मी कोण आहे?

तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? तुम्ही स्वतःहून सांगितल्याशिवाय कसे बुवा कळणार तुम्ही कोण ते, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि तसे हा प्रश्न अध्यात्मिक किंवा तात्विक दृष्ट्या विचारलेला नाही, तर सरळ सरळ व्यावहारिक आहे. जरा विचार करा. आजकालच्या जगात आपण आपल्या बद्दलच्या विविध गोष्टींची महिती आपण चकटफू सगळीकडे नकळत देत असतो. तुम्ही म्हणल ते कसे? आपण मोबाईल वापरतो, संगणक वापरतो, विविध प्रकारे हि दोन्ही यंत्रे वापरून आपण आपल्या अनेक जीवनावश्यक तसेच इतर गोष्टी आपण करत असतो. त्याद्वारे स्वतःबद्दलच्या माहितीचे अनेक पैलूचे ठसे आपण सोडत असतो. पटते ना?

Image by jcomp on Freepik

दर दिवसागणिक बातम्या येत असतात कि बँकेतून पैसे आपोआप गायब झाले, किंवा आपण कुठे काम करतो, आपले उत्पन्न काय, आपली जीवन शैली कशी आहे, आपण पैसे कसे खर्च करतो याचा सर्वसाधारण थांगपत्ता, सुगावा अनेक संस्थाना लागलेला असतो. संगणकाचा शोध लागल्यापासूनच त्यातील विदा (data) आणि त्या अनुषंगाने माहिती (information) यांची सुरक्षितता कशी राखावी या बद्दल विचार केला गेला आहे (data security, cryptography). जसे जसे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत गेले, प्रगत होत गेले, तसे तसे त्याने आपले आयुष्य व्यापून टाकले आहे. ठायी ठायी आता आपण हे तंत्रज्ञान, कधी कळत, कधी नकळत देखील, वापरतो आहोत. त्यामुळे माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातही प्रामुख्याने आपली वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती याची गोपनीयता आणि सुरक्षितता अतिशय महत्वाची बाब होत आहे. त्यामुळे विविध संस्था वर्तमान पत्रात आणि इतर ठिकाणी त्यांची सेवा कशी ह्या आपल्या माहितीची सुरक्षिततेची काळजी घेते याच्या आणाभाका घेत असताना आपण बघतो. पण आपण जागरूक राहणे अतिशय आवश्यक झाले आहे. आपण वापरात असलेल्या विविध सेवा, समाज माध्यमे (social media), mobile apps, smart phone, smart watch,किंवा इतर अनेक गोष्टी, ज्या आपली वैयक्तिक माहिती गोळा करत असतात, त्यातील किती गोष्टींसाठी आपण परवानगी दिली आहे, याची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. तेथे हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा टाळायला हवा. आपले जग मोबाईल, इंटरनेट, कॅमेरा, क्लाऊड, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता(artificial intelligence AI) या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा सुळसुळाट झाला आहे, अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत, पण त्यातील धोके आपण ओळखले पाहिजेत, आणि सजगपणे वापरले पाहिजेत.

संगणकावरील माहिती चोरली जाणे, गोपनीय माहिती स्पर्धकांच्या हाती, किंवा शत्रूंच्या हाती पडणे (hacking, cyber attack, cyber crime) ह्या तर आता नित्यनियमाने घडण्यारा गोष्टी झाल्या आहेत. सरकारी माहिती, तसेच बँक, आणि इतर खासगी संस्था यांची माहिती चोरण्यासाठी विविध तंत्रे, क्लुप्त्र्या शोधण्याचे काम कायमच जोरात चालू असते. अनेक कायदे (जसे cyber security, GDPR, HIPAA) तसेच सुरक्षितता आणि गोपनीयता पाळण्याविषयी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पाळल्या जाणे हे आजकाल आवश्यक झाले आहे, या सर्वांमुळे थोडेफार नियंत्रण आले आहे असे म्हणता येईल, ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण होईल असे मानता येईलही, पण त्यामुळे आपण सर्वसामान्य वापरकर्ते, ग्राहक या बाबत सतत जागरूक असणे अतिशय गरजेचे झाले आहे. स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील लहान तसेच ज्येष्ठ व्यक्तीची माहिती देखील सुरक्षित ठेवण्यास त्यांना मदत करणे हे देखील होणे आवश्यक आहे. मला आठवते काही वर्षांपूर्वी माझ्या मित्राचे क्रेडीट कार्ड दूरवरच्या आसाम मधील कोणी वापरून विमानाचे तिकीट काढले होते. हे समजल्यावर, सुदैवाने, बँकेच्या कृपेने, त्यांना हा प्रकार कळवल्यावर, हा व्यवहार रद्दबातल केला गेला आणि आर्थिक नुकसान टाळले गेले.

आपण वापरत असलेले अनेक संकेतस्थळे आपल्या बद्दलची अनेक प्रकारे माहिती गोळा करत असतात. आंतरजालावर आपण काय शोधतो याची माहिती, तश्या सेवा पुरवणाऱ्या, किंवा वस्तू विकणाऱ्या आस्थापनांना दिली जाते, त्या द्वारे त्यांच्या बद्दलची माहिती आपल्यापर्यंत धडकते, आणि आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत असतात. आजकाल सुरक्षिततेच्या कारणाखाली अनेक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो. त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. आपल्यावर सतत कोणाची नजर आहे कि काय असे वाटू लागते( आपल्याला आठवत असेल कि 1984 नावाची जॉर्ज ऑरवेलची कादंबरी याच प्रश्नाचा उहापोह करते). भारत सरकारने गेल्या काही वर्षात आरंभलेल्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित अनेक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. हे नक्कीच स्वागतार्ह आहे, आणि आपले जगणे यामुळे सुकर झाले आहे, होत आहे. सुरुवातीला आधार कार्ड आले, UPI आले, आरोग्य क्षेत्रात हि सगळी तंत्रज्ञाने वापरून अनेक गोष्टी सुकर केल्या जात आहे, पण आपली वैयक्तिक माहिती सर्वत्र आहे, AI त्यावर उपयुक्त प्रक्रिया करते, आणि ती ज्यांना हवी आहे त्यांना विकली जात आहे, लाखो, कोट्यावधी लोकांची ती माहिती चोरीला जाणे, त्याचा गैरवापर होणे या सारखे प्रकार सातत्याने घडत आहे. ह्या सर्वांवर एकच उपाय तो म्हणजे आपण जागरूक राहणे, सतत प्रश्न विचाराने, सतर्क राहणे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विदा हे आजच्या युगातील खनिज तेल आहे असे समजले जाते (data is new oil). याचा अर्थ खनिज तेलासारखे विदा वापरायच्या आधी त्यावर विविध प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आणि अश्या प्रक्रिया करण्यासाठीचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झाले आहे, होत आहे (AI/ML, Deep Learning, ChatGPT वगैरे उदाहरणे आपण ऐकली असतीलच). त्यामुळे आपल्या दैनंदिन वापरामुळे जी विदा आपण विविध ठिकाणी स्वहस्ते देत जातो, त्याचे रुपांतर माहिती मध्ये अगदी सहज केले जाते, ज्यामुळे चुकीच्या हातांमध्ये हा विदा/माहिती गेल्यामुळे, आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आपण काय विकत घेतो, आपल्या सवयी काय आहेत, आपल्याला काय आवडते, आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, आपला व्यवसाय काय, आपण कसा आणि किती खर्च करतो, आपले आरोग्य कसे आहे, वगैरे वगैरे. ह्या सर्व माहितीचा उपयोग कसा आणि कुठे होऊ शकतो ह्याचे नियंत्रण आपण गमावत आहोत कि काय असे वाटू लागते.

तर समारोप करण्या आधी, आपण परत अगदी सुरुवातीला सांगितलेल्या मुद्द्यावर येऊ या. आपण सर्वांनी समजून घेण्याची गोष्ट अशी आहे आपण कोण आहोत, यांची माहिती काळात नकळत आपण जगजाहीर करतो आहोत कि काय, त्याचा गैरवापर होऊ शकतो कि कसे या कडे जरा सजगतेने पाहण्याची अतिशय गरज आहे. ह्या बद्दल सगळ्यांनी साक्षर होण्याची आवशक्यता आहे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत, माहिती भरताना, किंवा एखादी सेवा पुरवणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करताना त्यांचे सेवेसंबंधी करार मदार काय आहेत, अटी काय आहेत याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मी कोण आहे याबद्दल आंतरजालीय चव्हाट्यावर बोलण्याआधी विचार करा!

Health Stack

As you know, India has been honored with role of president of G20 summit for a year since Dec 1, 2022. As part of that members of G20 countries are visiting various cities in India for different meetings. This week, city of Pune saw G20 members visiting for their second meeting in the city. This meeting happened to be the third meeting of G20 Digital Economy Working Group (DEWG). When I read the news and advertisement about it, my attention was drawn to it. This time the agenda was talk about digital public infrastructure (DPI) which India has developed so far. Me being in IT industry, and also keen follower of what India has been doing on various fronts using digital technologies, I decided to visit the exhibition of DPI which was arranged in Pune’s JW Marriott hotel.

While the exhibition was free to attend for general public, the summit was only for delegates and other invites. G20 DEWG’s priority areas such as Digital Public Infrastructure, Digital Skilling, and Cybersecurity in Digital Economy were to be deliberated in the summit. During the summit, India was to sign MoU with four countries on sharing India Stack. In the past I had written blog on one part of digital public infrastructure in the economic sector, called JAM (Jan Dhan-Aadhaar-Mobile) and India Stack. This is the basis of now famous UPI (Unified Payments Interface) which is indispensable part of our world now. This also was on display in the exhibition.

The exhibition showcased 14 experience zones comprising successfully implemented DPIs related to Digital Identity(आधार), Fast Payment(UPI), DigiLocker, Soil Health Card, E-National Agriculture Market, Unified Mobile App for New-Age Governance(UMANG), Open Network for Digital Commerce(ONDC), airport security check(DigiYatra), language translation(BHASHINI), learning solution, tele-medical consultation(आयुष्यमान भारत).

What I was most baffled to see booth on Ayushman Bharat(आयुष्यमान भारत). I had heard about various initiatives under this mission. Examples are PM-JAY(Primer Minister’s Jan Arogya Yojana, जन आरोग्य योजना), Jan Aushadhi (जन औषधी, generic medicines) etc. As mentioned earlier, I am in IT industry, and particularly, these days, I am involved in initiatives around digital transformation in healthcare and life sciences industry. This is possible due to advancement in IoT, wearable devices, AI/ML, mobile technologies, geo-spatial technologies, and needless to mention, cloud technologies, all coming together.

While standing in front of booth of Ayushman Bharat, I was witnessing how digital transformation has already taken place in primary healthcare domain in India. I was amazed. We also know about CoWin, AarogyaSetu (आरोग्य सेतू), which were so popular during COVID-19 times, are part of this ABDM. I spoke to the representative at the booth about National Telemedicine Service called eSanjeevani (ईसंजीवनी). It is world’s largest telemedicine implementation in primary healthcare. Over 125 million people from lower strata of the population are already covered through it. It is cost saving, easy and contact less service. This cloud based telemedicine platform is developed by Government
of India’s premier research center called C-DAC. It employs point of care devices

Upon a bit of research, I came to know about something called National Health Stack (NHS), which is designed on the similar lines of India Stack, which I had mentioned above. The NHS, a set of building blocks which are essential in implementing digital health initiatives, is built as a common public good to avoid duplication of efforts and successfully achieve convergence. Also, the NHS will be an enabler for rapid development of diverse solutions in health and their adoption by various states in India.


National Health Stack, Image Courtesy: ABDM


The key components of the National Health Stack are:
1. national health electronic registries: to create a single source of truth for and manage master health data of the nation;
2. a coverage and claims platform: building blocks to support large health protection schemes, enable horizontal and vertical expansion of Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana (PMSSY) by states and robust fraud detection;
3. a Federated personal health records (PHR) Framework: to solve twin challenges of access to their own health data by patients and availability of health data for medical research, critical for advancing our understanding of human health;
4. a national health analytics platform: to bring a holistic view combining information on multiple health initiatives and feed into smart policy making, for instance, through improved predictive analytics;
5. other horizontal components: including, and not restricted to, unique Digital Health ID, Health Data Dictionaries and Supply Chain Management for Drugs, Payment Gateways etc shared across all health programs.

Isn’t this amazing?

There is have been also a talk of data privacy off late. Certainly, these concerns should have been taken care of appropriately, if they have not been already.

I distinctly remember at this stage that few years ago(in fact more than a decade ago), I was involved in developing digital pathology solutions. Innovation in digital radiology, tele-radiology was already happening, even now it is going to the next level. Digital pathology was still untouched area back in 2005. The key enabler here was the advanced image analytics of tissue slides which are typically analyzed by pathologists using microscope. This is was meant for both diagnostic and research purposes. It was heartening to see India’s silent progress in the digital transformation of health care space in India, all these year, and it has been my pleasure to be back in the same space again after more than a decade, this time now, with many more technologies at our disposal to use.

Camping at Pawana Lake

For anyone who is into outdoor(and adventure) activities, camping is one of the latest addition, in India these days. I have experienced camping in tents, during my treks in Himalayas, and even in Sahyadris. We had to carry out our own tents and also set them up before using. Though camping is part of treks in Himalayas and at other locations, exclusive campsites (with per-installed tents) at various locations is new thing. These campsites are run by private organizations. In USA, I remember camping in public campsites(or campgrounds as they call it) at places inside a national park. These places typically provide space for setting up tents, public toilet facilities and other basic common facilities.You are required to carry your own tent and setup those. I have not come across any public campsite locations so far. May be this is something which can be explored by concerned authorities.

I recently happened to experience camping at a private campsite in India. As I said at the beginning, this is the latest attraction which was not available earlier. Many private organizations have setup campsites where tents are already setup, other facilities are provided.

My campsite was located by a lake, near city of Pune. I booked this using Thrillophilia portal(which acts as an aggregator of various activities), to celebrate birthday of my spouse. City of Pune is surrounded by hills(which are part of Sahyadri range of mountains) and historical forts, also many rivers originate and pass through and around the city. About 100 kilometers towards north-west of city of Pune, there lake named Pawana lake, situated amongst valley. Actually, this lake is backwaters of dam built few decades back on river Pawana.I have been through this area many times, have hiked forts nearby, in the past, and appreciated serene environs of this region which is named as Pawan Maval.

It was a 2 day, 1 night stay package, over the weekend. We traveled through scenic Pawan Maval area, which is famous for rice paddies. We also passed Hilton hotel at village Shilim, I remembered where I was for my company’s outbound learning(OBL) activity few years back. By 4.30 pm, we reached our campsite which was owned/managed by Atithi Camping(BTW, Thrillophilia does not reveal the details of camp organizer until you book with them). First view of the site was quite impressive. Colorful tents dotted by the lake shore, was a good sight indeed. The serene and calm waters of the lake, with occasional bird plunging into the water, was promising a great time there.

As the sun set, slowly lighting around the campsite started to glow, music also was turned on. People were enjoying that music and playing games, chatting. We were more interested to relax, enjoy the clam side of the nature, which is what you expect during camping in the outdoors, where you try to experience the nature up close. We were disappointed to witness the changed environs. We decided to venture out of the campsite area. We noticed a similar campsite managed by another organization nearby. We walked around the area, going through small village, in the dark as there were no artificial light around. Full moon night was couple of days away, hence there was natural moonlight, and that was enough for walking.

We returned back to our campsite. The sound had gotten louder, and the lights also had gotten brighter, to our discontent. Now there were even more people, as the campsite could accommodate 50 campers(with about 25 tents). Soon, a singer with his guitar arrived at the scene. Now it was turn to entertain the campers with his medley of songs and guitar. And it was not bad. It also had started getting chillier. Few people now gathered at the tables and took out their liquors and smoke, and it was typical scene which you see at any bar. No one bothered about the calmness and beauty of the nature. Those like us who bothered probably were far and few, isolated in despair.

Dinner was setup in some time and that was not bad at all. Simple but warm and fresh. It was time to retire to your tent. But the sound of muisc did not stop till late, past midnight, as people did not stop talking, drinking. It was quite disturbing night for us. We were viewing the lake waters from our tent, which was shining due to moonlight, but could not hear its calmness, as sounds of loud music banged our ears.

The night passed somehow, it was morning. Everything was calm and quite luckily. We had our fresh cup of hot tea, and were able to walk by the lake and experience chilly, misty morning, with sun rise, though it was still cloud sky. We ventured out for a morning walk for about an hour and it was good, I must say. This is bird migration season, but did not spot any noticeable activity of birds.The view of lake accompanied us all along, with forts and hills in the backdrop. We noticed many campsites on the shores afar. We kept wondering what damage these campsites must be doing to the nature, with ill-managed, environment unfriendly organizers and campers together. On one side it is good that many of these camp organizers are local youths, who are farmers traditionally. Many of them have been impacted by dam project years back and have not been compensated by government properly and timely. But on another side, allowing and not curtailing activities which can damage environment, is something not good in long term. May be government should regulate this popping of campsites, impose strict guidelines to protect environment. Actually, as per laws in Maharashtra, construction within limits of 200 meters was allowed. But recently, that was changed to 75 meters due to builders’ lobby. This is not a good news.

Anyways, there was breakfast which was waiting for us, when we returned back to the campsite. We had that and checked out to head back home. We had expected to get relaxed and refreshed being with nature, camping by the lake. But exactly opposite thing happened. We were sleepless, tired, eager to reach home and catch some sleep. And that is exactly what we did!

छेल्लो शो उर्फ The Last Film Show

ऑस्कर पारितोषिकाच्या साठी असलेल्या स्पर्धेत भारतातर्फे एक गुजराथी चित्रपटाची वर्णी लागली आहे. त्याच्या बद्दल वाचल्यावर चित्रपटाबद्दल जबर उत्सुकता निर्माण झाली. कारण मी काही दिवसांपूर्वी पाहिलेला एक जुना इटालियन चित्रपट, ज्याचे नाव सिनेमा पॅराडिसो. त्याचा विषय आणि ह्या चित्रपटाचा विषय मला साधारण सारखाच वाटला. आणि विषय होता तो लहान मुलामध्ये असलेले चित्रपटांविषयीचे वेड , ध्यास. असेही वाचले कि छेल्लो शो चित्रपट हा Pan Nalin या त्याच्या दिग्दर्शकाची स्वतःची कहाणीच आहे. मी परवाच तो पाहून आलो, आणि म्हटले त्याबद्दल थोडेसे ब्लॉगवर व्यक्त होऊयात, त्यामुळे हा प्रपंच. खरे तर अजून एक भारतीय चित्रपट ऑस्कर स्पर्धे मध्ये गेला आहे, त्याचे नाव आहे RRR, पण तो अधिकृत नामांकन नाही असे वाचण्यात आले. असो.

मी खूप वर्षांपूर्वी Adlabs नावाच्या एका आगळ्या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका उद्योगात थोडेसे पैसे गुंतवले होते. भारतात नव्याने तयार होणार्या चित्रपटांच्या फिल्म्सवर प्रक्रिया (post production process चा एक भाग). ज्या प्रमाणात भारतात चित्रपट बनतात ते पाहता त्यांच्या कडे भरपूर काम असे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि आजकाल चित्रपट ह्या फिल्मवर नसतो तर डिजिटल स्वरूपात संगणकात असतो. त्यामुळे फिल्म प्रोजेक्टर जाऊन डिजिटल प्रोजेक्टर, उपग्रहाद्वारे अनेक चित्रपटगृहात दाखवण्याची आता सोय आली आहे. काळाच्या ओघात Adlabs (जिला अनिल अंबानी यांच्या समूहाने विकत घेतली होती) ती बुडाली. माझे पैसे देखील बुडाले!

हे सर्व सांगण्याचे कारण असे कि, छेल्लो शो चित्रपटात फिल्म्स रील्सचा जमाना मागे पडण्याचा जो वेध घेतला आहे तो अतिशय हृद्य, यातनादायकआहे. असे म्हणतात कि change is the only constant याची प्रचीती येते. हे सर्व चित्रपटाच्या दुसऱ्या भागात येते.

पहिल्या भाग, जो मला अधिक आवडला, त्यात गुजरातेतील काठीयावाड भागातील एका कोह्डकर, आणि उद्योगी अश्या लहान शाळकरी मुलाचे चित्रपटांचे वेंड दाखवले आहे. हा भाग आणि वर उल्लेख केलील्या सिनेमा पॅराडिसो या मध्ये साम्य आहे. रेल्वे स्थानकावरील एका चहावाल्याचा हा मुलगा. हे रेल्वे स्थानक कसे तर , चलाला नावाच्या कुठल्यातरी आडगावातील. आजूबाजूला शेती, खुले माळरान, सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीरचे जंगल जवळच. गाडी आली कि हा मुलगा प्रवाश्यांसाठी चहा विकायला जाणार. बाकीचा वेळ शाळा, आणि इतर मुलांबरोबर हुंदडणे. एके दिवशी आपल्या कुटुंबासोबत गावात लागलेल्या एक धार्मिक चित्रपट पाहायला जातो. आणि त्याची सहज बालबुद्धी चित्रपटांकडे आकर्षित होते. तो हळू हळू शाळा चुकवून चित्रपट पाहण्याची चटक लागते. कधी चोरून चित्रपटगृहा जाणे, तर कधी पैसे चोरून तिकीट काढणे असे उद्योग सुरु होतात. एके दिवशी त्याची चोरी पकडली जाते आणि चित्रपटगृहातून बाहेर काढला जातो. त्यावेळेस त्याला film projectionist भेटतो, आणि त्याच्याशी त्याची गट्टी जमते. आणि तो projection room मधून चित्रपट पाहायला लागतो. हळू हळू त्या हलत्या चित्रांची दुनिया त्याला उमगू लागते, त्याला फिल्म्स हाताळायला मिळतात.

तो आणि त्याचे मित्र मिळून काहीतरी जुगाड करून घराच्या घरी हलती चित्रे दाख्वाण्यासाठीची सोय करतात. हे पाहताना मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली. आम्ही देखील. खास करून उन्हाळ्यातील सुट्ट्यात, बाजारात मिळणारी शोले सारख्या चित्रपटांची फिल्म्स आणून ते एका अंधाऱ्या खोलीत दुपारी, पांढऱ्या साडीवर अथवा धोतरावर पाहत असू, दुसऱ्यांना दाखवत असू.

आणि, चित्रपटात असे सर्व कारनामे होत असताना, एके दिवशी अचानक बदल घडतो. चित्रपट आता फिल्म्सच्या रील्स वर दाखवता संगणकाच्या सहाय्याने दाखवला जाणार असतो. त्यामुळे चित्रपटगृहाच्या film projectionist ची नोकरी जाते, फिल्म्सच्या रील्स, प्रोजेक्टर इत्यादी सर्व समान भंगारच्या भावात विकले जाते. त्या फिल्म्सचे रुपांतर पुढे मग रंगीबेरंगी बांगड्यामध्ये होते. काही दिवसांनी तो मुलगा घरातून बडोद्याला चित्रपट क्षेत्रात काहीतरी करायला आपल्या कुटुंबाला सोडून जातो. हा शेवट थोडासा रोमान्तिक आहे, मनाला पटत नाही. एवढासा तो मुलगा, त्याला चित्रपट क्षेत्रात काय करायचे आहे ह्याची कल्पना कशी असणार, त्याचे आई वडील त्याला जाऊन कसे देतात, हे सर्व तितकेसे पटणारे नाही.

असे असले तरी हा चित्रपट नक्कीच पाहावा असा आहे, प्रामुख्याने ज्यांनी फिल्म रील्सवर असणारे एक पडदा चित्रपटगृहात असे चित्रपट पहिले असतील तर ,त्यांना नक्कीच त्या दुनियेत परत घेऊन जाणारे आहे.

दोन हटके चित्रपट

काही दिवसांपूर्वी विलास सारंग यांची एक जुनी कादंबरी वाचत होतो. नाव होते ‘एन्कीच्या राज्यात’ आणि ती प्राचीन इराकच्या प्रदेशात १९७० च्या दशकात घडणारी कथा होती. त्यात कथानकाच्या ओघात नाईन आवर्स टू रामा या शीर्षक असलेल्या एका चित्रपटाचा संदर्भ आला होता. आणि तो होता गांधी हत्येच्या संदर्भातील. तो चित्रपट मी युट्युब वर नुकताच पाहिला. योगायोगाने महात्मा गांधी यांची जयंती नुकतीच होऊन गेली. ह्या चित्रपटाबद्दल पूर्वी मी ऐकले किंवा वाचले देखील नव्हते. आणि त्याच्या निमित्ताने त्याबद्दल लिहिण्याचा योग येत आहे.
दुसरा चित्रपट ज्या बद्दल लिहिणार आहे तो आहे सिनेमा पॅराडिसो. तो हि मी नुकताच पाहिला. नुकतेच फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमाचा प्रणेता गोदार्द यांचे निधन झाले. हा लेख त्यांना श्रद्धांजलीपर मानता येईल.

नाईन आवर्स टू रामा
महात्मा गांधी हे अनेक चित्रपटांचा विषय झाले आहेत. महात्मा गांधी यांची जयंती नुकतीच पार पडलीआणि त्याच्या निमित्ताने इंटरनेट वर त्या चित्रपटांची यादी फिरत आहे. त्यात ह्या चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा १९६३ चा चित्रपट. त्यावर भारत सरकारने बंदी आणली होती. कारण यात महात्मा गांधी यांच्या पेक्षा नथुराम गोडसेच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आणि तो थोडेसे सत्य आणि बरेच काही कल्पनानिक अश्या घटनांनी रेखाटण्यात आला आहे. हि एक अमेरिकन हॉलीवूड चित्रपटआहे, आणि त्यातही मुख्यतः भरणा आहे तो अभारतीय कलाकारांचा.

हा चित्रपट नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या करण्याआधी नऊ तास त्याच्या काय आयुष्यात घडले ह्यावर एक काल्पनिक कथानक मांडले आहे. Stanley Wolpert या लेखकाच्या त्याच नावाच्या एका कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अर्थात, नथूरामच्या मनात काय सुरु आहे, त्याच्या पूर्वायुष्यातील घटना (बहुतेक सगळ्या काल्पनिक, ज्यात प्रेम प्रकरण वगैरे गोष्टी देखील आहेत) यांचे चित्रण या सर्वांनी चित्रपट व्यापला आहे. इंग्रजी संवाद, अभारतीय कलाकार, एकूणच कल्पनेवर आधारित कथानक या सर्वांमुळे चित्रपट वेगळा ठरतो. या लेखकाने पुढे २००१ मध्ये गांधींचे चरित्र देखील लिहिले पण ते देखील समीक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. इंटरनेट ह्या वादग्रस्त चित्रपटाबद्दल शोधले असता असे दिसते कि एकूणच गांधी हत्या ह्या सारख्या संवेदनशील विषयावर ज्या सवंगपणे हा चित्रपट चित्रीकरण करतो त्यावर बराच वादंग त्या काळी मजला होता. त्यातील मला तरी एकच भारतीय अभिनेता ओळखू आला, तो म्हणजे डेव्हिड, ते हि एका पोलीस हवालदाराच्या छोट्याश्या भूमिकेत. महात्मा गांधींच्या छोट्याश्या भूमिकेत कोणी कश्यप नावाचे अभिनेता आहेत. चित्रपटात गांधींची भूमिका करणारे बहुतेक ते पहिलेच अभिनेते असावेत. १९८२ मध्ये आलेल्या चित्रपटात Ben Kingsley याची गांधीची भूमिका गाजली होती.

सिनेमा पॅराडिसो
हा चित्रपट म्हणजे चित्रपटगृहांवरील नितांतसुंदर चित्रपट आहे. आपल्या इथे एक पडदा चित्रपटगृह पाडून नवीन मल्टीप्लेक्स चित्रपटगृह उभारायला सुरुवाट होऊन आता कित्येक वर्षे झाली आणि नवीन मल्टीप्लेक्स संस्कृती देखील बऱ्या पैकी रुळली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटाचा आस्वाद घेणे मनोरंजक ठरते. हा अडीच पावणेतीन तासांचा इटालियन चित्रपट इंग्रजी सब टायटल्स सह युट्युब वर उपलब्ध आहे.(युट्यूबने age restriction हे कारण देऊन लिंक preview mode द्यायला परवानगी नाकारली)
१९५० च्या आसपास इटली मध्ये घडणारी हि कथा आहे. इटलीतील एका छोट्याश्या गावात एकमेव असे एक चित्रपटगृह असते. त्या चित्रपटगृहासमोर एका मोठा चौक दाखवला आहे. चित्रपटगृहाचा मालक आणि फिल्म प्रोजेक्टर वर चित्रपट दाखवणारा अल्फ्रेडो नावाचा मध्यवयीन माणूस आहे. गावात राहणारा एक सात आठ वर्षांचा साल्वातोर उर्फ टोटो नावाचा छोटा मुलगा देखील प्रमुख पात्रात आहे. या दोघांच्या मधील भावपूर्ण संबंधावर coming of age प्रकारच्या कथनशैलीतील हा चित्रपट आहे. आजच्या डिजिटल चित्रपट प्रोजेक्शन तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट असलेलेले फिल्म प्रोजेक्शन जे जग कसे होते ह्याचा देखील प्रत्यय येतो.

टोटोची चित्रपटगृहात जा ये असते, प्रोजेक्टर रूम मध्ये देखील तो जात येत असतो. अल्र्फ्रेडोचे काम न्याहाळत असतो. त्या दोघांची गट्टी जमते. त्याला प्रोजेक्टर कसा चालवायचा हे देखील अल्फ्रेडो त्या मुलाला शिकवतो. एक रात्री चित्रपट सुरु असताना एक दुर्घटना घडते. काही कारणाने चित्रपटांच्या फिल्मच्या रिळांना आग लागते. चित्रपटाच्या फिल्म्स ह्या अतिशय ज्वलनशील असतात. त्या दुर्घटनेत अल्फ्रेडो भाजून निघतो, चित्रपटगृहाचे देखील आगीत नुकसान होते. टोटो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करो पण अल्फ्रेडोची दृष्टी जाते, तो अंध होतो, पण त्याचा जीव वाचतो. आणि चित्रपटाला एक कलाटणी मिळते. टोटो आणि अल्फ्रेडो एकमेकांचे जिवलग बनून जातात.

कालांतराने टोटो तरुण होतो, चित्रपटगृह परत सुरु झाले आहे, पण ते आता अंध अल्फ्रेडोकडे नाही. टोटो आता त्याचे काम करत आहे, चित्रपट फिल्म प्रोजेक्टर चालवत आहे. नवीन मालक जवळच्या गावात अजून एक चित्रपटगृह सुरु करतो. टोटो कडे चित्रपट रिळे एका ठिकाणाहून दुसरी कडे सायकल वर नेण्याचे पोचवण्याचे देखील काम येते. एकूणच या चित्रपटाशी संबंधित कामात त्याला रस आहे गती आहे. एका छोटा व्हिडियो कामेरा घेऊन छोट्या छोट्या घटना चित्रित करू लागतो. अल्फ्रेडोच्या लक्षात आलेले असते कि टोटोला ह्या कलेविषयी आत्मीयता आहे, तो त्या विषयी संवेदनशील आहे.

या चित्रपटात एक प्रेमप्रकरण देखील आहे. तरुण टोटोचे एलिना नावाच्या गावत नवीनच आलेल्या एका मुलीवर मन बसते. तिला देखील तो आवडू लागलेला असतो. एकमेकांची आयुष्यभर साथ करण्याचा निर्णय घेतात, पण एलीनाच्या घराचा विरोध असतो. दरम्यान टोटोला सक्तीची सैन्यात रवानगी होते. वर्ष दोन वर्षांनी परत आल्यावर इलिन दुसरीकडे गेली असते. अल्फ्रेडो त्याला रोमला जाऊन चित्रपटक्षेत्रात काम करण्याचा सल्ला देतो. टोटो तो मानतो देखील.

आता चित्रपट तीस वर्षे पुढे सरकला आहे. टोटोने चित्रपटक्षेत्रात बरेच नाव कमावले आहे. त्याला एके दिवशी आईकडून समजते कि अल्फ्रेडोचे निधन झाले आहे. त्या निमित्ताने तो कित्येक वर्षांनी गावत येतो. गावातले जुने झालेले चित्रपटगृह पाहतो. आता ते पाडण्यात येणार असते. तसेच त्याला वयस्कर झालेली एलिना भेटते आणि ते गतकाळाचा लेखाजोखा घेतात आणि चित्रपट तेथे विराम घेतो.

ह्या चित्रपटात एका दृष्टीने चित्रपटगृह हे देखील एक पात्र आहे असे म्हणावे लागेल किंबहुना हा चित्रपट त्याचीसुद्धा कथा सांगतो. एक तर दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ, युरोपसह इटली देखील होरपळून गेला आहे. एकूणच मंदी, हलाखाची परिस्थितीमुळे लोकं रंजले गांजले होते. गावातील असलेल्या एकमेव असे चित्रपटगृह हे त्यांचे विरुंगळ्याचे ठिकाण. अनेक प्रकारचे लोकं, त्यांचे स्वभाव, त्यांच्यामधील छोटी मोठी पेल्यातील वादळे, भांडणे. जसे काही गावात एखादा पार असतो तेथे कश्या बारा भानगडी होत असतात तसे हे त्या गावातले त्या काळचे चित्रपटगृह हे ठिकाण. चित्रपट पाहता पाहता तेथील प्रेक्षक करणारे अनेक उद्योग हे सगळे पाहताना मजा वाटते.

इटलीतील सिसिली भागातील Palazzo भगात सिनेमा पॅराडिसो वसलेले होते, ते आता नाही पण तो चौक तेथे असावा. पुढे कधीतरी इटलीच्या प्रवासाचा योग आला तर, तो पाहायचा अशी मनीषा आहे! चित्रपटक्षेत्राशी निगडीत अने चित्रपट आहेत, पण सिनेमा थियेटर या विषया भोवती हा बहुतेक एखादाच चित्रपट असावा.

कर्नाटकातील दोन अपरिचित राजे

आजकाल नवरात्रीचे दिवस आहेत. कर्नाटकातील म्हैसूरचा दसरा महोत्सव जगप्रसिद्ध आहे. ज्याला नाडहब्बा असे म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या म्हैसूर संस्थानाच्या वडियार राजघराण्यातर्फे हा दसरा महोत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्त कर्नाटकातील फारशी माहिती नसलेल्या दोन राजांच्या बद्दल लेख असलेला हा ब्लॉग सादर करतआहे. पहिला लेख आहे तो सौन्धेकर घराण्यातील सदाशिवराजे या विसाव्या शतकातील राजांविषयी आणि तसेच घराण्याचा इतिहास या विषयी मी इतक्यातच वाचलेल्या एका मराठी पुस्तकाबद्दल. आणि दुसरा लेख, जो मूळ कन्नड मधून मराठी मध्ये मी अनुवादित केला आहे, तो आहे तो सोदे घराण्यातील सतराव्या शतकातील राजाविषयी ज्याचे नाव सदाशिवराय असेच आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या दोन्ही लेखातील राजे हे एकाच राजघराण्यातील आहेत. सुधापूर, सौन्धे, सोदे अशा विविध नावाने इतिहासात उल्लेख असलेले ठिकाण म्हणजे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील सोन्डा/सोन्दा (Sonda) हे असावे. मी १९९९ मध्ये Coastal Karnataka नावाची १० दिवसांच्या एका फिरस्ती दरम्यान शिरसी, सोन्डा येथेही फिरलो होतो. त्या भटकंती बद्दल एक ब्लॉग लिहायचा राहून गेलाच आहे, बघुयात कसा काय योग जमून येतो ते. असो.

एक होता राजा

गोव्याच्या लेखिका माधवी देसाई यांनी संशोधन करून लिहिल्या ‘एक होता राजा’ या नावाचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हि खरे तर एक ऐतिहासिक कादंबरी आहे. त्यात त्यांनी ह्या सौन्धेकर घराण्याविषयी आणि त्यातील विसाव्या शतकातील सदाशिव वडियार या राजाविषयी लिहिले आहे. हे राजघराणे अठराव्या शतकात कर्नाटकातून गोमंतक प्रदेशात म्हणजे आजच्या गोव्यात आले आणि आजही तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याच्या जवळ सुधापूरचे हे सौन्धेकर राजघराणे यांचे चौदावे वंशज गोव्यात नागेशी गावात शिवतीर्थ पलेस येथे वास्तव्यास आहेत. हे राजघराणे इतिहासातील एकमेव लिंगायत राजघराणे आहे. हे राजघराणे म्हैसूर राजघराण्याची हि एक शाखा आहे.

पुस्तकाच्या शेवटी रत्नाकर देसाई यांचा एक लेख जोडला आहे, त्यात त्यांनी ह्या राजघराण्याच्या इतिहासाच्या संबंधी काही नोंदी आहेत. ह्या राजघराण्याचा एकसंध असा इतिहास अजूनतरी उजेडात आलेला नाही. सौन्धेकर घराणे स्वतःला विजयनगरच्या सम्राटांचे वंशज मानतात तसेच स्वतःच्या नावापुढे ओदियार हे बिरूद देखील लावतात. इ. स. १४०४ मध्ये आपल्या धाकट्या भावासाठी विजयानगरच्या एका राजपुत्राने स्वखुशीने राजसिंहासनाचा त्याग केला आणि दक्षिणेकडील एका प्रांताचा प्रमुख म्हणून राहिला. हा प्रांत म्हणजे चंद्रगिरीचे राज्य असावे जे सौन्धेकर घराण्याचे मुळ राज्य होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांच्या पुस्तकात ‘सौन्धेकारांची बखर’ या नावाचे एक प्रकरण आहे. त्यात चंद्रगिरी येथील व्यंकटपती नावाच्या सरदाराने पश्चिमेकडील बंड मोडून सौन्धे येथे नवीन ठाणे वसवले. इ. स. १५५५ मध्ये सौन्धेला राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. पण ते विजयनगर साम्राज्याचे मांडलिक राज्य म्हणून अस्तिवात राहिले. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर बिदनूर, केळदी, इ. स. १६१८यांनी स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. इ. स. १६१८ मध्ये त्यांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केला. इ. स. १६३८ मध्ये आदिलशहाने त्याचा पराभव करून मांडलिक होण्यास भाग पडले.

पुढे महाराष्ट्रात मराठी राज्याचा उदय होऊन इ. स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांना हा पश्चिमेचा प्रदेश आपल्या राज्याला जोडायचा होता. त्यामुळे फोंडा, कारवारची मोहीम आखली आणि इ. स. १६७५ मध्ये सौन्धेकर राज्याला आपले मांडलिकत्व पत्करायला भाग पाडले. इ. स. १६८० मध्ये महाराजांच्या मृत्युनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत सौन्धेकर , वाडीकर भोसले तसेच पोर्तुगीज यांनी आपली राज्ये बाळकट केली. पोर्तुगीजांनी सौन्धेकर राज्याबरोबर मैत्रीचे संबंध ठेवले.

इ. स. १७६० मध्ये म्हैसूरच्या हैदर अली (जो म्हैसूर राज्याचा सेनापती होता) याने सौन्धेकर राजांवर हल्ला करून त्यांना परागंदा केले. त्यांनी पोर्तुगिजांचा आश्रय घेतला आणि काही भाग टिकवून ठेवले, आणि पुढे त्यांनी आजच्या गोव्यात नागेशी-बांदिवडे येथे आपले वास्तव्य हलवले, जे आजतागायत तेथेच आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण होण्यापूर्वी पोर्तुगीजांच्या वार्षिक साथ हजार रुपयांच्या तनाख्यावर आणि शेतवाडीच्या उत्पन्नावर सौन्धेकर घराणे गुजराण करत होते.

लेखिका माधवी देसाई यांनी या पुस्तकात सदाशिवराजे वडियार यांचे चरित्र ऐतिहासिक कादंबरीच्या स्वरूपात मांडले आहे. त्यांचा राज्याभिषेक सवाई सदाशिव राजेंद्र वडियार या नावाने १९४१ गुढी पाडव्याच्या दिवशी मध्ये झाला. मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या या लेखिका याच नागेशी-बांदिवडे भागात विवाहानंतर राहिल्या असल्या मुळे, त्या राजांना एक दोनदा भेटल्या होत्या, राजवाड्यात देखील त्यांचा फेरफटका असे. नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज ह्या बांदिवडे गावच्या नाट्यसंस्थेच्या वर्धापन दिनी सदशिवराजे सौन्धेकर आले होते ह्याची देखील त्यांनी आठवण नमूद केली आहे. म्हैसूर वडियार घराणे आणि आता गोव्यात असलेले सोन्धेकर घराणे यांच्या रोटी बेटी चे व्यवहार आधीपासून होत आहेत. सदाशिवराजे यांचे पिता बसवलिंगराजे यांचा विवाह १९३० मध्ये म्हैसूरला शिवमणी पद्मावती यांच्याशी झाला होता. सदाशिवराजे यांचा विवाह जहागीरदार तेरणीकर देसाई यांची कन्या निर्मलादेवी यांच्याशी झाला होता. सदाशिवराजे १९ मार्च २००६ रोजी ते निर्वतले.हे पुस्तक बरोबर एक वर्षाने २००७ मध्ये प्रकाशित झाले होते.

हे सर्व लिहित असताना मी पूर्वी राजा थिबा बद्दल लिहिले होते त्याची आठवण झाली होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या भारताचा भाग असलेल्या ब्राम्ह्देशाचा राजा सुद्धा कोंकणात रत्नागिरीला ब्रिटीश सरकारच्या नजरकैदेत होता.

सोदे सदाशिवराय-ब्रिटिशांना पराभूत केलेला पहिला राजा
मूळ कन्नड: लक्ष्मीश सोन्दा, तरंग मासिक जून २३, २०२२
अनुवाद: प्रशांत कुलकर्णी

सोदे राजघराण्याचा पहिला राजा सदाशिवराय इतिहासाच्या डोळ्यांना फक्त विजयनगर साम्राज्याचा एक मंडलिक राजा म्हणून दिसत असला तरी तो उत्तम कवी, विद्वान, तसेच संगीततज्ञ देखील होता हे काळाच्या पडद्या आड गेला आहे. कर्नाटकातील सोदे या गावी प्रत्येक वर्षी ह्या राजाच्या कार्याची आठवण म्हणून राज्य पातळीवरील एक इतिहासाचे संमेलन आयोजित केले जाते. ह्या वर्षी ते सोदे गावातील स्वर्णवल्ली मठात जून १८ आणि १९ ला झाले. त्या निमित्ताने हा लेख.

इतिहास हा असा होता हे ठामपणे बहुतेक वेळेला कठीण असते. भारताच्या इतिहासाच्या पानावरील कित्येक पाने पुसत आहेत किंवा पुसत होत चालली आहेत. त्यातीलच एक म्हणजे सोदे राज्याचे राजे सदाशिवराय हे एक होत.

आजच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यात एक ऐतिहासिक नगर आहे, ज्याचे नाव आहे सोन्दा. हे आज अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्र म्हणून जास्ती प्रसिद्ध आहे. असे असले तरी सुद्धा अनेक शतकांपूर्वी हा ऐतिहासिक काळातील एका राज्याचा राजधानीचा प्रदेश होता. पूर्वी सुधापूर, सोमधापूर, स्वादि, सोदे अश्या नावांनी ते ओळखले जाई. इ. स. १५५५ ते इ. स. १७६३ पर्यंत ते विजयनगर साम्राज्याचे मांडलिक म्हणून राज्य करत होते. आजच्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या तीन चतुर्थांश भाग त्यांच्या अमलाखाली होता. जरी ते मांडलिक, सामंत म्हणून राज्य चालवत असले तरी ते सांस्कृतिक देणगी बरीच मोठी आहे.

ह्या राजघराण्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध राजा म्हणजे सदाशिवराय(इ. स. १६७८ ते इ. स. १७१८). हे मधुलिंग नायक यांचे पुत्र. ह्या राजाचा काही विद्वान पहिला सदाशिवराय ह्या नावाने उल्लेख करतात. पण इतिहास कार के.जी. कुंदनगार यांच्या ‘स्वादिचे ताम्रपट’ नावाच्या पुस्तकात एका लेखात एका ताम्रपटाचा(इ. स. ८००) ते सदाशिवराय असा उल्लेख करतात. त्यामुळे तो पहिला सदाशिवराय असावा. सवाई रामचंद नायक राजाच्या नंतर सदाशिव राय यांनी सोदेवर चाळीस वर्षे असे सुदीर्घ राज्य केले. त्याने साहित्य, संगीत, ह्या सारख्या विविध क्षेत्रात काम केले. त्याला मराठी, कन्नड, संस्कृत, उर्दू भाषा येत असत. असा पराक्रमी, सद्गुणी राजा कर्नाटकात क्वचित निर्माण झाला असेल.

सदाशिवराय राजाचा काळ हा कर्नाटकच्या इतिहासातील अनेक राजकीय उलथापालथ होत असलेला काळ होता. उत्तरेतील औरंगजेब राजाचा अधिकार आणि प्रतिष्ठा यांचे द्योतक असलेले सार्वभौमत्व दक्षिण भारतात देखील त्याला विस्तारित करायचे होते. त्यामुळे त्याने कर्नाटकावर स्वारी करण्यास सुरुवात केली होती. पश्चिमेकडे करावली भाग(कोकण) ज्यात त्यावेळच्या सोदे राज्याचा भाग असलेले कारवार, अंकोला हे त्याने जिंकून घेतले होते. त्याच सुमारास आदिलशाहीने देखील डोके वर काढायला सुरुवात केली होती. त्यामुळे सदाशिवराय याने मोघलांचे मांडलिकत्व पत्कारले. इ. स. १६९९ ते इ. स. १७०० हि दोन वर्षे त्याने औरंगजेब यांच्या बरोबर त्याचा राजकीय व्यवहार सुरु होता. त्याने दिल्लीला जाऊन औरंगजेब याची भेट देखील घेतली होती. पण हे फार काळ टिकले नाही.

सदाशिवराय हा ब्रितीशांसाठी १९८० पासूनच सिंहस्वप्न ठरत आला होता. ब्रिटीशांनी कारवार वर १६८३, १७०५, आणि १७१५ मध्ये स्वारी केली होती, पण त्याने ब्रिटीश सैन्याला धूळ चारली होती. त्यामुळे ब्रिटीश सैन्याला हरवणारा भारतातील पहिला राजा असा बहुमान त्याला मिळाला. ह्या संबंधी उल्लेख gazetteer मध्ये देखील आहे.

सदाशिवराय याच्या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे असे कि त्याने राज्याचा आणखीन विस्तारहि केला. ब्रिटीश सैन्याचा मुकाबला करण्यासाठी त्याने सदाशिवगड नावाचा किल्ला देखील बांधला.
त्याच रीतीने व्यापार उदीम यांची देखील त्याने व्यवस्था लावली, दळणवळण मार्गावर सुरक्षितता वाढवली आणि या सर्वांसाठी त्यांनी करावली(कोकण) भागावर आपले चांगलेच बस्तान बसवले. पण त्याच बरोबर सदाशिवरायला दोन युरोपिअन साम्राज्यवाद्यांशी मुकाबला करावा लागला. त्यातही प्रामुख्याने इंग्रजांशी त्याचा कायम संघर्ष होत असे. त्यात त्याला बहुतेकवेळेस विजय मिळाला. त्यामुळे झाले असे कि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी जवळ केले. त्याच वेळेला मराठा सैन्याने समुद्रमार्गे तसेच जमिनीवरील सैन्याने आक्रमण सुरु केले. या सर्वापासून बचावण्यासाठी आणि व्यापाराला बाधा न येण्यासाठी त्याने सदाशिवगड किल्ला निर्माण केला. गोव्यातील पोर्तुगीजांबरोबर गंगावली नदीच्या उत्तरेला आपले राज्य त्याने वाढवले. १६९७ च्या पुराव्यानुसार सोदे राज्यात पिकणारे मसाले, काळे मिरे गोव्यात विकण्यासाठी त्याने व्यवस्था केली असे दिसते. हे सर्व चालू असताना केळदी राज्याबरोबर संघर्ष कायम होताच. विजापूरच्या आदिलशाहीचा त्यावेळेस पाठींबा मिळत असे. त्यांच्या बरोबर सोदे राज्याचे स्नेहपूर्ण संबंध होते. ह्या दोघांमधील असे संबंध तयार होण्यास एक मनोरंजक घटना घडली होती. सदाशिवराय आपल्या राजधानीत, म्हणजे, सोदे नगरात यक्षगान कार्यक्रम आयोजित करत असे. असाच एक कार्यक्रम आदिलशाहच्या सरदारांनी पहिला आणि त्यांनी तो कार्यक्रम विजापूरच्या आदिलशाह याच्या दरबारात करण्यास विनंती केली. त्याने तसे केले.

सदाशिवराय यांच्या संगीत , साहित्य या बद्दल माहिती करून घ्यायचे म्हणजे, त्याने इ. स. १६७४ ते इ. स. १७१८ या दरम्यान त्याने १८ कृती रचल्या असे दिसते! ती खलील प्रमाणे आहेत. स्वरवचनगळू, समस्यापूर्ण वृत्त, राग्मालीके, पंचविशन्ति रगळी., त्रिविधी, उळीवेय महात्म्य, जोगुळ पदगळू, नवरस जक्कीणी, पंचविशन्ति मूल पद्यगळू, जावळी, भिक्षाटन लीलेय जावळी, खड्ग प्रबंध, मंगळाष्टकगळू, प्रभूलिंग लीलेय जावळी, महाचदूरंग रक्षणा, कंदपद्यगळू, सदाशिवनीती.

सदाशिवराय सामाजिक शांती, सौख्य, मौल्य, समानता या दिशेने विचार करत असत. तो लिंगायत धर्माने प्रभावित झाला होता. तो तत्वज्ञानी सुद्धा होता, त्याने आपले तात्विक विचार विविध ठिकाणी मांडून ठेवले आहेत.

संगीत तज्ञ सदशिवराय याने अनेक रागांची देखील निर्मिती केली आहे असे दिसते, आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग करत असे. महान शिवभक्त असलेल्या त्याने अनेक मंदिर निर्मिली आहेत. शिरसीचे प्रसिद्ध मुकाम्बिका मंदिर हे त्यानेच बांधले. त्याने इंडो इस्लामिक शैलीत एक हौद देखील बांधून घेतला होता, तो अतिशय मनोहारी आहे.

अश्या रीतीने कला, धर्म, राज्यकारभार, साहित्य, ह्या सर्व क्षेत्रात उत्तम कामिगिरी केलेल्या ह्या सोदे सदाशिवराय याचे महत्व तो फक्त मांडलिक असल्यामुळे कमी झाले, आणि तो विस्मृतीत गेला असे म्हणावे लागेल. ह्या राजाची कामगिरी कायम जनतेच्या डोळ्यांसमोर राहावी ह्या कारणाकरिता सोदे येथे प्रत्येक वर्षी एक इतिहास संमेलन, येथील तीन मठांच्या संयुक्त विद्यमाने, भरवले जाते, तसेच त्याच्या नावाने एक पुरस्कार प्रदान केला जातो.

(अनुवादकाची टीप: मूळ कन्नड लेखात सदाशिवराय आणि म्हैसूर घराण्याचे राजे वडियार यांच्या संबंधावर काही माहिती दिली नाही.)

कन्नड नाटक आणि मी

काही दिवसांपूर्वी कन्नड नाटक या विषयावर माझे भाषण झाले. धारवाडच्या अभिनय भारती या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली होती. हा ब्लॉग म्हणजे ते संपादित भाषण आहे. गेली चार दशके हि संस्था कर्नाटकात कन्नड नाटक चळवळीशी निगडीत आहे. पुण्यात राहून कन्नड भाषेत, त्यातही कन्नड नाटक विषयी काम करणाऱ्या चार वक्त्यांना बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह होता. प्रसिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे देखील भाषण झाले, आणि त्या कन्नड नाटकांच्या अनुवादांशी निगडीत अनुभवांबाबत बोलल्या. वेळेअभावी मी पाहिलेल्या सगळ्याच कन्नड नाटकांबद्दल खूप बोलता आले नाही. पण मी त्या त्या वेळेला लेख लिहिले आहेत, त्यांची संकेतस्थळे मी येथे दिली आहेत.

कार्यक्रम पत्रिका

तो कार्यक्रम युट्युब वर उपलब्ध आहे.

नमस्कार

सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो. माझे नाव प्रशांत कुलकर्णी, पुण्यात राहतो. पण माझे मुळ कर्नाटक, निंबाळ गावाचा. माझे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान, ज्यात मी गेली ३० वर्षे कार्यरत आहे. छंद, किंवा हौस म्हणून इतर बऱ्याच क्षेत्रात माझी लुडबुड चालू असते. मी सह्याद्री डोंगररांगांमध्ये , महारष्ट्र कर्नाटक मिळून १५० अधिक किल्ल्यांवर भटकंती केली आहे. साहित्य, संगीत, भाषा, नाटक, चित्रपट (film appreciation course at NFAI) या या क्षेत्रांत रुची आहे. माझा ब्लॉग मी चालवतो आहे, त्या द्वारे माझे लेखन सुरु असते. कन्नड भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित करण्याचा छंद आहे. २०१४ मध्ये मुंबई स्थित ग्रंथाली ने माझे अमीरबाई कर्नाटकी हे अनुवादित पुस्तक प्रकाशित केले. प्रसिद्ध अभिनेता गुरुदत्त यांच्या आईने त्याचे कन्नड भाषेतील चरित्र मी मराठीत अनुवादित केले आहे, जे या ब्लॉग वर उपलब्ध आहे. अजूनही एक दोन पुस्तकांवरकाम चालू आहे. बरीच कन्नड लेख देखील मराठीत अनुवादित केले आहेत. त्याच प्रमाणे मी मानसिक आजार क्षेत्रात देखील काम करतो (Schizophrenia Awareness Association).

मला या व्यासपीठावर बोलण्यास संधी दिल्याबद्दल श्री अशोक डंबल यांचा मी आभारी आहे. मी देखील आपल्या सर्वांप्रमाणे प्रथम विविध कलांचा एक आस्वादक आहे, रसिक आहे. त्याच नात्याने, कन्नड नाटकांच्या आस्वादाचा माझा प्रवास मी आज थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. खरे तर नाटकांप्रमाणेच कन्नड चित्रपटांबद्दल देखील मी पूर्वी माझ्या ब्लॉग वर लेख लिहिला होता (मी आणि कन्नड चित्रपट).

मी तसे पाहिले तर पुणेकरच, कारण माझे शिक्षण, व्यवसाय सर्व पुण्यातच झाले, होत आहे. पण आपल्या सर्वांप्रमाणे माझ्या वंशवृक्षाची मुळे कर्नाटकात आहेत. जन्म विजापूर(सध्या विजयपूर) जिल्ह्यातील निंबाळ या गावी(जेथे गुरुदेव रानडे यांच्या आश्रम आहे). दहावी परीक्षा दिल्यानंतर लागलेल्या सुट्टीत आईने कन्नड भाषा वाचायला(आणि थोडीफार लिहायला) शिकवले. घरी कन्नड बोलले जात असे, आणि तसेच कन्नड मासिके येत असत. ती मी थोडीफार वाचत असे अधूनमधून.

पण एकूणच साहित्य आणि तसेच विविध ललित कलांच्या अस्वादाकडे आयुष्यात मी जरा उशिराच ओढलो गेलो. पोटार्थी व्यवसाय आणि इतर संसारिक बाबी थोड्या स्थिरस्थावर झाल्यावर, २००० साली , काही निमित्ताने आधी नाटकं आणि मग इतर कलांच्या आस्वादाकडे जाणीवपुर्व लक्ष द्यायला लागलो. प्रायोगिक नाटके, तसेच व्यावसायिक नाटके पाहू लागलो. या सगळ्याचा इतिहास , एकेमकांवर झालेला प्रभाव याचा अभ्यास करू लागलो. मला आठवते, २००१ च्या सुमारास मला प्रसिद्ध नाट्यसमीक्षक वि भा देशपांडे यांचा मराठी नाट्यकोश हाती लागला. त्यात मराठी नाटकांच्या जोडीने, कन्नड रंगभूमी बद्दल, मीना वांगीकर यांचा लेख, वाचायला मिळाला. पुण्यातील स्नेहसदन येथे तसेच अलीकडे सुदर्शन रंगमंच येथे बरीच मराठी प्रायोगिक नाटके पहिली.

तशातच माझ्या इतिहासाच्या प्रेमापोटी मला २००४ मध्ये Indology अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला, आणि त्यातील विविध विषय शिकता शिकता झालेल्या वाचनामुळे मराठी-कन्नड भाषा, तसेच एकमेकांवर असलेला संस्कृती प्रभाव या बद्दल थोडेफार वाचायला मिळाले.

आणि २००७ मध्ये मी पहिल्यांदा बंगळुरास गेलो असता मी पहिले कन्नड नाटक पाहिले. ते म्हणजे प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या मंद्र ह्या कादंबरीवर आधारित असलेले आणि तेही रंग शंकर या सुप्रसिद्ध अश्या कन्नड नाट्य चळवळशी निगडीत वास्तू मध्ये. रंग शंकर हे कन्नड नाट्य, चित्रपट अभिनेते शंकर नाग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी अरुंधती नाग यांनी स्थापन केलेली संस्था. प्रायोगिक नाटके, कन्नड तसेच इतर भाषांतील नाटके, नाट्यप्रशिक्षण, या सर्व क्षेत्रात हि संस्था कायम कार्यरत असते. त्यावर्षीच्या बंगळूरू भेटी दरम्यान, कन्नड चित्रपटसृष्टीचा १९६० आणि १९७० च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या डॉ. राजकुमार यांचा कन्नड जनमाणसावर असलेला प्रभाव मी अनुभवला. पण तो वेगळा विषय आहे, कारण आज कन्नड नाटक हा विषय आहे. असो.

नंतर पुढे त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये अमोल पालेकर यांनी पुण्यात रंगसंगीत नावाचा नाट्यमहोत्सव आयोजित केला होता. त्यात अनेक कन्नड नाटकांचे प्रयोग होणार होते. एणगी बाळप्पा, तसेच आपल्या भारदस्त आवाजामुळे सुप्रसिद्ध अश्या बी जयश्री हे देखील येणार होते. एणागी बाळप्पा हे कन्नड संगीत रंगभूमी वरील मोठे नाव. गुब्बी विरण्णा सारखेच. दुर्दैवाने त्यांचे पुढे २०१७ मध्ये निधन झाले ते वयाच्या १०३ व्या वर्षी. गुब्बी विरण्णा यांची मुलगी, म्हणजे जी व्ही मालाताम्मा या देखील आल्या होत्या. मला त्या महोत्सवात बरीच नाटके माहायला मिळाली. लक्ष्मीपती, चित्रपटा, कारीमाई, चैती, गिरीजा कल्याण. तसेच कन्नड लोकरंगभूमी वरील सुप्रसिद्ध असे कृष्ण पारिजात हे लोकनाट्य देखील पाहायला मिळाले. पुढे काही वर्षांनंतर मला म्हैसूर येथील गणेश अमीन यांनी लिहिलेले एणगी बाळप्पा यांचे चरित्र भेट म्हणून पाठवले. त्याचा मी अनुवाद करत आहे. त्यात देखील तत्कालीन मराठी आणि कन्नड भागातील नाट्य व्यवहाराविषयी, होत असलेल्या देवाण घेवाणी विषयी माहिती मिळते.

त्याच वर्षी दसऱ्या निमित्त पुण्यातील कन्नड संघातर्फे एक कौटुंबिक नाटक सदर केले गेले. त्याचे नाव होते इडु जोडू. ६०-७० ह्या दशकात आलेल्या मराठी कौटुंबिक नाटकाप्रमाणेच हलकेफुलके नाटक धारवाडी कन्नड भाषेत पाहताना मजा आली होती.

२००८ मध्ये पुण्यात समन्वय तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बी व्ही कारंथ रंगमहोत्सव नावाचा एक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी देखील मला बरीच वेगवेगळी कन्नड नाटके पाहायला मिळाली होती. गिरीश कार्नाड यांचे हयवदन, डॉ. चंद्रशेखर काम्बार यांचे जोकुरस्वामी, पुतिना यांचे गोकुळ निर्गमन हि ती नाटके होत. बी व्ही कारंथ ह्यांनी नाटकांचे दिग्दर्शन नाही केले तर, त्यांनी संगीत देखील दिले बऱ्याच नाटकांना. त्याचा देखील आढावा सदर करण्यात आला होता त्या कार्यक्रमात. बी व्ही कारंथ कर्नाटकातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नाव. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्यांनी रंगायन हे नाट्यसंस्था देखील स्थापन केली आहे.

२००८ मध्ये धारवाड महोत्सव असतो असे समजले होते, पण जायला जमलेच नाही. त्यात नाटकांशिवाय इतर कला प्रकार सादर होणार होते. विविध जानपद कलांचे सादरीकरण देखील होते.

पुढे एकूणच कलाटणी देणारी घटना घडली. २००९ मध्ये एका कन्नड मासिकात (मयूर) गोहारबाई कर्नाटकी आणि बालगंधर्व यांच्या संबंधावरील लेख वाचला. त्याचे महत्व जाणून मी त्याचे मराठी मध्ये अनुवाद करून ग्रंथाली प्रकाशनचे श्री दिनकर गांगल यांना दिला. त्यांनी तो थिंकमहाराष्ट्र या पोर्टलवर प्रकाशित केला. आणि त्यामुळेच त्यांनी पुढे मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी चे चरित्र २०१४ मध्ये प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था ग्रंथाली यांनी प्रकाशित केले. ह्या पुस्तकाच्या अनुवादाने एकूणच स्वातंत्र्यपूर्व कालीन कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंध कसे होते, हिंदुस्तानी राग संगीत, संगीत नाटक यांची कशी जोपासना झाली याचा सगळा पट उलगडला.

२०१२ राजेंद्र कारंथ यांचे एक नाटक बदकील्लदवन भावगीते मी बंगळूरू मध्ये के के कला सौध रंगमंदिरात पहिले. त्याचा प्रयोग चित्तार संस्थे तर्फे आयोजित राष्ट्रीय कारंथ नाटकोत्सव कार्यक्रमात आयोजित कण्यात आले होते. इतरही नाटके त्यावेळी होणार होती, पण ती पाहता नाही आली, जसे अभिनेत्री, गंगावतरण वगैरे. पुढच्या वर्षी पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे नाटक केत्ताकथा पहिले, त्यात बी. जयश्री यांनी काम केल्याचे आठवते.

२०१५ मध्ये एकोणिसाव्या शतकातील कर्नाटकातील प्रसिद्ध कवी, नाटककार नारायणराव हुईलगोळ यांच्या चरित्राच्या एकूण खंडांपैकी एक खंड माझ्या हाती लागला. त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या भाषण त्यात दिले होते. त्यात त्यांनी मराठी रंगभूमी कशी जोमाने वाढत आहे, आणि तिचा उगम कर्नाटकातील लोकनाट्य अविष्कारात आहे हे त्यांनी ठासून नमूद केले होते.
अतुल पेठे यांचे सत्यशोधक हे नाटक मला कन्नड मध्ये देखील अनुभवण्याची संधी कन्नड संघामुळे लाभली. मी ते मराठी देखील आधी पहिले होते. हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर आहे(ता. क. महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाज संस्था सप्टेंबर २४, २०२२ तारखेला दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे) . डी एस चौगुले यांनी ते नाटक मराठीतून कन्नड मध्ये अनुवादित केले होते. त्यांचेच आणखीन एक कन्नड नाटक वखारी धूस या नावाचे अतुल पेठे सादर करणार असे त्यांनी त्या वेळेस जाहीर केले होते, पण अजून तरी ते आले नाही असे दिसते. त्याच वर्षी माझ्या बंगळूरूच्या भेटी दरम्यान महान कन्नड नाटककार श्रीरंग यांचे कत्तले बेळकू हे नाटक पाहायला मिळाले, ते देखील बंगळुरातील रंग शंकर येथेच.

२०१६ मध्ये मला कर्नाटकातील हेग्गाडू येथे निनासम मध्ये जायला मिळाले. निनासम म्हणजे निलकंठेश्वर नाट्य सेवा मंडळी के व्ही सुब्बण्णा यांनी निर्माण केलेल्या ह्या नाट्य शिक्षणाची पंढरी असलेल्या ह्या संस्थेत प्रती वर्षी आठवडाभराचा संस्कृती शिबीर नावाचा एक निवासी अभ्यासक्रम राबवला जातो. नारळा, पोफळीच्या बागा असलेल्या अतिशय रमणीय या गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील सामान्य लोकांना बरोबर घेत जात नाट्य चळवळ, नाटक कला जोपासण्याचे मोठे कार्य ह्या संस्थेने केले आहे. अश्या परिसरात वसलेल्या ह्या संस्थेत काही दिवस राहता आले हे माझे भाग्य. दररोज संध्याकाळी तेथील नाट्यगृहात विविध कन्नड नाटके (काही नवी, तर काही जुनी, क्लासिक). त्यात काम करणारे कलावंत म्हणजे निनासमचे विद्यार्थी, तसेच गावातील हौशी कलाकार. गेली कित्येक वर्षे हा प्रयोग चालू अतिशय यशस्वी पणे चालू आहे. तुमच्या पैकी कोणाला शक्य असेल तर जरुर यावे. त्याच वर्षी प्रकाश गरुड यांचे दोड्डाटा आणि सन्नाटा या कर्नाटकातील दोन लोकंनाट्य प्रकाराबाद्द्ल्चे सादरीकरण अनुभवता आले, पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी बरेच संशोधन करून या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

२०१७ लोकशाकुन्तल हे कन्नड नाटक बंगळूरू मध्ये National School of Drama च्या आवारात असलेल्या नाट्यगृहात हा दीर्घांक मी पहिला. कालिदासाच्या शाकुंतल या संस्कृत नाटकाचा के व्ही सुब्बण्णा कृत कन्नड अविष्कार तो हि याक्षगानाच्या लोकरंगभूमीच्या रुपात वेगळा अनुभव होता तो. त्याबद्दल मी ब्लॉग लिहिला होता.

२०१८ रंग शंकर मध्येच दोन नाटके पहिली. पहिले होते चित्रा, जे रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांगदा या नावाच्या बंगाली नाटकाचा इंग्लिश अनुवाद होता. दुसरे जे मी पहिले ते म्हणजे गिरीश कार्नाड यांचे milestone नाटक तलेदंड जे आपल्याला माहिती आहे कि कर्नाटकातील महान संत बसवेश्वराच्या जीवनावर बेतले आहे.

२०२१ मध्ये बंगळुरास गेलो होतो पण एकूणच कोरोना मुळे लावलेल्या निर्बंधामुळे नाटके पाहायला जाता आले नाही.
ह्या वर्षी (२०२२) मात्र एक मोठी संधी लाभली. एक-दोन महिन्यांपूर्वीच पुण्यातील कन्नड संघ ह्या संस्थेतर्फे भैरप्पा यांच्या पर्व या महाकादंबरी वर आधारित एक महानाट्य याचा एक प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याच कन्नड संघातर्फे मी पूर्वी कधीतरी गुढी पाडव्याच्या वेळेला यक्षगानचा प्रयोग पहिला होता. जवळ जवळ सात तासांचा हा महाप्रयोग कुठेही कंटाळवाणा होत नाही. विषय आहे महाभारत आणि भैरप्पांनी त्या मधील स्त्री पात्रांच्या बाजूने मांडलेले विचार हे प्रयोगात खिळवून ठेवतात. महाभारतावरील नाटक, तेही एवढे मोठे, त्यावरून प्रसिद्ध नाटककार पीटर ब्रूक्स यांच्या इंग्रजी नाट्यप्रयोगाची आठवण होते. त्या बद्दल मी वाचले आहे, प्रयोग पाहिलेला नाही. त्यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील कन्नड संघ हि संस्था कित्येक दशकांपासून पुण्यातील कन्नड भाषिक लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करते आहे.

तुफान लोकप्रिय अश्या मुख्यमंत्री या कन्नड नाटकाचा प्रयोग देखील मी पुण्यातच पहिला होता, कधी ते आठवत नाही. कन्नड संघ तर्फेच तो आयोजित केला गेला होता. मुख्यमंत्री चंद्रु या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांची भूमिका अगदी इरसाल रीतीने केली होती, ते पाहून मला निळू फुले यांच्या इरसाल राजकीय भूमिका आठवत होत्या.

असा हा माझा आतापर्यंतचा कन्नड नाटकांच्या अनुभवांचा प्रवास. अजूनहि बरीच नाटके पहायची आहेत, बरेच अनुवाद प्रकल्पांवर काम करायचे आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल अभिनय भारती(धारवाड) संस्थेचे आभार आणि सर्व श्रोत्यांचे देखील आभार. मला वाटते पुढील सोमवारी कथावाचनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, ठीक ७ वाजता. पुन्हा भेटू!

कृष्णवर्णीय चळवळ आणि तीन चित्रपट

अमेरिकेत फेब्रुवारी महिना हा National Black History Month म्हणून साजरा केला जातो. शतकानोशतके अमेरिकेत कृष्णवर्णीय जनतेला मिळणारी दुय्यम वागणूक, अत्याचार होत आहेत, अजूनही होत आहेत. कृष्णवर्णीय लोकांनी या विरुद्ध आवाज उठवला, गेली शंभर वर्षे होत असलेल्या विविध चळवळी, घटना याची साक्ष देतात. महात्मा गांधी यांच्या जीवनामुळे, आदर्शामुळे प्रेरित मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांनी उभारलेल्या अहिंसक चळवळचे मोठे योगदान आहे. त्याच प्रमाणे Black Panther या क्रांतिकारी, हिसंक चळवळीचे पण महत्वाचे स्थान आहे. आपल्याला माहित असेलच कि याच मुळे प्रेरित होऊन आपल्याकडे भारतात राजा ढाले आणि नामदेव ढसाळ, तसेच इतरही काही जणांनी Dalit Panther हि दलित चळवळ उभारली(ज्याला नुकतेच पन्नास वर्षे झाली). योगायोगाने इतक्यातच मी तीन इंग्रजी चित्रपट पहिले, जे या कृष्णवर्णीय लोकांनी उभारलेल्या चळवळीतील, संघर्षाचा सामना केलेल्या काही विशिष्ट प्रसंगांवर बेतलेले आहेत. त्याबद्दल थोडेसे लिहायचे आहे.

पहिला चित्रपट आहे The Best of My Enemies या नावाचा. हा आहे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय मुलांच्या शाळा करण्याबद्दल दिलेला लढा याबद्दल आहे. या चित्रपटाद्वारे तर conflict management या विषयाचा पाठच दिला आहे असे मी माझ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवावरून सांगू शकतो. ह्याचे कथानक घडते ते नॉर्थ कॅरोलिना राज्यातील Durham गावात. तो काळ Segregation Era चा होता. कृष्णवर्णीय लोकांना समाजात वेगळे केले जात होते. हॉटेल्स, रेल्वे, बस, शाळा येथे त्यांना श्वेतवर्णीय लोकांबरोबर उठता बसता येत नसे. Jim Crow Laws नावाचे कायदे या मागे होते. हा चित्रपट एका कृष्णवर्णीय मध्यमवयीन महिला आणि एका श्वेतवर्णीय पुरुष यांच्या मधील मतमतांतराची कहाणी आहे. या कृष्णवर्णीय महिलेच्या मुलीची वेगळी अशी जी शाळा असते, ती एकेदिवशी आगीत जळून जाते. त्या शाळेत शिकणाऱ्या कृष्णवर्णीय मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आता उपस्थित होतो. Jim Crow Laws मुळे आणि श्वेतवर्णीय लोकांच्या विरोधामुळे त्या मुलांना इतर गोऱ्या मुलांबरोबर शिकू देत नाहीत. या दोन गटात वितंडवाद होतात, विसंवाद असतोच, तो आणखीन वाढीस लागतो. गावातील गोऱ्या लोकांच्या गटाचे नेतृत्व हे Ku Klux Klan या उग्रवादी चळवळीच्या संघटनेतील व्यक्तीकडे असते. हि संस्था कट्टर वंशवर्चस्ववादी विचारसरणीची (white supremacy)असते. दोन्ही गटातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यात सुसंवाद घडवण्याचे काम एका मध्यास्थाकडे सोपवले जाते. तो ज्या पद्धतीने दोन्ही गटांमध्ये समन्वय घडवून आणतो, मुलांच्या भवितव्यासाठी चर्चेने एकमताने निर्णय घेण्यास कसे भाग पडतो हे पडद्यावर पाहण्यासारखे आहे.

दुसरा चित्रपट आहे Judas and Black Messiah या नावाचा. हा आहे Black Panther विषयी. अर्थात हा चित्रपट तिचा इतिहास सांगत नाही, तर तिच्या एका महत्वाच्या नेत्याच्या अल्पायुषी जीवनातील काही नाट्यमय कालखंडाची कहाणी आहे. तशी हि संघटना, चळवळ जेमतेम २०-२५ वर्षे सुरु होती. १९६६ मध्ये कॅलिफोर्नियात सुरु झालेल्या ह्या चळवळीत शिकागो मध्ये Fred Hampton नावाचा तरुण शिरतो आणि स्थानिक नेता बनतो. त्याचा नारा असतो तो म्हणजे क्रांती; सुधारणा वगैरे गोष्टी नाही. समाजवादी विचारांचा प्रभाव, आणि एकूणच जहाल विचार आणि कृती, कायम पोलिसांविरुद्ध संघर्ष यामुळे अमेरिकेन सरकारच्या रडार मध्ये ती संस्था येते. बिल नावाच्या कृष्णवर्णीय भुरट्या चोराला पोलीस एक मोटार चोरताना अटक करतात. आणि पोलीस त्याला शिक्षा म्हणून तुरुंगवास किंवा ते नको असल्यास Black Panther मध्ये छुप्या रीतीने जाऊन त्यांच्यात सामील असल्याचा वरवर देखावा करून, आतील गोटातल्या बातम्या पोलिसांपर्यंत पोहोचावायाच्या. खबरी म्हणून काम करायचे. तो तसे करायला तयार होतो. त्यात मग Fred Hampton चे प्रेमप्रकरण, त्याला काही शुल्लक कारणासाठी अटक आणि तुरुंगवास, त्याने केलेली धडाकेबाज, प्रक्षोभक भाषणे हे चित्रपट पाहताना खिळवून ठेवते. तसेच बिलच्या मनाची अवस्था, त्याचे अस्वस्थ होणे, घालमेल होणे, एकीकडे जीवाची भीती, दुसरीकडे Black Panther चे काम देखील करायचे हे उत्कृष्टपणे दाखवले आहे. वास्तव जीवनातल्या बिलने १९८९ मध्ये एका मुलाखतीत त्याने असे केल्याची कबुली दिली, आणि दुसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली. Fred Hampton ची बिलच्या खबरींच्या मदतीने हत्या पोलीस करतात, त्यावेळी तो अवघा २१ वर्षांचा होता.
आता थोडेसे या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल. ख्रिश्चन धर्माच्या इतिहासात (New Testament) ज्युडसचा संदर्भ येतो. येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यांपैकी (apostle) तो एक होता. त्याने लाचखोरी करून येशूला अटक घडवून आणली (आणि पुढे येशूला क्रुसावर चढवले जाते) असा इतिहास सांगतो. चित्रपटात बिल देखील ज्युडसप्रमाणे विश्वासघातकी वागतो, जेणेकरून फ्रेड (जो black messiah आहे) मृत्यूमुखी पडतो.

तिसरा चित्रपट आहे BlacKkKlansman या नावाचा, जो कृष्णवर्णीय Black Pantherआणि तसेच श्वेतवर्णीय Ku Klux Klan या दोन्ही उग्रवादी चळवळीच्या वर पोलिसांनी छुपे पद्धतीने कशी नजर ठेवली जात होती याबद्दल आहे. हे म्हणजे Judas and Black Messiah चित्रपटात दाखवले आहे त्याच्या वरताण छुपी हेरगिरी झाली. येथे खुद्द पोलीसच त्या त्या गोटात जाऊन हेरगिरी करतात. हा चित्रपट घडतो कॉलोराडो राज्यात, कॉलोराडो स्प्रिंग्स गावात. एक कृष्णवर्णीय तरुण पोलीस खात्यात रुजू होतो. त्याच सुमारास समान नागरी हक्कांसाठी कृष्णवर्णीय जनतेची स्थानिक चळवळ जोमात सुरु असते, त्यांचा पोलिसांशी संघर्ष होत असतो. त्यांच्यावर नजर ठेवण्यास ह्या तरुणास त्यांच्या गटात सामील होण्यास सांगितले जाते, आणि तसे तो करतोही. एक कृष्णवर्णीय तरुणीशी मैत्री होते. Ku Klux Klan ह्या संस्थेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी देखील एका गोऱ्या पोलिसाला त्यांचा कडे पाठवले जाते आणि तो पोलीस त्यांचा विश्वास संपादन करतो. ह्या दोन्ही संघटना एकमेकांविरुद्ध कारवाया करत असतात, त्या थोपवण्यासाठी पोलिसांना अश्या गनिमी काव्याचा आधार घ्यावा लागला. कृष्णवर्णीयांच्या एका मोर्च्यावर Ku Klux Klan बॉम्बहल्ला करणार आहे याची कुणकुण कृष्णवर्णीय पोलिसाला लागते. आणि त्यापासून कसा बचाव केला जातो हे पाहण्यासारखे आहे.

हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांना त्या चळवळीच्या काळात नेतात आणि थोडेसे सजग करतात, इतिहासाबद्दल आपल्या जाणीवा विस्तार करायला मदत करतात. हा इतिहासच इतका मोठा आहे, आणि अनेक जण, संघटना, संस्था, विविध घटना देशभरात घडल्या. बऱ्याचशा माहिती आहेत, अजून बऱ्याच गोष्टी अधूनमधून उजेडात येत असतात. परवाच एका कृष्णवर्णीय असलेला Jackson Giles या अलाबामा मधील टपाल ख्यात्यातील कर्मचाऱ्याची कहाणी समोर आली, ज्याने कृष्णवर्णीय लोकांविरुद्ध असलेले कायद्यांना (Jim Crow laws) आव्हान दिले. मला वाटते हिटलरने ज्यू धर्मीय नागरिकांचा ज्या प्रमाणे अपरिमित छळ केला त्याच्या अनेक जणांनी सांगितलेल्या हकीकती, आठवणी आहेत, अजूनही येत असतात, तसेच कृष्णवर्णीयांच्या लढ्यात सहभागी असलेल्या व्यक्ती, संस्था यांच्याबद्दल नवीन नवीन कायमच बाहेर येत असते. दुसरे म्हणजे कृष्णवर्णीय समाजावर अजूनही काहीनाकाही नकोश्या घटना घडत असतात (जसे नुकतेच George Floyd प्रकरण घडले) , जेणेकरून हा प्रश्न अजून संपलेला नाही हे अधोरेखित झाले आहे. बालगुन्हेगारांच्या साठी असलेल्या बालसुधारगृहात होत असलेल्या अत्याचाराविषयी(त्यातही कृष्णवर्णीय मुलांच्यावर) एक पुस्तक वाचले होते, त्याबद्दल (The Nickel Boys) लिहिले आहे, जरूर वाचा!

The Nickel Boys

मी सध्या अमेरिकेच्या फिरतीवर आलो आहे. सिएटल शहरात आहे. आपल्या आसपास जो समाज आहे त्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती करून घ्यायचे असेल तर बातम्यांशिवाय पर्याय नाही. त्या साठी दोन मुख्य स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी. मी येथील दूरचित्रवाणी वरील अनेक वाहिन्यांवरील सकाळचे कार्यक्रम पाहत असतो. येथील हवामानावरील आणि वाहतूकीवरील बातम्या तर इतक्या खोलवर असतात, अथक काथ्याकुट करतात, ते सगळे मनोरंजक असते. बातम्या पाहताना दररोज किमान पक्षी gun shooting वर एखादी बातमी असतेच असते. अमेरिकेत इतक्या वर्षांनतर देखील येथील आफ्रिकन-अमेरिकन (कृष्णवर्णीय) लोकांवर होत असलेल्या अत्याचारांवर देखील बातम्या असतात कायमच. एके दिवशी बातमी आली कि सिएटल जवळच्या डोंगराळ वनक्षेत्र असलेल्या एका भागात बाल गुन्हेगारांसाठी असलेल्या सुधारगृहातून ५ मुले फरार झाले, अर्थात ते नंतर एक दोन दिवसात सापडले देखील (Five teenagers, serving sentences for various felonies, attacked several staff members at Echo Glen Children’s Center near Snoqualmie and escaped). आणि या घटनेमुळे मी नुकत्याच अश्याच विषयावर Seattle Public Library मधून आणलेले एक पुस्तक वाचले होते त्याची आठवण ताजी झाली. ती मुलं का पळून गेली असतील, ते सुधारगृह कसे चालवले जात होते, ह्या अश्या गोष्टींवर आता चर्वण होत आहे.

हि कादंबरी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात असलेल्या अशाच एका बालसुधारगृहात घडलेल्या घटनांवरून प्रेरित होऊन लिहिलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे The Nickel Boys आणि लिहिले आहे ते Colson Whitehead यांनी. ते स्वतः आफ्रिकन-अमेरिकन आहेत. गेल्या वर्षी Amazon Prime वर मी The Underground Railroad नावाची एक वेबसेरीज पहिली होती(ती अमेरिकेतील गुलामांच्या स्थितीवर होती). हे पुस्तक वाचताना समजले कि ती वेबसेरीज Colson Whitehead यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होती. The Nickel Boys कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिकेत बालसुधारगृहांना juvenile detention center किंवा reform school असे म्हणतात, आपल्याकडे remand home किंवा brostal school अशी देखील संज्ञा आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात Dozier School for Boys नावाचे बालसुधारगृह होते. १९९० मध्ये सुरु झालेले हे बालसुधारगृह २०११ मध्ये शंभर वर्षानंतर, कायमचे बंद करण्यात आले. त्यात झालेल्या अत्याचारामुळे मृत्यू पावलेल्या मुलांच्या बाबतीत घडेल्या गोष्टींबद्दल पुरातत्वीय संशोधन झाले, तेथून पलायन केलेल्या मुलांपैकी काही जणांनी आपले अनुभव पुस्तकरूपाने बाहेर आणले आहेत. त्यातील बहुतांश मुले आफ्रिकन-अमेरिकन आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काळे-गोरे ह्या वंशवादाचे स्वरूप देखील आहे. या सगळ्यातून वाचलेल्या मुलांनी आपले अनुभव कथन करण्यासाठी एक संकेत स्थळ (TheOfficialWhiteHouseBoys) देखील चालवले आहे, याचा उल्लेख लेखक ऋणनिर्देशात करतो. पण ते काही कारणाने चालत नाही. मला दुसरे TheWhiteHouseBoys नावाचे संकेत स्थळ सापडले, याच नावाचे Roger Dean Kiser यांचे अनुभवकथन असलेले एक पुस्तक आहे, संकेतस्थळ देखील तेच चालवतात.

एल्वूड कर्टीस नावाच्या होतकरू आफ्रिकन-अमेरिकन मुलाच्या आयुष्यातील घटना ह्या कादंबरीत आहेत. १९६० मध्ये त्याला त्याने न केलेल्या एका गुन्ह्यात अटक होते आणि त्याला शिक्षा होऊन निकेल अकादमी नावाच्या बालसुधारगृहात रवानगी होते. तेथे त्याला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते (त्यातील अनेक अनुभव तो एक कृष्णवर्णीय असल्यामुळे आलेले होते). त्याच्यावर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर या कृष्णवर्णीयांसाठी, समान नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्याच्या विचारांचा, आंदोलनाचा प्रभाव असतो. त्याच्या मनात खदखद सुरु असते. ते सगळे आणि त्याच ठिकाणी असलेला टर्नर नावाचा त्याचा एकमेव मित्र यांच्यातील संबंधांबद्दल हि कादंबरी आहे. एका सरळ रेषेत न जाता, सध्याच्या काळात आणि गतकाळात फिरणारी अशी ह्या कादंबरीची रचना आहे. अनेक संदर्भ, भाषा देखील थोडीशी वेगळी असल्यामुळे कादंबरीतील प्रसंग परत परत वाचून समजावून घ्यावे लागले, पण अतिशय मनस्वी कथानक असलेले हे पुस्तक आहे, आणि एकूणच आजकाल जे Black Lives Matter (BLM) नावाची चळवळ नव्याने सुरु आहे त्याबद्दल देखील अजून प्रकाश पाडते. योगायोगाने, गेल्यावर्षी जुन २०२१ मध्ये सिएटल मधील Capitol Hill भागात BLM चळवळीने उग्र रूप धारण केले, आणि आंदोलकांनी Capitol Hill Autonomous Zone तयार केला होता. तो भाग मी बघायला गेलो होतो परवा.

कादंबरीची सुरुवात आजच्या काळात होते. एल्वूड कर्टीस हा न्यूयॉर्क शहरात राहतोय. त्याच्या गतकाळातील विशेषतः निकेल अकादमीच्या अनुभवांवर तो मूक आहे. तो तिकडे परत कधी गेलाहि नाही. जेव्हा त्याला समजते कि अकादमी मधून मृत मुलांची थडगी बाहेर काढून पुरातत्वीय तपास चालू आहे तेव्हा तो फ्लोरिडा जाऊन आपली कहाणी सांगायचे ठरवतो. आणि कादंबरी १९६०च्या दशकात आपल्याला घेऊन जाते, त्याच्या बालपणीच्या जीवनात. शाळेत हुशार असलेला हा मुलगा फ्लोरिडा राज्यात फ्रेंचटाऊन या काळ्या लोकांच्या वस्तीत, आपल्या आजीसोबत राहतो आहे. आई वडील ह्या जगातून त्याला सोडून गेले आहेत. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या भाषणांचा, लेखनाचा त्याच्यावर प्रभाव आहे. आजीला मदत म्हणून एका हॉटेल मध्ये तो कामही करतो आहे. तेव्हापासूनच त्याला काळ्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध त्याच्या मनात रोष असतो, तो अधूनमधून प्रकट देखील होत असतो. त्यांच्या शैक्षिणिक प्रगतीमुळे त्याला महाविद्यालयात लवकर प्रवेश मिळतो. एके दिवशी दुसऱ्या एकाबरोबर महाविद्यालयात गाडीतून जात असताना पोलीस अडवतात आणि त्याच्यावर गाडी चोरल्याचा खोटा आळ येऊन त्याला अटक होते आणि मग निकेल अकादमी या रिमांड होम मध्ये पाठवले जाते.

तिथे गेल्यानंतर त्याला अनेक अतिशय वाईट अनुभव येतात, तो त्याला जमेल तसे , मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अत्याचारांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो. मनाशी ह्या दलदलीतून बाहेर पाडून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो. टर्नर नावाचा समविचारी मुलाशी मैत्री होते. अमेरिकेतील काळ्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक देणारे कायदे होते, काही दशकांपूर्व, जे Jim Crow Laws नावाने जायचे. त्याचा उल्लेख कादंबरीत कथानकाच्या ओघात येतो, कारण १९६० च्या दशकात ते प्रकार अमेरिकेत दक्षिणेकडील अनेक राज्यांतून अजुनही सुरु होते. अनेक ठिकाणी कादंबरीत एल्वूड कर्टीस ह्या सगळ्या परिस्थितीबाबत विचार करताना दाखवले आहे. साहित्यात संज्ञाप्रवाह (stream of consciousness) नावाचा प्रकार आहे, तसे काहीशी कथनशैली आहे. तसेच एके ठिकाणी Ku Klux Klan नावाच्या कट्टर वंशश्रेष्ठवादी(white supremacy) संघटनेचा उल्लेख येतो, जी गुप्तपणे कृष्णवर्णीय लोकांवर असीमित अत्याचार करत असते. निकेल अकादमीच्या अधिकारी आणि शिक्षक ह्या संघटनेच्या सभांना जातात ह्याची टर्नरला खात्री वाटत असते(मी इतक्यातच नेटफ्लिक्स वर The Best of Enemies नावाचा चित्रपट पहिला होता. तो काळ्या आणि गोऱ्या मुलांकरिता वेगवेगळ्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण school integration करण्याच्या, त्यांच्या एकत्रपणे शिक्षणाच्या बाबतीत आहे. त्यात Ku Klux Klan संघटनेची एक व्यक्ती आणि एक आफ्रिकन-अमेरिकन स्त्री यांच्यातील संघर्ष चित्रित केला आहे). निकेल अकादमीच्या अधिकारी आणि शिक्षक करत असलेला भ्रष्टाचार ते दोघे अनुभवतात. एल्वूड आणि टर्नर दोघेही तेथून पळून जाण्याचा निर्धार करतात आणि एक दिवशी तसे करतातही. तेथे कादंबरी नाट्यमयरित्या वळण घेते. ते काय आहे समजायला पुस्तक वाचावे लागेल. तसेच पुढे या दोघा मित्रांचे काय होते हे समजायला पुस्तक वाचणे श्रेयस्कर!

या कादंबरीला बालसुधारगृहातील दयनीय परिस्थिती हा एक पदर आहेच, पण मुख्य गोष्ट आहे ती वंशद्वेषाची. एल्वूडच नव्हे तर त्याचे आजी, आणि आई-वडील यांना सुद्धा अत्याचारांना सामोरे जावे लागले होते असे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत. Jim Crow कायद्यांमुळे काळ्या लोकांना दुय्यम वागणूक, दर्जा होता. गोरा मनुष्य जर समोरून येत असेल तर काळ्या माणसाने बाजूला होऊन त्याला वाट द्यावी असा नियम होता(avoid bumptious contact). अजून एक छोटासा पदर आहे तो त्याच्या आणि आजीच्या प्रेमळ नात्याचा, आजीने त्याला दिलेले संस्कार, लढण्याचे बळ हे सगळे एल्वूड ठिकठिकाणी आठवत राहतो.

असो. भारतात आपल्याकडे बालगुन्हेगारांबद्दल विशेष बातम्या येत नाहीत. अर्थात त्याचा अर्थ तश्या घटना घडत नाहीत असे नाही. आपल्याकडेहि बालसुधारगृह आहेत. आणि एकूणच असे दिसते कि त्यांची देखील परिस्थिती काही चांगली नाही. त्या ठिकाणी देखील अनेक वाईट साईट घटना घडतात, मुलांचे अनेक प्रकारे शोषण देखील होते, तेथेही अनेक प्रश्न असतील. त्या सगळ्याला देखील विविध पदर नक्कीच असतील. या बद्दल कुठे कधी विशेष असे वाचायला किंवा पाहायला अजूनतरी मिळालेले नाही. योगायोगाने अमेरिकेत फेब्रुवारी महिना Black History Month म्हणून साजरा केला जातो. अनेक कर्यक्रम, जनजागृती होतात. या निमित्ताने आपणही ह्या त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती करून घेण्यास हरकत नाही. मी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या इतिहासाबद्दल असणाऱ्या एका संग्रहालयात गेलो होतो.

नागरिक/सैनिक, भाग#३

गिरीश कार्नाड यांचे एक कन्नड पुस्तक आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) हे मी सध्या भाषांतरित करत आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा, व्यक्तिचित्रांचा, वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. बरेच लेख मूळ कन्नड भाषे मधीलच आहेत. काही इंग्रजी मधील आहेत, ते त्यांनी कन्नड मध्ये भाषांतरित करून पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

त्या पुस्तकातील एक लेख म्हणजे अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९८ मध्ये झाले, त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण होय. ते मूळ कन्नड मधील आहेत. त्यांनी एक टीपण देखील जोडलेले आहे. संमेलनाच्या वेळी त्यांना सरोज देशपांडे यांनी मराठीत भाषांतर करून दिले होते असे त्यांनी त्या टिपणात नमूद केले आहे. भाषणाचे मराठी भाषांतर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी पुस्तकात नक्की असणार. असे असले तरी, मी माझे भाषांतर ह्या टिपणाच्या भाषांतराच्या बरोबर केले आहे (त्या मूळ टिपणातील संवेदनशील असा भाग मी ब्लॉग मधून वगळला आहे). ते आज ह्या ब्लॉगच्या रूपाने देत आहे. ब्लॉगच्या सोयीकरता मी काही भागात विभागून देणार आहे. आज तिसरा आणि शेवटचा भाग देत आहे. आधीचे दोन भाग येथे आणि येथे आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये ९५ वे अखिल मराठी साहित्य संमेलन येऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठी वाचकांना आवडेल असा विश्वास वाटतो आहे. तसेच त्यांचे कन्नड मराठी अनुबंधाविषयी मांडलेले विचार देखील आवडतील.

नागरिक/सैनिक

आपण सत्तेवर असलेल्या पक्षाच्या सरकारला पायउतार करू शकतो. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बदलू शकतो. प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे. तसे करण्याच्या आधी त्याने आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे. समाजातील ‘विचारशील’ घटकाने नागरिकांना अधिकार बहाल केले आहेत.

सैनिकाचे उदाहरण जर डोळ्यासमोर ठेवले तर नागरिकांच्या ह्या मुलभूत जवाबदारी कडे कानाडोळा केल्या सारखे होईल.

एखादी व्यक्ती गणवेश का परिधान करते? गणवेश परिधान करून सगळ्यांसारखे दिसावे हा हेतू. पथकात कवायत करताना सगळ्यांचे चालणे, हात पाय हलवणे हे सारखे होणे अपेक्षित असते. वेगळेपणा, स्वतंत्रपणा ह्या गोष्टींना येथे स्थान नाही. सैनिक स्वतंत्र व्यक्ती नसतो. तो यांत्रिक रचनेचा भाग असतो. तो देखील यंत्रवत होऊन जातो. तो काहीहि प्रश्न विचारात नाही. केवळ हुकुमाचे पालन करतो.

भाषा देखील यांत्रिक होऊन जाते. एक बटन दाबल्यावर पथक जगाच्या जागी थांबते. अजून एखादे बटन दाबल्यावर सलाम ठोकते. परत दाबल्यास सगळे एकसारखे पाय टाकून पुढे जातात. भाषा अर्थपूर्णपणे वापरण्याची गरज तेथे कोणालाच असत नाही.

भारता सारख्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे व्यक्तित्व त्याला हव्या त्या रीतीने घडवायला, निर्णयक्षमता आणखी वाढवण्यास अवसर असतो. असे असताना मनुष्यासारखे जगण्याच्या एवजी यंत्रवत जगण्याचे आकर्षण जर कोणाला वाटत असेल तर, काहीतरी गडबड आहे हे नक्की.

नागरिकाने जर सैनिकासारखे वागले तर त्याला मिळणारी सर्वात मोठी मानसिक समाधान म्हणजे साऱ्या सामाजिक, नैतिक जवाबदारीमधून सुटका हि होय. मानवीयतेच सर्वात मोठे लक्षण कुठले असेल तर निवड करण्याचे स्वातंत्र्य असे आपल्याला अस्तित्ववाद सांगतो. माझी नैतिक मुल्ये मी माझ्या आतून आली पाहिजेत. महात्मा बसवेश्वर यांनी सांगितल्या प्रमाणे, अंतरंगातील स्पंदन बहिरांगात कृतीशील झाले पाहिजे.

मला जर कोणी सांगितले कि शेजारच्या माणसाला मारून ये, तर मी विचारेन कि का रे, बाबा, असे मी का बरे करावे? ‘कारण द्या’, असे म्हणतो. पण मी जर सैनिक असतो तर, मी तसे विचारात बसणार नाही, मी हुकुमाची तालीम करणार, जरी मला माहिती असले कि शेजारचा निरपराधी आहे ते.

दुसरे महायुद्ध संपताना नाझी लोकांनी यहुदी समाजाच्या हत्याकांडा सामील होण्याचे कारण असे दिले कि, त्यांना तशी आज्ञा होती.

फक्त आज्ञापालन हे यांत्रिक रित्या होते असे नाही, तर, सारा मनोव्यापारच यंत्रवत झालेला असतो. आपण, आपले विरुद्ध ते, त्यांचे, हे बरोबर कि चूक हे विचारण्याची गोष्टच उरत नाही. आपण कायमच बरोबर असतो. हे स्वीअकारायला जर ते तयार नसतील तर आम्ही त्यांना सक्तीने आमचे बरोबर आहे हे स्वीकारायला भाग पाडू.

असे जर असेल तर ते कोण आहेत? मजेशीर गोष्ट म्हणजे ते कायमच दुसरे लोकं असतात. आपली गोष्ट जे कोणी ऐकत नाहीत ते सगळे यात येतात.

आपण, ते. या सर्वनामात बहुवचन आहे. त्यामुळे सार्वजनिक हिंसा सुलभ होऊन जाते.

एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती जर शस्त्रास्त्रे निर्मितीवर अवलंबून असेल तर, ती कोणाला तरी लागतील अशी परिस्थिती निर्माण, व्यवस्था निर्माण करणे त्या देशांच्या सरकारचे आद्य कर्तव्य आहे. म्हणजे सारखी युद्धे व्हायला हवीत. हाच न्याय मनुष्य बळाला देखील लागू आहे. सैनिकांच्या उपजीविकेसाठी संघर्ष निर्माण करावा लागतो. पण हे सैनिक कायमच बाहेरच्या शत्रूंशी लढण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील वैरी शोधावे लागतात. आत्मसंरक्षण करण्याचे समर्थ नसणारे, अल्पसंख्यांक, छोटे-मोठे समुदाय ह्याच्यावर निशाणा साधला जातो.

एकदा निर्माण झालेली हिंसा स्वतःहून क्षमत नाही. ती आणखीन वाढते, मोठी होते. विचारशक्तीच नष्ट करणाऱ्या लष्करी आदर्श असल्यामुळे, विचार करण्याचे धैर्य दाखवणारे वैरी होतात. ते वेगळे होण्याचे पाहत असतात. त्यांना धडा शिकवायची गरज निर्माण होते.

हिटलरच्या गुप्त पोलिसांचा प्रमुख फिल्ड मार्शल हर्मन गोलिंग एकदा म्हणाला होता, ‘संस्कृती हा शब्द ऐकला कि मी माझा ब्राउनिंग शोधतो’. येथे ब्राउनिंगचा अर्थ इंग्लिश कवी रॉबर्ट ब्राउनिंग नव्हे, तर, ब्राउनिंग नावाच्या कंपनीचे एक पिस्तुल होय. चैतन्यशील संस्कृतीचे वातावरण अत्याचार करण्याच्या प्रवृत्तीला पुरून उरेल ह्ये त्याला चांगलेच माहित होते.

हिटलर, स्टालिन, माओ सगळे सारखेच! आपल्याच समाजातील चित्रकाराचे रेखाचित्र हे शत्रूच्या हातातील अणुबॉम्ब पेक्षा अधिक विनाशकारी असू शकते. तो चित्रकार आपलाच, जवळचा असतो त्यामुळे अधिक विनाशकारी असतो.

रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता आहे:

Where the mind is without fear
and the head is held high
Where knowledge is free…
Into that haven of freedom, my Father,
let my country awake.

टागोरांनी हि कविता जेव्हा केली तेव्हा आपला देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. तरीसुद्धा ब्रिटीश सरकारने ह्या कवितेवर बंदी आणली नाही. त्या कविताला कधी धोका आहे, माहिती आहे का? आजच्या परिस्थिती मध्ये, दुर्दैवाने. आणीबाणीच्या काळात हि कविता वर्तमानपत्रात छापण्यास बंदी होती.

ह्याच आजच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागातर्फे दिल्लीत एक बैठक बोलावली गेली होती, काही वर्षांपूर्वी. त्या बैठकीला सत्यजित राय, हृषीकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मला आणि इतरही काही जणांना आमंत्रण होते. त्या बैठकीत आम्हाला देण्यात आलेली माहिती अशी होती कि आपल्या समजात दलितांवर तसेच स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे कुठलेहि पुरावे नाहीत. आपला समाज हा अत्यंत सहनशील समाज आहे. त्यामुळे चित्रपट ह्या अश्या विषयांपासून दूरच असावेत!

आज्ञापालन हे सैनिकाचे जीवन असावे, ह्या करिता सत्तेतील नेते प्रयत्नशील असतात, त्याचे ते ध्येयच असते. त्यामुळे राजकारणात शिरलेले हे लष्करी मनोवृत्ती आपल्या उद्देश सध्या करण्यासाठी जनतेला पवित्र वाटावे, आत्मीयता वाढावी, या करिता, धर्म, भाषा, इतिहास या गोष्टींचा उपयोग केला जातो.

प्राचीन ग्रीस मध्ये आपल्याला दोन प्रकारची राजकीय संघटना होत्या असे दिसेल. स्पार्टा आणि अथेन्स. स्पार्टा मधील प्रत्येक नागरिक हा सैनिक असणे आवश्यक होते. लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या माता-पित्यांपासून दूर नेऊन त्यांना निर्दयपणे लष्करी प्रशिक्षण दिले जात असे.

अथेन्सचे नागरिक देशावर काही संकट आले, आक्रमण झाले कि युद्धावर जात असत. शूरपणे ते लढत असत. पण शांतीच्या काळात एका मुक्त प्रजा-राज्याची जवाबदारी ते समर्थपणे पार पडत असत. प्रत्येकाला एखादे सार्वजनिक पद मिळत असे आणि त्यांनी त्या पदाची जवाबदारी पार पडायची असे होते. महत्वाच्या विषयांवर समस्यांवर सार्वजनिक चर्चा होत असत.

आपण आजही अथेन्सची आठवण काढत असतो. त्यांची शिल्पकला, तत्वज्ञान, इतिहासकार, नाटककार यांचे काम आठवते. स्पार्टाने आपली पद्धत बदलली नाही, त्यामुळे काळाच्या ओघात ते नामशेष झाले.

हि अत्याचारी प्रवृत्ती स्वतःच्या आसपास सगळे नष्ट करते, त्यानंतर स्वतःकडे वळते आणि ड्रागन सारखे स्वतःलाच गिळून टाकते.

चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी सांगितलेली एक छोटीसी गोष्ट सांगून मी माझे बोलणे थांबवतो. हि कथा त्यांना चार्ली चाप्लीन याच्या एका पुस्तकात मिळाली होती.

एका राजकीय अपराध्याला देहांताची शिक्षा ठोठावण्यात येते. त्याला मारण्यासाठी सैनिकांचे एक पथक तयार असते.(आपल्याला माहित असेल कि अश्या पथकात आठ ते दहा सैनिक असतात, जेणे करून आरोपीला मारल्याची भावना कोणा एकालाच होऊ नये). शिक्षा रद्द होईल अशी आशा होती. त्यामुळे त्या पथकाचे अधिकारी माफीचे आज्ञापत्र घेऊन येणाऱ्या दूताची वाट पाहत होते. पण दूताचा पत्ता नव्हता.

वेळेचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याने सैनिकांना सिद्ध राहण्यास बजावले. ते ऐकताच सगळे सैनिक एकाच यंत्राचा भाग असल्यासारखे तयारीत उभे राहिले.

तेवढ्यात एका दूताच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. ते पाहून अधिकाऱ्याने सैनिकांना थांबायला सांगितले. त्या सगळ्या सैनिकांनी एकदम हात मागे घेतले.

आता हि फक्त कथा नाही. आपण जर जागृत राहिलो नाही तर, येणाऱ्या काळात आपले भवितव्य काय आहे याची नांदीच आहे असे म्हणावे लागेल.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मला बोलावल्याबद्दल, सन्मान केल्याबद्दल मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आज तीन जानेवारी आहे. आपण नवीन वर्षात नुकतेच पाउल टाकले आहे. हे वर्ष विधवांसाठी नव्हे तर, मानवतेसाठी ओळखले जाऊदे अशी मी अशा करतो आणि तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो.

[सौजन्य: मातुकते फेब्रुवारी १९९८]

(समाप्त)