसिद्धी पावण्यासाठी अजून एक कारण असे, की त्यावेळी विजापूरच्या आसपास रंगभूमी
बहराला आलेली होती. शिव्मुर्थी कान्बुर्गी मठ, गरुड सदाशिवराव, शिर्हत्ती व्यीन्कोबाराई,
वामनराव ह्यांच्यासारखे लोक त्यांच्या त्यांच्या नाटक कंपन्यांमधून सर्वत्र पसरले होते. त्या
बरोबर विजापूरच्या लोकरंगभूमीवर जन्म पावलेल्या कृष्ण-पारिजात मध्ये बहुतांशी मुस्लिम
कलाकार काम करत होते. लोककवी आणि गायक तालेवादादा नबी त्यांच्या राधेच्या
नाटकामुळे ख्यातनाम झाले होते. पुढे कृष्ण-पारिजात च्या गाण्यांसाठी अप्पालाल नंदाघर
आले. बेलागीच्या भगिनींच्या गाण्याच्या प्रभावाखाली सर्वं कलाकार गात होते.

कन्नड रंगभूमी
अशा परिसरामध्ये गोहराबाईंचा ठसा उमटत गेला. गोहराबाईंचे कलाजीवनसुद्धा त्यांच्या
भगिनी अमीरबाई ह्यांच्याप्रमाणे, कन्नड रंगभूमीपासून सुरू झाले. गोहराबाईंनी गदगच्या
यारासी भाराम्प्पा ह्यांच्या वाणिविलास संगीत नाटक मंडळीमध्ये गायक-नटी म्हणून आपले
जीवन सुरू केले. वाणिविलास कंपनीच्या कित्तूर रुद्रम्मा नाटकात त्या रुद्रम्माची भूमिका
करत. त्या नंतर त्यांनी कुंदगोळ हणमंतराय यांच्या कंपनीमध्ये सुद्धा काम केले असावे.
गोहर यांचा अभिनय पाहिलेले हुबळीचे ज्येष्ठ अभिनेते वसंत कुलकर्णी यांच्याप्रमाणे कुंदगोळ
केव्हाही गोहर यांनाच नाटकात घ्यायचे. त्यांच्या वरप्रदान नाटकातील ललिता या पात्रामुळे
त्यांची ओळख झाली. विजयनगर राज्याची कथावस्तू असलेल्या वरप्रदान नाटकात ललिताचे

पात्र गोध्चारिणीचे होते. गोहर ह्यांचा त्या वेळेस रंगभूमीवर काम करणा-या मल्लिकार्जुन
मन्सूर आणि बसवराज मन्सूर ह्यांच्याबरोबर परिचय होता. त्यांनी बसवराज मन्सूर यांच्या
कलाप्रकाश नाट्यसंघ कंपनी मध्येसुद्धा काम केल्याचे दिसून येते. म्हैसूरच्या पद्मा श्रीराम
ह्यांच्या आठवणीप्रमाणे, गोकाकच्या एका कंपनीच्या मानमती नाटकात गोहरने मानमतीचे
काम केले होते. त्या मोठ्या आवाजात संवाद म्हणायच्या.

कन्नड नाट्यगीते
त्यांचे रंगभूमीवरील काम पाहिलेले कोणी राहिलेले नाही. आढळतात ती फक्त त्यांनी गायलेली
रंगभूमीवरील गाणी. कित्तूर रुद्रम्मा नाटकातल्या ‘ना पेलुवे निनोगोडूपाया तारावाल्ली नेनागे
अपमान मारुली आत्महत्यीडू महापाप्वे’ ह्यासारखे गीत हे त्यातलेच. एचएमव्ही कंपनीने
काढलेले, ७८ आरपीएम मुद्रिकेमध्ये असलेले त्यांचे गीत लोकप्रिय झाले होते. हे गीत त्यांच्या
गायकीची साक्ष आहे. गोहर कन्नड नाट्यगीते अदभुत रीतीने गायच्या. गोहर यांनी
कन्नडमध्ये अजून कितीतरी गीते गायली असण्याची शक्यता आहे. त्या बालगंधर्वांच्या
शैलीमध्ये गायच्या.

मराठी रंगभूमीशी संपर्क
उत्तर कर्नाटकात त्या वेळेला मराठी रंगभूमीचे आकर्षण होते. ह्यास अनेक कारणे होती:
१. विजापूर जिल्ह्यापर्यंतचा भाग त्या वेळी मुंबई प्रांतात सामील होता. त्यास मुंबई-कर्नाटक
असे म्हटले जायचे. (काही जण त्यास दक्षिण महाराष्ट्र असे म्हणतात). ह्यामुळे उत्तर
कर्नाटकातील नाट्यकलाकार, चित्रपट कलाकार, संगीतकार, अभ्यासक यांचा जास्त संपर्क
पूर्वीच्या म्हैसूर राज्याच्या ऐवजी पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या गावांबरोबर सहज येई.
गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बसवराज राजगुरू, कुमार गंधर्व
ह्यांच्यासारखे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकही विजापूर परिसरात उत्कर्ष पावले आणि ते जास्तीत
जास्त कार्यक्रम त्याच भागात करत होते. कन्नड भाषेतील चित्रपट म्हैसूर-कर्नाटकात तयार
होत परंतु त्यांचे केंद्र मात्र मद्रास आणि कोईमतूर या ठिकाणी होते. म्हैसूरचे चित्रपट आणि
नाटक या क्षेत्रामध्ये कर्नाटक शास्त्रीय संगीत प्रभावी होते, तिथे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकांना
जास्त संधी नव्हत्या. उत्तर कर्नाटकातील हिंदू-मुस्लिम संस्कृतीमधून तयार झालेल्या, संगीत
रंगभूमी आणि लोकसंगीतातून तयार झालेल्या इथल्या कलाकारांचे दक्षिण कर्नाटकातील
रंगभूमी आणि चित्रपटांबरोबर एवढे जमले नाही, त्यामुळे हे कलाकार त्यांची सांस्कृतिक आणि
भाषिक जवळीक असलेल्या हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांकडे आकर्षले गेले. त्यामुळेच ह्या
भागातल्या व्ही. शांताराम, शांता हुबळीकर, लीला चिटणीस, सुमन कल्याणपूर, लीना
चंदावरकर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी मुंबईकडे धाव घेतली. तीच वाट बेलागीच्या
भगिनींनी चोखाळली.
२. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर कर्नाटकातील नाटक कंपन्या मराठी नाटक कंपन्यांकडे
पाहून उत्कर्ष पावल्या. स्वतः गोहरबाई काम करत असलेली यारासी भाराम्प्पाअन्च्यी कंपनी

मराठी नाटके कन्नडमध्ये अनुवाद करून बसवत असे. त्याच काळात वामनरावांची विश्वदर्श
कंपनीसुद्धा मराठी नाटकांचे अनुवाद करून प्रयोग बसवत होती. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या
गाण्यांच्या धाटणीवर कन्नड नाट्यगीते गाणे ही बाब सर्वसामान्य समजली जाई.
त्याचबरोबर, मराठी नाटक कंपन्या विजापूर, बेळगाव, हुबळी-धारवाड या भागात दौरे
करायच्या. त्यांचासुद्धा दीर्घ इतिहास आहे. तो एकोणिसाव्या शतकात किर्लोस्कर
कंपनीपासून आरंभ झाला. अण्णासाहेब किर्लोस्कर मूळचे कर्नाटकाचे. त्यांनी मराठी रंगभूमी
निर्माण केली कर्नाटकात, तीच मुळी कन्नड रंगभूमीच्या प्रभावामुळे. त्यांची कंपनी उत्तर
कर्नाटकात मुक्काम ठोकून असे. इतर मराठी नाटक कंपन्यासुद्धा तिथे मुक्काम करायच्या.
पुढे, बालगंधर्वांची नाटक कंपनीही त्या भागात दौ-यावर येत असे. ह्या नाटक कंपन्या मराठी
तसेच कन्नड भाषिकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होत्या. गंधर्व कंपनीचे हुबळीच्या सिद्धारूढ
मठाबरोबर जवळचे संबंध होते. सुरुवातीच्या कन्नड नाटककारांपैकी रामचंद्र यांचे ‘जेथे पाहवे
तेथे मराठी कलाकारांचे अस्तित्त्व होते’ हे मराठी रंगभूमीच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दलचे वाक्य
या गोष्टीचे प्रमाण आहे. गोहर ह्यांच्यासारख्या स्थानिक प्रतिभावंत कलाकाराचा मराठी
रंगभूमीवरील प्रवेश या परिस्थितीमध्ये झाला.

चित्रपट कलाकार गोहर
गोहर यांनी मराठी नाटक कंपनीमध्ये जाण्यापूर्वी हिंदी चित्रपटांमधून काम केले.
त्या १९३२च्या सुमारास मुंबईला गेल्या. गोहरयांना चित्रपटांमधून काम करायला सांगणारे होते
कृष्णराव चोणकर. ते गंधर्व नाटक कंपनीमध्ये नट होते. कृष्णराव चोणकर यांनी गोहरयांना
चित्रपटविश्वाची नुसती ओळख करून दिली नाही तर त्यांनी स्वतः तिच्याबरोबर काम केले.
शारदा फिल्म्स कंपनीचा रास्विलास हा गोहर यांचा पहिला चित्रपट. गोहर यांनी नानुभाई
वकील यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमधून अधिक काम केले. त्यांचा उल्लेख त्या वेळेला
महिन्याला तीनशे रुपये मिळवणारी गाणारी नटी असा आढळतो. त्यांनी सुमारे पंधरा
चित्रपटांमधून काम केले. उदाहरणार्थ, रास्विलास(१९३३), राम्भारांनी(१९३३), गरीब का
प्यार(१९३५), बुर्खावली(१९३६), गीला निशान(१९३७), सिंहलद्वीप की सुंदरी(१९३७),
गुरुघांटाल, काला भूत, कुलदीपक, तारणहार. हे चित्रपट फार महत्त्वाचे नाहीत. त्यानंतर
बालगंधर्व यांच्याकडे आकृष्ट झाल्यामुळे गोहर यांनी चित्रपटसृष्टीला राम-राम केला आणि
मराठी रंगभूमीवर प्रवेश केला.

गोहर गायिका झाल्या
गोहर लहानपणापासून बालगंधर्वांच्या गायनाकडे आकर्षल्या गेल्या होत्या. विजापूरमध्ये जेव्हा
गंधर्व कंपनी मुक्काम करत असे, तेव्हा गंधर्वांची गाणी ऐकून त्यांच्या मनात बालगंधंर्वांबद्दल
सुप्त आकर्षण होऊ लागले. त्यावेळेला बालगंधर्वांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका कोलंबिया
कंपनीने काढल्या. गोहर त्या ऐकून त्यांच्या शैलीत गाण्याचे शिकल्या. अनागी बालप्पासुद्धा
म्हणतात, की गोहर बालगंधर्वांचे अनुकरण करून गायच्या. त्यामुळे मराठी लोकांनी त्यांना
प्रतिगंधर्व असे नामाभिधान देऊन टाकले होते. पुढे, त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका

एचएमव्ही कंपनीने काढल्या. त्यांचे 'वैकुण्गचार्या' नावाचे सुरुवातीचे नाट्यगीत प्रसिद्ध
झाले होते. गोहर यांनी मराठी, बंगालीमध्ये गायलेली पट्टी खूप जास्त असे.

गंधर्वांप्रती वेड
पुढे, गोहर यांच्या जीवनातील मुख्य ध्येय गंधर्व कंपनीमध्ये जाणे हेच झाले. त्यासाठी त्यांनी
केलेले प्रयत्न कुतूहल जागवणारे आहेत. त्या १९३२-३४च्या अवधीत दररोज रात्री गंधर्व
कंपनीच्या नाटकांना जाऊन पहिल्या रांगेत बसायच्या. नाटकांच्या मध्यंतरात गंधर्वांची भेट
घेण्याचा प्रयत्न करायच्या. शेवटी, त्या गंधर्व कंपनीत शिरल्या. त्या गंधर्व कंपनीत कशा
शिरल्या याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत:
१. विजापूरमध्ये त्यांचा मुक्काम सोडण्याआधी बालगंधर्वांनी गोहर यांची प्रतिभा ओळखून,
त्यांना कंपनीमध्ये बोलावून घेतले.
२. विजापूरच्या प्रसिद्ध सर्कस आणि नाटक कंपनीचे मालक, त्रिपुरसुंदरी टॉकिजचे छत्रे यांनी
स्वतःच्या गावातील मुलीला मुंबईच्या चित्रपटसृष्टीमध्ये जाण्यासाठी ओळख करून दिली.
३. स्वतः कलाकार असलेल्या आणि नाटक कंपन्यांमध्ये मध्यस्थी करणा-या चाफेकर नावाच्या
गृहस्थांनी, १९२८ मध्ये किर्लोस्कर कंपनी विजापूरमध्ये असताना पेटी वाजवणा-या गोहरयांना
पाहिले व त्यांनी गोहर यांची गंधर्व कंपनीमध्ये ओळख करून दिली. चाफेकर गोहर यांच्या
घरी गेल्यावर, गोहरनी बालगंधर्वांची गाणी हुबेहूब आवाजात म्हटलेली ऐकून चकित झाल्याचे
त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांनी गोहर यांना गंधर्वांची भेट घालून देण्याचा
शब्द दिला.
४. बालगंधर्वांच्या आईने स्वतः गोहर यांचे अभंग त्यांच्या मुलाच्या कानावरून जातील अशी
व्यवस्था केली.

गंधर्व-गोहर जोडी
बालगंधर्वांना आपले जीवनसाथी बनवावे अशी सुप्त इच्छा गोहर यांच्या मनात ब-याच
काळापासून असावी असे दिसते. ते गोहरयांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी मोठे होते, मधुमेहाने त्रस्त
होते. तरीपण गोहर आणि बालगंधर्व यांच्यामध्ये प्रेम अंकुरले. गंधर्व कंपनीच्या बिकट
परिस्थितीने त्यांना आणखी जवळ आणले. त्या वेळेला बालगंधर्वांनी 'संत एकनाथ' हा चित्रपट
काढून हात पोळून घेतले होते. मुंबईनंतर बालगंधर्वांची कंपनी पुणे, मिरज, कोल्हापूर येथे
गेली. कंपनी कर्जाखाली दबून गेली होती. कलाकार कंपनी सोडून जात होते. अशा कष्टमय
परिस्थितीत(१९३७) बालगंधर्व त्यांची चाहती असलेल्या गोहर ह्यांच्या घरी गेले. ह्या भेटीला
बालगंधर्वांचे चरित्रकार वेगळा रंग देतात. पण गोहर यांच्या जीवनातील ही अपूर्व घटना होती.
त्यांनी बालगंधर्वांना हात देऊन कंपनीची दिवाळखोरी कमी करायला मदत केली. ती दोघे
१९३८ मध्ये एकत्र राहू लागली होती. कलाकार कंपनी सोडून जात असताना ती
वाचवण्यासाठी किंवा त्यांना पैसे देणे आहेत म्हणून, कंपनीच्या मालकांनी त्यांच्याबरोबर
विवाह केला. ही त्या काळी रीतीची गोष्ट मानली जाई. पण बालगंधर्व-गोहर प्रेमसंबंध म्हणजे

हे विशिष्ट प्रकरण होते. त्या दोघांमध्ये अतुट असा प्रेमबंध निर्माण झाला होता. बालगंधर्व
यांच्या पत्नी निधन पावल्यानंतर(१९५१) त्यांनी गोहर यांच्याबरोबर कायदेशीर रीतीने विवाह
केला. त्या वेळेला गोहर यांचे वय चाळीस होते आणि बालगंधर्वांचे वय त्रेसष्ट. पुढे गोहर यांनी
त्यांचे पूर्ण आयुष्य गंधर्वांच्या प्रती वेचले. रंगभूमीवर त्यांची जोडी नापसंत ठरली.
बालगंधर्वांबरोबर विवाह झाल्यानंतर, गोहर यांनी इतर नायकांबरोबर काम केले नाही.
त्यानंतर, काही दिवसांतच गोहर आणि गंधर्व यांचे कष्टाचे दिवस सुरू झाले. गंधर्वांचे वजन
वाढून, ते स्त्रीपात्र रंगवण्यात असमर्थ ठरू लागले. त्यामुळे गोहर त्यांच्या भूमिका साकारू
लागल्या. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात गंधर्वांसारखे गाणारी गोहर एकट्याच होत्या. तरीपण कंपनीचे दिवाळे निघाले.
कंपनीचे १९५३ हे शेवटचे वर्ष ठरले. कंपनी पूर्णपणे बंद पडली. त्यानंतर गोहर आणि
बालगंधर्व वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यगीते गाऊ लागले. गंधर्व कालांतराने आजारी पडले आणि
अंथरुणाला खिळून गेले. ते मधुमेही होतेच, त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला.
तेव्हा गोहर गंधर्वांची काळजी घेऊ लागल्या. हुबळीचे बिलंकर त्यांच्या आठवणी सांगत: 'मी
गोहरना १९४८ मध्ये पाहिले. मुंबईमध्ये असताना मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा त्यांना बरे
नसे. त्यांना अस्थमाचा त्रास होता. त्या वेळेला आम्ही बालगंधर्वांचा कार्यक्रम कोयनानगरमध्ये
करून त्यांना पाचशे रुपये जमा करून दिले. तेवढ्यात चिपळूणमधील परशुराम मंदिराचे पुजारी
आले. ते म्हणाले, की त्यांच्या मुलाचे लग्न आहे, त्यासाठी काही मदत करावी. तेव्हा गोहर
यांनी ते पैसे त्यांना देऊन टाकले! आणि त्या मुंबईला रिकाम्या हातानी परत गेल्या. हे
आम्हाला नंतर कळले. त्यानंतर आम्ही कोयनानगर-चिपळूणमध्ये बालगंधर्वांचे चार-पाच
कार्यक्रम करून, गोहर-गंधर्वांना बोलावून त्यांना दोन हजार रुपये रोख दिले. तेव्हा गोहर
म्हणाल्या: 'बिलंकर, ह्या वेळेला रक्कम आमच्या हातात देऊ नका. किराणा दुकानदाराला
शंभर रुपये, औषध दुकानदाराला पाचशे रुपये देऊन टाका'. आम्ही गंधर्वांना त्यांच्या
मुंबईमधील घरी पोचवून, खाली असलेल्या दुकानदाराला पैसे दिले. बालगंधर्व आणि गोहर
खूप उदार होते. कसेही पैसे खर्च करायचे.

शेवटचे दिवस
बालगंधर्व त्यांच्या शेवटच्या दिवसांत शारीरिक व मानसिक रीत्या पूर्णपणे गोहर यांच्यावर
अवलंबून होते. ते गोहरना प्रेमाने 'बाबा' अशी हाक मारत. कोणी आले की म्हणत, 'बाबा,
आले बरं का'. गोहरंना अस्थमाचा त्रास होता. तरी त्या बालगंधर्वांची अपार सेवा करत.
त्यातच त्या दमून गेल्या. त्या १९६४ मध्ये निधन पावल्या. त्या वेळेस त्यांचे वय ५३-५४
होते. त्यांना माहिया येथील कब्रस्तानात दफन केले गेले. त्या वेळी गंधर्वांनी खूप आक्रोश
केला. त्यांना गोहर यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला. पुढे गोहर यांची मानलेली मुलगी
अशाम्माने गंधर्वांचा सांभाळ केला. बालगंधर्वांचे निधन गोहर गेल्यानंतर तीन वर्षातच झाले.

मराठी लोकांचा कठोरपणा

बालगंधर्व ह्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता अशी अफवा उठून ते मरण पावल्यानंतर
त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचे कारस्थान काही जणांनी रचले होते.
बालगंधर्व गोहरयांच्याबरोबर राहिल्याचे त्या काळच्या कर्मठ लोकांना सहन झाले नाही.
गंधर्वांच्या पत्नीचे आकस्मिक निधन होण्यास गोहर-गंधर्व यांचे प्रेमप्रकरण कारणीभूत झाले
असे ते लोक मानत. चालण्याची शक्ती नसलेले गंधर्व यांचे गोहर यांनी गावोगावी फिरून,
त्यांच्यासारखे गाऊन पैसे कमवल्याचा काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवतात. मराठी
रंगभूमीच्या चरित्रकारांपैकी काही जणांनी 'गंधर्वांच्या पत्नीचे हृदय पुरुषाचे आणि गोहरच्या
पतीचे हृदय स्त्रीचे' होते असे नमूद करून ठेवले आहे. बालगंधर्व ही मराठी लोकांची अस्मिता
बनली. गोहरनी गंधर्वांना त्यांच्यापासून हिरावून घेतले अशी त्यांची भावना झाली होती. लोक
गोहर-गंधर्वांची प्रीती समजून घेऊ शकले नाहीत की ‘स्वतःच्या प्रिय व्यक्ती’वर लोकांनी
दाखवलेला अधिकार गोहरला सहन झाला नाही! गंधर्वांना १९६४ मध्ये पद्मभूषण जाहीर
करण्यात आले, त्या वेळेला गोहर समारंभास उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात
आली होती. गंधर्वांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळेला(१९८८) प्रकाशित झालेले लेखन आणि
इतर साहित्य यांमध्ये सुद्धा गोहरबद्दल गरळ ओकले गेले आहे. 'गोहरचे मायाजाल' अशा
एका लेखात गोहरयांना खलनायिका ठरवण्यात आले आहे.

कलावंतांचे जीवन
गोहर-बालगंधर्व यांच्या संबंधाचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या दोघांच्या
फोटोमध्ये कोट घातलेल्या आणि डोक्याला फेटा गुंडाळलेल्या पुरुषी वेशामध्ये गोहराबाई आहेत
आणि बाजूला बालगंधर्व स्त्रीवेशामध्ये आहेत. गोहर-बालगंधर्व संबंध दैहिक, प्रेमिक की
कलात्मक होते हे सांगणे कठीण आहे. ते आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आध्यात्मिक
असावेत. कोलकात्याची गोहरजान, बेंगलुरूची नाग्रत्नाम्मा, बेलागीच्या अमीरबाई आणि
गोहराबाई, शांता हुबळीकर ह्या कलाकारांचे जीवन पाहिले तर असे दिसेल, की त्यांचे जीवन
अतिशय कष्टदायी होते. हे कलाकार आपले जीवन धर्मातीत रीतीने जगत असतात, त्यांची
कला भाषांतीत माध्यमामधून व्यक्त होत असते. ती प्रांत, सीमा ओलांडून सर्वदूर
रसिकांपर्यंत पोचलेली असते. तरीपण त्यांना पाहणा-या समाजाचा दृष्टिकोन संकुचित असतो.
ते जिवंत असताना त्यांना प्रेम देण्यासाठी काहीही करतील, त्यांच्या मृत्युप्रश्चात त्यांना
महात्मापद देण्यास तयार असतील, पण गोहरबाईंच्या वाट्याला हे सुख आले नाही. त्यांच्या
मृत्यूची वार्तासुद्धा कळली नाही. त्या कर्नाटकच्या असून, मराठी रंगभूमीवर काम केले हे
कर्नाटकाचे लोक विसरले आहेत. गोहर यांनी कलेला किंवा प्रेमाला दिलेली ही आहुती आहे
असेचं म्हणावे लागेल.
– डॉक्टर रहमत तरीकेरी