The Nickel Boys

मी सध्या अमेरिकेच्या फिरतीवर आलो आहे. सिएटल शहरात आहे. आपल्या आसपास जो समाज आहे त्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती करून घ्यायचे असेल तर बातम्यांशिवाय पर्याय नाही. त्या साठी दोन मुख्य स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी. मी येथील दूरचित्रवाणी वरील अनेक वाहिन्यांवरील सकाळचे कार्यक्रम पाहत असतो. येथील हवामानावरील आणि वाहतूकीवरील बातम्या तर इतक्या खोलवर असतात, अथक काथ्याकुट करतात, ते सगळे मनोरंजक असते. बातम्या पाहताना दररोज किमान पक्षी gun shooting वर एखादी बातमी असतेच असते. अमेरिकेत इतक्या वर्षांनतर देखील येथील आफ्रिकन-अमेरिकन (कृष्णवर्णीय) लोकांवर होत असलेल्या अत्याचारांवर देखील बातम्या असतात कायमच. एके दिवशी बातमी आली कि सिएटल जवळच्या डोंगराळ वनक्षेत्र असलेल्या एका भागात बाल गुन्हेगारांसाठी असलेल्या सुधारगृहातून ५ मुले फरार झाले, अर्थात ते नंतर एक दोन दिवसात सापडले देखील (Five teenagers, serving sentences for various felonies, attacked several staff members at Echo Glen Children’s Center near Snoqualmie and escaped). आणि या घटनेमुळे मी नुकत्याच अश्याच विषयावर Seattle Public Library मधून आणलेले एक पुस्तक वाचले होते त्याची आठवण ताजी झाली. ती मुलं का पळून गेली असतील, ते सुधारगृह कसे चालवले जात होते, ह्या अश्या गोष्टींवर आता चर्वण होत आहे.

हि कादंबरी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात असलेल्या अशाच एका बालसुधारगृहात घडलेल्या घटनांवरून प्रेरित होऊन लिहिलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे The Nickel Boys आणि लिहिले आहे ते Colson Whitehead यांनी. ते स्वतः आफ्रिकन-अमेरिकन आहेत. गेल्या वर्षी Amazon Prime वर मी The Underground Railroad नावाची एक वेबसेरीज पहिली होती(ती अमेरिकेतील गुलामांच्या स्थितीवर होती). हे पुस्तक वाचताना समजले कि ती वेबसेरीज Colson Whitehead यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होती. The Nickel Boys कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अमेरिकेत बालसुधारगृहांना juvenile detention center किंवा reform school असे म्हणतात, आपल्याकडे remand home किंवा brostal school अशी देखील संज्ञा आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात Dozier School for Boys नावाचे बालसुधारगृह होते. १९९० मध्ये सुरु झालेले हे बालसुधारगृह २०११ मध्ये शंभर वर्षानंतर, कायमचे बंद करण्यात आले. त्यात झालेल्या अत्याचारामुळे मृत्यू पावलेल्या मुलांच्या बाबतीत घडेल्या गोष्टींबद्दल पुरातत्वीय संशोधन झाले, तेथून पलायन केलेल्या मुलांपैकी काही जणांनी आपले अनुभव पुस्तकरूपाने बाहेर आणले आहेत. त्यातील बहुतांश मुले आफ्रिकन-अमेरिकन आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काळे-गोरे ह्या वंशवादाचे स्वरूप देखील आहे. या सगळ्यातून वाचलेल्या मुलांनी आपले अनुभव कथन करण्यासाठी एक संकेत स्थळ (TheOfficialWhiteHouseBoys) देखील चालवले आहे, याचा उल्लेख लेखक ऋणनिर्देशात करतो. पण ते काही कारणाने चालत नाही. मला दुसरे TheWhiteHouseBoys नावाचे संकेत स्थळ सापडले, याच नावाचे Roger Dean Kiser यांचे अनुभवकथन असलेले एक पुस्तक आहे, संकेतस्थळ देखील तेच चालवतात.

एल्वूड कर्टीस नावाच्या होतकरू आफ्रिकन-अमेरिकन मुलाच्या आयुष्यातील घटना ह्या कादंबरीत आहेत. १९६० मध्ये त्याला त्याने न केलेल्या एका गुन्ह्यात अटक होते आणि त्याला शिक्षा होऊन निकेल अकादमी नावाच्या बालसुधारगृहात रवानगी होते. तेथे त्याला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते (त्यातील अनेक अनुभव तो एक कृष्णवर्णीय असल्यामुळे आलेले होते). त्याच्यावर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर या कृष्णवर्णीयांसाठी, समान नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्याच्या विचारांचा, आंदोलनाचा प्रभाव असतो. त्याच्या मनात खदखद सुरु असते. ते सगळे आणि त्याच ठिकाणी असलेला टर्नर नावाचा त्याचा एकमेव मित्र यांच्यातील संबंधांबद्दल हि कादंबरी आहे. एका सरळ रेषेत न जाता, सध्याच्या काळात आणि गतकाळात फिरणारी अशी ह्या कादंबरीची रचना आहे. अनेक संदर्भ, भाषा देखील थोडीशी वेगळी असल्यामुळे कादंबरीतील प्रसंग परत परत वाचून समजावून घ्यावे लागले, पण अतिशय मनस्वी कथानक असलेले हे पुस्तक आहे, आणि एकूणच आजकाल जे Black Lives Matter (BLM) नावाची चळवळ नव्याने सुरु आहे त्याबद्दल देखील अजून प्रकाश पाडते. योगायोगाने, गेल्यावर्षी जुन २०२१ मध्ये सिएटल मधील Capitol Hill भागात BLM चळवळीने उग्र रूप धारण केले, आणि आंदोलकांनी Capitol Hill Autonomous Zone तयार केला होता. तो भाग मी बघायला गेलो होतो परवा.

कादंबरीची सुरुवात आजच्या काळात होते. एल्वूड कर्टीस हा न्यूयॉर्क शहरात राहतोय. त्याच्या गतकाळातील विशेषतः निकेल अकादमीच्या अनुभवांवर तो मूक आहे. तो तिकडे परत कधी गेलाहि नाही. जेव्हा त्याला समजते कि अकादमी मधून मृत मुलांची थडगी बाहेर काढून पुरातत्वीय तपास चालू आहे तेव्हा तो फ्लोरिडा जाऊन आपली कहाणी सांगायचे ठरवतो. आणि कादंबरी १९६०च्या दशकात आपल्याला घेऊन जाते, त्याच्या बालपणीच्या जीवनात. शाळेत हुशार असलेला हा मुलगा फ्लोरिडा राज्यात फ्रेंचटाऊन या काळ्या लोकांच्या वस्तीत, आपल्या आजीसोबत राहतो आहे. आई वडील ह्या जगातून त्याला सोडून गेले आहेत. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या भाषणांचा, लेखनाचा त्याच्यावर प्रभाव आहे. आजीला मदत म्हणून एका हॉटेल मध्ये तो कामही करतो आहे. तेव्हापासूनच त्याला काळ्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध त्याच्या मनात रोष असतो, तो अधूनमधून प्रकट देखील होत असतो. त्यांच्या शैक्षिणिक प्रगतीमुळे त्याला महाविद्यालयात लवकर प्रवेश मिळतो. एके दिवशी दुसऱ्या एकाबरोबर महाविद्यालयात गाडीतून जात असताना पोलीस अडवतात आणि त्याच्यावर गाडी चोरल्याचा खोटा आळ येऊन त्याला अटक होते आणि मग निकेल अकादमी या रिमांड होम मध्ये पाठवले जाते.

तिथे गेल्यानंतर त्याला अनेक अतिशय वाईट अनुभव येतात, तो त्याला जमेल तसे , मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अत्याचारांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो. मनाशी ह्या दलदलीतून बाहेर पाडून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो. टर्नर नावाचा समविचारी मुलाशी मैत्री होते. अमेरिकेतील काळ्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक देणारे कायदे होते, काही दशकांपूर्व, जे Jim Crow Laws नावाने जायचे. त्याचा उल्लेख कादंबरीत कथानकाच्या ओघात येतो, कारण १९६० च्या दशकात ते प्रकार अमेरिकेत दक्षिणेकडील अनेक राज्यांतून अजुनही सुरु होते. अनेक ठिकाणी कादंबरीत एल्वूड कर्टीस ह्या सगळ्या परिस्थितीबाबत विचार करताना दाखवले आहे. साहित्यात संज्ञाप्रवाह (stream of consciousness) नावाचा प्रकार आहे, तसे काहीशी कथनशैली आहे. तसेच एके ठिकाणी Ku Klux Klan नावाच्या कट्टर वंशश्रेष्ठवादी(white supremacy) संघटनेचा उल्लेख येतो, जी गुप्तपणे कृष्णवर्णीय लोकांवर असीमित अत्याचार करत असते. निकेल अकादमीच्या अधिकारी आणि शिक्षक ह्या संघटनेच्या सभांना जातात ह्याची टर्नरला खात्री वाटत असते(मी इतक्यातच नेटफ्लिक्स वर The Best of Enemies नावाचा चित्रपट पहिला होता. तो काळ्या आणि गोऱ्या मुलांकरिता वेगवेगळ्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण school integration करण्याच्या, त्यांच्या एकत्रपणे शिक्षणाच्या बाबतीत आहे. त्यात Ku Klux Klan संघटनेची एक व्यक्ती आणि एक आफ्रिकन-अमेरिकन स्त्री यांच्यातील संघर्ष चित्रित केला आहे). निकेल अकादमीच्या अधिकारी आणि शिक्षक करत असलेला भ्रष्टाचार ते दोघे अनुभवतात. एल्वूड आणि टर्नर दोघेही तेथून पळून जाण्याचा निर्धार करतात आणि एक दिवशी तसे करतातही. तेथे कादंबरी नाट्यमयरित्या वळण घेते. ते काय आहे समजायला पुस्तक वाचावे लागेल. तसेच पुढे या दोघा मित्रांचे काय होते हे समजायला पुस्तक वाचणे श्रेयस्कर!

या कादंबरीला बालसुधारगृहातील दयनीय परिस्थिती हा एक पदर आहेच, पण मुख्य गोष्ट आहे ती वंशद्वेषाची. एल्वूडच नव्हे तर त्याचे आजी, आणि आई-वडील यांना सुद्धा अत्याचारांना सामोरे जावे लागले होते असे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत. Jim Crow कायद्यांमुळे काळ्या लोकांना दुय्यम वागणूक, दर्जा होता. गोरा मनुष्य जर समोरून येत असेल तर काळ्या माणसाने बाजूला होऊन त्याला वाट द्यावी असा नियम होता(avoid bumptious contact). अजून एक छोटासा पदर आहे तो त्याच्या आणि आजीच्या प्रेमळ नात्याचा, आजीने त्याला दिलेले संस्कार, लढण्याचे बळ हे सगळे एल्वूड ठिकठिकाणी आठवत राहतो.

असो. भारतात आपल्याकडे बालगुन्हेगारांबद्दल विशेष बातम्या येत नाहीत. अर्थात त्याचा अर्थ तश्या घटना घडत नाहीत असे नाही. आपल्याकडेहि बालसुधारगृह आहेत. आणि एकूणच असे दिसते कि त्यांची देखील परिस्थिती काही चांगली नाही. त्या ठिकाणी देखील अनेक वाईट साईट घटना घडतात, मुलांचे अनेक प्रकारे शोषण देखील होते, तेथेही अनेक प्रश्न असतील. त्या सगळ्याला देखील विविध पदर नक्कीच असतील. या बद्दल कुठे कधी विशेष असे वाचायला किंवा पाहायला अजूनतरी मिळालेले नाही. योगायोगाने अमेरिकेत फेब्रुवारी महिना Black History Month म्हणून साजरा केला जातो. अनेक कर्यक्रम, जनजागृती होतात. या निमित्ताने आपणही ह्या त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती करून घेण्यास हरकत नाही. मी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या इतिहासाबद्दल असणाऱ्या एका संग्रहालयात गेलो होतो.

नागरिक/सैनिक, भाग#३

गिरीश कार्नाड यांचे एक कन्नड पुस्तक आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) हे मी सध्या भाषांतरित करत आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा, व्यक्तिचित्रांचा, वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. बरेच लेख मूळ कन्नड भाषे मधीलच आहेत. काही इंग्रजी मधील आहेत, ते त्यांनी कन्नड मध्ये भाषांतरित करून पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

त्या पुस्तकातील एक लेख म्हणजे अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९८ मध्ये झाले, त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण होय. ते मूळ कन्नड मधील आहेत. त्यांनी एक टीपण देखील जोडलेले आहे. संमेलनाच्या वेळी त्यांना सरोज देशपांडे यांनी मराठीत भाषांतर करून दिले होते असे त्यांनी त्या टिपणात नमूद केले आहे. भाषणाचे मराठी भाषांतर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी पुस्तकात नक्की असणार. असे असले तरी, मी माझे भाषांतर ह्या टिपणाच्या भाषांतराच्या बरोबर केले आहे (त्या मूळ टिपणातील संवेदनशील असा भाग मी ब्लॉग मधून वगळला आहे). ते आज ह्या ब्लॉगच्या रूपाने देत आहे. ब्लॉगच्या सोयीकरता मी काही भागात विभागून देणार आहे. आज तिसरा आणि शेवटचा भाग देत आहे. आधीचे दोन भाग येथे आणि येथे आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये ९५ वे अखिल मराठी साहित्य संमेलन येऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठी वाचकांना आवडेल असा विश्वास वाटतो आहे. तसेच त्यांचे कन्नड मराठी अनुबंधाविषयी मांडलेले विचार देखील आवडतील.

नागरिक/सैनिक

आपण सत्तेवर असलेल्या पक्षाच्या सरकारला पायउतार करू शकतो. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बदलू शकतो. प्रत्येक नागरिकाला तो अधिकार आहे. तसे करण्याच्या आधी त्याने आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे. समाजातील ‘विचारशील’ घटकाने नागरिकांना अधिकार बहाल केले आहेत.

सैनिकाचे उदाहरण जर डोळ्यासमोर ठेवले तर नागरिकांच्या ह्या मुलभूत जवाबदारी कडे कानाडोळा केल्या सारखे होईल.

एखादी व्यक्ती गणवेश का परिधान करते? गणवेश परिधान करून सगळ्यांसारखे दिसावे हा हेतू. पथकात कवायत करताना सगळ्यांचे चालणे, हात पाय हलवणे हे सारखे होणे अपेक्षित असते. वेगळेपणा, स्वतंत्रपणा ह्या गोष्टींना येथे स्थान नाही. सैनिक स्वतंत्र व्यक्ती नसतो. तो यांत्रिक रचनेचा भाग असतो. तो देखील यंत्रवत होऊन जातो. तो काहीहि प्रश्न विचारात नाही. केवळ हुकुमाचे पालन करतो.

भाषा देखील यांत्रिक होऊन जाते. एक बटन दाबल्यावर पथक जगाच्या जागी थांबते. अजून एखादे बटन दाबल्यावर सलाम ठोकते. परत दाबल्यास सगळे एकसारखे पाय टाकून पुढे जातात. भाषा अर्थपूर्णपणे वापरण्याची गरज तेथे कोणालाच असत नाही.

भारता सारख्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे व्यक्तित्व त्याला हव्या त्या रीतीने घडवायला, निर्णयक्षमता आणखी वाढवण्यास अवसर असतो. असे असताना मनुष्यासारखे जगण्याच्या एवजी यंत्रवत जगण्याचे आकर्षण जर कोणाला वाटत असेल तर, काहीतरी गडबड आहे हे नक्की.

नागरिकाने जर सैनिकासारखे वागले तर त्याला मिळणारी सर्वात मोठी मानसिक समाधान म्हणजे साऱ्या सामाजिक, नैतिक जवाबदारीमधून सुटका हि होय. मानवीयतेच सर्वात मोठे लक्षण कुठले असेल तर निवड करण्याचे स्वातंत्र्य असे आपल्याला अस्तित्ववाद सांगतो. माझी नैतिक मुल्ये मी माझ्या आतून आली पाहिजेत. महात्मा बसवेश्वर यांनी सांगितल्या प्रमाणे, अंतरंगातील स्पंदन बहिरांगात कृतीशील झाले पाहिजे.

मला जर कोणी सांगितले कि शेजारच्या माणसाला मारून ये, तर मी विचारेन कि का रे, बाबा, असे मी का बरे करावे? ‘कारण द्या’, असे म्हणतो. पण मी जर सैनिक असतो तर, मी तसे विचारात बसणार नाही, मी हुकुमाची तालीम करणार, जरी मला माहिती असले कि शेजारचा निरपराधी आहे ते.

दुसरे महायुद्ध संपताना नाझी लोकांनी यहुदी समाजाच्या हत्याकांडा सामील होण्याचे कारण असे दिले कि, त्यांना तशी आज्ञा होती.

फक्त आज्ञापालन हे यांत्रिक रित्या होते असे नाही, तर, सारा मनोव्यापारच यंत्रवत झालेला असतो. आपण, आपले विरुद्ध ते, त्यांचे, हे बरोबर कि चूक हे विचारण्याची गोष्टच उरत नाही. आपण कायमच बरोबर असतो. हे स्वीअकारायला जर ते तयार नसतील तर आम्ही त्यांना सक्तीने आमचे बरोबर आहे हे स्वीकारायला भाग पाडू.

असे जर असेल तर ते कोण आहेत? मजेशीर गोष्ट म्हणजे ते कायमच दुसरे लोकं असतात. आपली गोष्ट जे कोणी ऐकत नाहीत ते सगळे यात येतात.

आपण, ते. या सर्वनामात बहुवचन आहे. त्यामुळे सार्वजनिक हिंसा सुलभ होऊन जाते.

एखाद्या देशाची आर्थिक परिस्थिती जर शस्त्रास्त्रे निर्मितीवर अवलंबून असेल तर, ती कोणाला तरी लागतील अशी परिस्थिती निर्माण, व्यवस्था निर्माण करणे त्या देशांच्या सरकारचे आद्य कर्तव्य आहे. म्हणजे सारखी युद्धे व्हायला हवीत. हाच न्याय मनुष्य बळाला देखील लागू आहे. सैनिकांच्या उपजीविकेसाठी संघर्ष निर्माण करावा लागतो. पण हे सैनिक कायमच बाहेरच्या शत्रूंशी लढण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील वैरी शोधावे लागतात. आत्मसंरक्षण करण्याचे समर्थ नसणारे, अल्पसंख्यांक, छोटे-मोठे समुदाय ह्याच्यावर निशाणा साधला जातो.

एकदा निर्माण झालेली हिंसा स्वतःहून क्षमत नाही. ती आणखीन वाढते, मोठी होते. विचारशक्तीच नष्ट करणाऱ्या लष्करी आदर्श असल्यामुळे, विचार करण्याचे धैर्य दाखवणारे वैरी होतात. ते वेगळे होण्याचे पाहत असतात. त्यांना धडा शिकवायची गरज निर्माण होते.

हिटलरच्या गुप्त पोलिसांचा प्रमुख फिल्ड मार्शल हर्मन गोलिंग एकदा म्हणाला होता, ‘संस्कृती हा शब्द ऐकला कि मी माझा ब्राउनिंग शोधतो’. येथे ब्राउनिंगचा अर्थ इंग्लिश कवी रॉबर्ट ब्राउनिंग नव्हे, तर, ब्राउनिंग नावाच्या कंपनीचे एक पिस्तुल होय. चैतन्यशील संस्कृतीचे वातावरण अत्याचार करण्याच्या प्रवृत्तीला पुरून उरेल ह्ये त्याला चांगलेच माहित होते.

हिटलर, स्टालिन, माओ सगळे सारखेच! आपल्याच समाजातील चित्रकाराचे रेखाचित्र हे शत्रूच्या हातातील अणुबॉम्ब पेक्षा अधिक विनाशकारी असू शकते. तो चित्रकार आपलाच, जवळचा असतो त्यामुळे अधिक विनाशकारी असतो.

रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर कविता आहे:

Where the mind is without fear
and the head is held high
Where knowledge is free…
Into that haven of freedom, my Father,
let my country awake.

टागोरांनी हि कविता जेव्हा केली तेव्हा आपला देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. तरीसुद्धा ब्रिटीश सरकारने ह्या कवितेवर बंदी आणली नाही. त्या कविताला कधी धोका आहे, माहिती आहे का? आजच्या परिस्थिती मध्ये, दुर्दैवाने. आणीबाणीच्या काळात हि कविता वर्तमानपत्रात छापण्यास बंदी होती.

ह्याच आजच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागातर्फे दिल्लीत एक बैठक बोलावली गेली होती, काही वर्षांपूर्वी. त्या बैठकीला सत्यजित राय, हृषीकेश मुखर्जी, श्याम बेनेगल, मला आणि इतरही काही जणांना आमंत्रण होते. त्या बैठकीत आम्हाला देण्यात आलेली माहिती अशी होती कि आपल्या समजात दलितांवर तसेच स्त्रियांवर अत्याचार झाल्याचे कुठलेहि पुरावे नाहीत. आपला समाज हा अत्यंत सहनशील समाज आहे. त्यामुळे चित्रपट ह्या अश्या विषयांपासून दूरच असावेत!

आज्ञापालन हे सैनिकाचे जीवन असावे, ह्या करिता सत्तेतील नेते प्रयत्नशील असतात, त्याचे ते ध्येयच असते. त्यामुळे राजकारणात शिरलेले हे लष्करी मनोवृत्ती आपल्या उद्देश सध्या करण्यासाठी जनतेला पवित्र वाटावे, आत्मीयता वाढावी, या करिता, धर्म, भाषा, इतिहास या गोष्टींचा उपयोग केला जातो.

प्राचीन ग्रीस मध्ये आपल्याला दोन प्रकारची राजकीय संघटना होत्या असे दिसेल. स्पार्टा आणि अथेन्स. स्पार्टा मधील प्रत्येक नागरिक हा सैनिक असणे आवश्यक होते. लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या माता-पित्यांपासून दूर नेऊन त्यांना निर्दयपणे लष्करी प्रशिक्षण दिले जात असे.

अथेन्सचे नागरिक देशावर काही संकट आले, आक्रमण झाले कि युद्धावर जात असत. शूरपणे ते लढत असत. पण शांतीच्या काळात एका मुक्त प्रजा-राज्याची जवाबदारी ते समर्थपणे पार पडत असत. प्रत्येकाला एखादे सार्वजनिक पद मिळत असे आणि त्यांनी त्या पदाची जवाबदारी पार पडायची असे होते. महत्वाच्या विषयांवर समस्यांवर सार्वजनिक चर्चा होत असत.

आपण आजही अथेन्सची आठवण काढत असतो. त्यांची शिल्पकला, तत्वज्ञान, इतिहासकार, नाटककार यांचे काम आठवते. स्पार्टाने आपली पद्धत बदलली नाही, त्यामुळे काळाच्या ओघात ते नामशेष झाले.

हि अत्याचारी प्रवृत्ती स्वतःच्या आसपास सगळे नष्ट करते, त्यानंतर स्वतःकडे वळते आणि ड्रागन सारखे स्वतःलाच गिळून टाकते.

चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी सांगितलेली एक छोटीसी गोष्ट सांगून मी माझे बोलणे थांबवतो. हि कथा त्यांना चार्ली चाप्लीन याच्या एका पुस्तकात मिळाली होती.

एका राजकीय अपराध्याला देहांताची शिक्षा ठोठावण्यात येते. त्याला मारण्यासाठी सैनिकांचे एक पथक तयार असते.(आपल्याला माहित असेल कि अश्या पथकात आठ ते दहा सैनिक असतात, जेणे करून आरोपीला मारल्याची भावना कोणा एकालाच होऊ नये). शिक्षा रद्द होईल अशी आशा होती. त्यामुळे त्या पथकाचे अधिकारी माफीचे आज्ञापत्र घेऊन येणाऱ्या दूताची वाट पाहत होते. पण दूताचा पत्ता नव्हता.

वेळेचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याने सैनिकांना सिद्ध राहण्यास बजावले. ते ऐकताच सगळे सैनिक एकाच यंत्राचा भाग असल्यासारखे तयारीत उभे राहिले.

तेवढ्यात एका दूताच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. ते पाहून अधिकाऱ्याने सैनिकांना थांबायला सांगितले. त्या सगळ्या सैनिकांनी एकदम हात मागे घेतले.

आता हि फक्त कथा नाही. आपण जर जागृत राहिलो नाही तर, येणाऱ्या काळात आपले भवितव्य काय आहे याची नांदीच आहे असे म्हणावे लागेल.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मला बोलावल्याबद्दल, सन्मान केल्याबद्दल मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आज तीन जानेवारी आहे. आपण नवीन वर्षात नुकतेच पाउल टाकले आहे. हे वर्ष विधवांसाठी नव्हे तर, मानवतेसाठी ओळखले जाऊदे अशी मी अशा करतो आणि तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो.

[सौजन्य: मातुकते फेब्रुवारी १९९८]

(समाप्त)

नागरिक/सैनिक

गिरीश कार्नाड यांचे एक कन्नड पुस्तक आगोम्मे ईगोम्मे (२००८, प्रकाशक मनोहर ग्रंथमाला, धारवाड) हे मी सध्या भाषांतरित करत आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा, व्यक्तिचित्रांचा, वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. बरेच लेख मूळ कन्नड भाषे मधीलच आहेत. काही इंग्रजी मधील आहेत, ते त्यांनी कन्नड मध्ये भाषांतरित करून पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

त्या पुस्तकातील एक लेख म्हणजे अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९८ मध्ये झाले, त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण होय. ते मूळ कन्नड मधील आहेत. त्यांनी एक टीपण देखील जोडलेले आहे. संमेलनाच्या वेळी त्यांना सरोज देशपांडे यांनी मराठीत भाषांतर करून दिले होते असे त्यांनी त्या टिपणात नमूद केले आहे. भाषणाचे मराठी भाषांतर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी पुस्तकात नक्की असणार. असे असले तरी, मी माझे भाषांतर ह्या टिपणाच्या भाषांतराच्या बरोबर केले आहे (त्या मूळ टिपणातील संवेदनशील असा भाग मी ब्लॉग मधून वगळला आहे). ते आज ह्या ब्लॉगच्या रूपाने देत आहे. ब्लॉगच्या सोयीकरता मी काही भागात विभागून देणार आहे. आज पहिला भाग.

एप्रिल २०२२ मध्ये ९५ वे अखिल मराठी साहित्य संमेलन येऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठी वाचकांना आवडेल असा विश्वास वाटतो आहे. तसेच त्यांचे कन्नड मराठी अनुबंधाविषयी मांडलेले विचार देखील आवडतील.

नागरिक/सैनिक

२ जानेवरी १९९८ रोजी अहमदनगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले . त्याच्या उद्घाटनानिमित्त केलेले भाषण म्हणजे हा लेख होय.

माझ्या भाषणामुळे फक्त संमेलनात नव्हे तर बाहेर देखील ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे मी दंग झालो. महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये माझ्या भाषणाची बातमी पहिल्या पानावर छापली गेली. बऱ्याच वर्तमानपत्रांतून त्यांतील संपादकीय रकान्यातून देखील भाषणाचा उहापोह केला गेला. त्याबद्दल अग्रलेखही आले. सकाळ, महारष्ट्र टाईम्स, इंडियन एक्स्प्रेस, इकॉनॉमिक पोलिटिकल विकली या सारख्या वर्तमानपत्रांतून अख्खे भाषणच छापले होते. संमेलन संपल्यानंतर देखील कित्येक दिवसा भाषणाचे समर्थन तसेच टीका करणाऱ्या प्रतिक्रिया येत राहिल्या. संमेलनाच्या एखादा महिना आधी मुंबईत घडलेल्या एक घटना देखील ह्या प्रतिक्रियेच्या मुळाशी होती.

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारने एका मोठ्या कार्यक्रमात महारष्ट्रातील मराठी लेखक, नाटककार पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आणि पाच लाख रुपये पारितोषिक देवून सत्कार केला होता. पु. ल. पार्किन्सनच्या आजाराने ग्रस्त होते. तरी सुद्धा त्यांनी एक-दोन मिनिटे प्रयासाने का होईना, पण बोलले. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या हिंसाचाराच्या प्रती उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली होती. लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून नंतर ठोकशाहीचा मार्गाचा अवलंब करण्याविरुद्ध ते बोलले होते. त्यांनी कुठल्याही व्यक्तीचे अथवा राजकीय पक्षाचे नाव घेता हि प्रतिक्रिया नोंदवली होती. (edited) ह्या मुळे महाराष्ट्रात वादळ उठले. (edited) मी अहमदनगर येथे गेलो असता लक्षात आले कि वातावरण तंग आहे. मी या प्रकरणाबद्दल काय बोलणार आहे ह्या बद्दल बऱ्याच पत्रकारांनी मला विचारले. (मराठी साहित्य संमेलनात आपल्या इथल्यासारखी राजकारण्यांची हावळी नसते, हे लक्षात घेतले पाहिजे).

ह्या पार्श्वभूमीवर माझ्या भाषणात एक विशिष्ट अन्व्यार्थ दडला होता. मी मराठीत भाषण केले. (प्राध्यापक सरोज देशपांडे यांनी माझे भाषण मराठीत भाषांतरित केले होते.) (edited)

त्या तंग वातावरणात संतप्त लोकांना माझ्या भाषणात त्यांच्या मनातील रोष दिसला असेल. पण मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. ह्या भाषणातील मुख्य मुद्दे मी आधीच काही कर्नाटकातील कार्यक्रमात मांडले होते, जसे कुवेंपू विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, तसेच श्री बरगुर रामचंद्र यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कर्नाटक साहित्य अकादमीच्या सभे देखील मी बोललो होतो.

फक्त राजकीय दडपशाही नाही तर, लष्करी दडपशाही जी नागरिकांच्या हक्कांना पायदळी तुडवणारी विचारसारणी आपल्या समाजाला पांगळे बनवते असा मी माझा विचार मांडला होता.

गिरीश कार्नाड यांच्या अध्यक्षीय भाषणाचा मराठी अनुवाद

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटना साठी तुम्ही मला आमंत्रित करून माझा मोठा सन्मान केला आहे याची मला जाणीव आहे. आज कन्नड मध्ये इतके मोठमोठाले साहित्यिक असताना त्या साहित्याचा प्रतिनिधी म्हणून मला तुम्ही निवडले हा देखील माझा गौरव आहे.

एक गोष्ट मी सुरुवातीलाच मान्य केली पाहिजे. मराठी साहित्याच्या ह्या महान सभेत मी उभा राहिलो असता, माझ्या मनात ‘मी बाहेरचा आहे’ हि भावना अजिबातच नाही. माझा जन्मच ,मुळी महाराष्ट्रातला आहे. माझे प्रारंभिक शिक्षण मराठीत झाले आहे. तसेच माझ्या साऱ्या कुटुंबाला मराठी साहित्याबद्दल रुची आहे. आनंद मासिक, हरी नारायण आपटे , खांडेकर, तसेच स्वराज्य, तेच स्त्री मासिक, किर्लोस्कर मासिक, सकाळ वर्तमानपत्र हि नावे मला अपरिचित नाहीत. हि वाचूनच मी मोठा झालो. वाढलो.

सुदैवाने समकालीन मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या बऱ्याच प्रतिभावान व्यक्तींशी माझा संपर्क आला. तेवढेच नाही तर, मला मराठी नाट्यपरंपरेचा वारसा मला माझ्या आई-वडिलांकडून आला आहे असे मी मानतो. माझ्या वडिलांनी संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ या नाटकांचे पहिले प्रयोग पाहिले होते. त्या बद्दल ते अतिशय आस्थेने बोलत असत. माझी आई तिच्या लहानपणी म्हणे घरातील थोरल्या मंडळींचा डोळा चुकवून बालगंधर्व कसे डोक्यावर पदर घेऊन गाणी गात तसे ती अनुकरण करत असे. मी कन्नड नाटक मंडळीची नाटके पाहिली ती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या दिवसात. त्या काळात कन्नड नाटक मंडळीला उतरती कळा लागली होती. तरी सुद्धा त्यांच्या वर मराठी नाटकांची पडछाया स्पष्ट दिसत होती. त्यांपासून मी प्रभावित झाली, प्रेरित झालो.

कन्नड-मराठी! या दोन श्रीमंत संस्कृतीच्या संगमाच्या ठिकाणी लहानाचे मोठे होण्याचे, लिहिण्याचे परमभाग्य मिळालेल्या द. रा. बेंद्रे, किंवा शं. बा. जोशी या दोघांची नावे घेतली तरी पुरेसे आहे. ह्या दोघांची मातृभाषा मराठी. धारवाड शेजारी शेजारी राहत असत. खऱ्या शेजाऱ्यांमध्ये जशी भांडणे होतात, तशी त्यांच्यात देखील होत असत. मात्र त्यांचे भांडण कन्नड मध्ये होत असे!

तामिळनाडू मध्ये भक्ती संप्रदाय उगम पावला, आणि कर्नाटकात देखील पसरला. कर्नाटकात वचन साहित्य उगम पावले, आणि महाराष्ट्रात पसरले. ह्या पुण्यभूमीत ज्ञानेश्वर नामदेवादी संतांनी त्यांचे वाड्मय निर्माण केले. ह्या पासून स्फूर्ती घेऊन कर्नाटकात दास साहित्य निर्माण झाले. जर उत्तरभारतात देखील पसरले, असे इतिहासकार सांगतात. धर्म, कला, साहित्य, नात्य, तत्वज्ञान या क्षेत्रात दोन्ही संस्कृतींमध्ये कायम देवाणघेवाण होत आली आहे.

फाराकांबाद्द्ल बोलायचे म्हणजे, कन्नड साहित्यात महाकाव्य परंपरा हा प्रमुख भाग आहेत. दहाव्या शतकात सुरु झालेली हि परंपरा आजही अव्याहतपणे सुरु आहे. कन्नड भाषेच्या संवेदनेला विशिष्ट्य शक्ती प्रदान करते.

या मुळे आधुनिक कन्नड साहित्य मराठी साहित्याकडे दोन बाबतीत कौतुकाने, आदरपूर्वक पाहते. पहिली गोष्ट म्हणजे, विनोदी साहित्य. आम्ही कन्नडिग हसतो जरूर, पण कन्नड मध्ये विनोदी साहित्य तसे विरळच आहे. त्या मुले गडकरी, अत्रे, कोल्हटकर, चिं वि. जोशी, पासून पु. ल. देशपांडे यांच्या पर्यंत श्रेष्ठ विनोदी साहित्यकार मराठीत आहेत ह्याची आम्हाला असूया वाटते. पु. ल. देशपांडे तर विनोदी साहित्य, तसेच रंगभूमी या दोन्ही क्षेत्रात वावरले. ते विशाल हृदयाचे होते, तसेच निर्व्याज मानवियता हा त्यांचा गुण होता. ते माझे प्रिय मित्र आहेत हे सांगायला मला अभिमान वाटतो.

दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात असलेली निष्ठावंत सामाजिक राजकीय विचारवंतांची परंपरा. आगरकर, गोखले, फुले, टिळक, आंबेडकर, कर्वे, हि सगळी बुद्धिवादी मंडळी कार्यकर्ते, ज्यांनी मराठी भाषेत निर्भय पणे त्या विषयांची चर्चा, वाद-विवाद, चिंतन, परीक्षण, करण्याची परंपरा सुरु केली. धुळ्यात माझे एक मित्र श्री शरद पाटील राहतात. फुले-आंबेडकर-मार्क्सवादी पक्ष त्यांनी सुरु केला. त्यांची मला आलेली पत्रे, ज्या त्यांनी विविध विचार निर्भयपणे मांडले असतात, ती वाचून आपणही विचार करायला प्रद्युक्त होतो, हे पाहिल्यावर अशी परंपरा मराठी मध्ये, महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे याचा भरवसा वाटतो. केवळ मराठी बद्दल न बोलता, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे असल्यास, ह्या राज्यात जन्म झालेले अनेक पारसी, गुजराती, मुस्लीम आणि इतर विचारवंत यांची नावे घेतली तरी पुरेसे आहे.

(क्रमशः)

The Last Bookshop in London

During my visit to Seattle, I happened to read a novel set during World War II, in London. I used to frequent to Seattle Public Library during my stay in Seattle. I found this book which could be loaned without registration/check-out or any formality. There was a separate section of such books there. Novel idea indeed!

There are many books on both world wars, including most famous All Quiet on Western Front. Most of India was saved from both world wars. Indian soldiers fought as part of British army during World War II, on eastern regions of Greater India. I have not seen many Indian books on world wars.

This book I read, called The Last Bookshop in London, published in this year(2021) itself, authored by Madeline Martin, is a fascinating account of how one survived bookshop created hope among the people of London when it was being bombed. The book finished very fast, was not easy to put down.

The Last Bookshop in London by Madeline Martin

It is August 1939. London prepares for war as Hitler’s forces sweep across Europe. The book’s heroine Grace Bennett has always dreamed of moving to the city, but the bunkers and drawn curtains that she finds on her arrival in London are not what she expected. And she certainly never imagined she’d wind up working at Primrose Hill, a dusty old bookshop nestled in the heart of London. Through blackouts and air raids as the Blitz intensifies, Grace discovers the power of storytelling to unite her community in ways she never dreamed-a force that triumphs over even the darkest nights of the war.

The novel is about books as much as it is about war. It begins with story of two friends from country side in England, Grace and Viv, who travel to London, to stay with one of their family friends Mrs Weatherford. Both of them quickly finds occupation during their stay. Grace starts helping Mr Evans at the bookshop. Mr Evans is a old and lonely man, running the bookshop in a laid back manner. Grace, sooner than later, quickly uses her enthusiasm to start influencing how it is run.

As war breaks and Germany starts making advances winning Poland and France, London starts worrying about it. Colin, the young son of Mrs Weatherford, gets called to be on the battleground in France. Grace’s love interest Greg, who is handsome Royal Air Force(RAF) fighter pilot, also gets summoned. Very soon Grace finds herself midst of numerous nightly bomb raids on London. The weather changes from later summer into fall and then into winter, and it really becomes difficult during blackout time.

The novels goes describing how Grace and Mrs Weatherford hold up the gloomy days and nights. They dig up bunker in the their garden. The bunker was called Anderson Shelter. This information was new to me. It was also educating how the city prepared for the air-raids, by having blackouts. British government also had put controls on food items as well and they were rationed. I remembered my parents telling me the stories of blackouts during Indo-Pak war. Grace also volunteers to be a night security warden during blackout days, helping people impacted by bombings. The novels also talks about how people hated Prime Minister Neville Chamberlain, who was before Prime Minister Winston Churchill. It is well known fact that how Churchill handled Briton’s response to war and how he motivated armed forces and civilians alike during the war.

The book is also a love story set middle of the war. Grace’s love flourishes through letters from him. Also he helps her to find her interest in books, by suggesting books to read many occasions. Author also describes at length their date, when he gets to visit the city on a break. It is quite romantic and brings the picture in front readers’ eyes.

As one of the resorts, people of London use underground railway stations as their mass shelter places, to save themselves from bombings, especially, during cold days. As a warden helping people, finds herself reading a book to gathering at the station one night. People like it and she keeps on doing that on regular basis, creating hope and endurance among the people taking shelter. Her bookshop, which gets damaged in one of the bombings, gets quickly rebuilt with help of same people. The bookshop helps to stock and sell remaining books of other neighborhood bookshops too, helping the bookshop owners in its own way. This continues till the end of war in June 1945.

This fascinating story of endurance, hope and love of books is quite captivating and the author has managed to tell a fine story. I am sure there will be a film about this some time soon. I will be looking forward for it, and I also will be looking forward to visiting this bookshop next time when I get to travel to London.

PS: I happened to read another novel based on true story again from the World War II. The protagonist of this story was incidentally a girl again. The novel is titled The Girl from Channel Islands. The author Jenny Lecoat is native of the islands. It is the story of Occupation period during the war, by German, of the British islands located near France (there was no counterattack by Allied Forces to defend it). And the girl involved is Jew. The story is about how she fights her own battles with Germans in their approach towards Jews. It was again interesting to learn about these islands, Occupation, and overall role it played in the larger context of the war. At the backdrop of International Holocaust Remembrance Day(which is on Jan 27), this made a good read.

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन, भाग#२

दिवंगत नाटककार, अभिनेता गिरीश कर्नाड यांचा एका कन्नड लेखाच्या भाषांतराचा पहिला भाग मी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित २०२० मध्ये ह्या ब्लॉग वर येथे दिला होता. आज दुसरा भाग देत आहे. भारतीय कलेच्या इतिहासाबद्दल त्यांनी केलेले हे भाष्य नक्कीच विचार करायला लावणारे आहे. हा लेख असलेल्या एका कन्नड पुस्तकाचे मी सध्या मराठीत भाषांतर करत आहे.

कला आणि राष्ट्रीय ओळख

शहरी मध्यमवर्गाने स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेली होती. त्यावेळेस भारतीय नागरिकत्वाचे स्वरूप काय असावे हे निश्चित करणे अनिवार्य ठरले. ह्या प्रयत्नात कनिष्ठ समाजातील लोकांची ओळख असलेले व्यवसाय हे ‘पुरातन संस्कृती’चे प्रतिक म्हणून पुढे आले. मध्यमवर्गाने ह्या प्रतीकांना आपलेसे करून त्यांना राष्ट्रीय प्रतीकांचा दर्जा दिला आणि ती ओळख आणखी दृढ करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

उदाहरणार्थ, १८९४मध्ये जेव्हा Indian National Congress स्थापित झाली, त्या वर्षापासून, प्रत्येक वर्षी कॉंग्रेसच्या मुख्य अधिवेशनाबरोबर, All India Music Conference ह्या राष्ट्रीय संगीत संमेलनाचे आयोजन केले जावू लागले. १९१५ मधील अधिवेशन मद्रास मध्ये होते. तेव्हा त्या निमित्ताने एक संगीत अकॅडेमी स्थापित केली जावी असा प्रस्ताव पुढे आला. त्या नुसार मद्रास संगीत अकादेमीची स्थापना झाली. त्या युगातील कोंग्रेस पक्षासारखेच, त्या अकादेमीमध्ये ब्राम्हणच बहुसंख्येने होते. त्यांच्यामध्ये पुरुष संगीतकार सार्वजनिकरित्या गाण्याची पद्धत असली तर देवदासी वर्गातील स्त्रियानांच फक्त बाहेर गाण्याची परवानगी होती. १९३३ मध्ये डी. के. पट्टम्माळ ह्या सार्वजनिकरित्या गाणाऱ्या पहिल्या ब्राम्हण महिला ठरल्या. त्यानंतर, संगीत महफिलीमध्ये उच्चवर्गातील महिलांनी संगीत सादर करणे हे लोकप्रिय होवू लागले. समाजात स्त्रियांच्या प्रती वाढत चाललेल्या उदार दृष्टीकोनाचा उत्साहात स्वागत केले गेले. मात्र ह्या परिवर्तनाचा लाभ हा उच्चवर्गातील स्त्रियांनाच झाला. पारंपारिकरित्या हेच करत असलेल्या कनिष्ठ वर्गातील स्त्रियांना मात्र रंगभूमीवरून बाहेर काढण्यात आले(आज जर आपण चेन्नईमध्ये ‘सार्वजनिकरित्या संगीत कोण गायले?’ असे जर विचारले तर चटकन आपल्यापुढे पट्टम्माळ यांचे नाव पुढे येते. शतकानुशतके गाणाऱ्या ह्या स्त्रियांना आपण आज विसरून गेलो आहोत)

याच तऱ्हेचे बदल(पलटवार) ललितकलेच्या क्षेत्रात देखील झाले आहेत, पण त्याचे कारण अतिशय वेगळे होते. ब्रिटीशांनी भारतीय संगीत क्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. पण ललितकला क्षेत्रात(चित्र, शिल्प, वास्तू)भारतीय मागसलेले आहेत अशी त्यांची धारणा होती. भारतीयांना युरोपिअन सौदर्यशास्त्राचा परिचय करून द्यायला हवा असे त्यांचे मत होते. त्यामुळे ब्रिटीशांनी तीन नगरात(मुंबई, कोलकाता, चेन्नई), आणि नंतर लाहोर मध्येही, कला महाविद्यालये सुरु केली. कोलकातामधील कला महाविद्यालातील प्रो. ई. बी. हावेल यांच्या सारख्यांनी भारतीय चित्रशैली जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे. पण लंडनमध्ये शासकीय शैक्षिणिक दृष्ट्या मान्य पावलेली शैली शिकवण्याचे ब्रिटिशांचे ध्येय होते. पण ह्या महाविद्यालयामधून शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमापेक्षा, तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अधिक क्रांतिकारी होती. समाजातील जो वर्ग आपली कला उपजीविकेसाठी जगात होता, त्यांच्यासाठी सुरु केलेल्या ह्या महाविद्यालयामधून, श्रीमंत तसेच मध्यम वर्गातील विद्यार्थीच अधिक होते.

बंगालातील भूसुधारणा कायद्याच्या परिणामामुळे, स्वतःला भद्रलोक असे म्हणवणारा एक उच्चवर्ग तयार झाला. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला हा वर्गाने, साहित्य, रंगभूमी आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व स्थापन केले. ते कलेचे आश्रयदाते होते, रसिकही होते. वृत्तपत्रातून काम करणारे पत्रकार, समीक्षक हेही ह्याच वर्गातील होते. ललीतकलेचा अभ्यास करण्यासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ह्या वर्गातील विद्यार्थी देखील होते. त्यामुळे, ह्या कलाविश्वात, पारंपारिक कलाकारांना स्थानच मिळाले नाही. (अशा पार्श्वभूमीवरून आलेल्या मैसूरचे वेंकटप्प कोलकात्याला गेल्यावर तेथील कलाकारांच्या वर्तुळात ते दाखल झाले, तसेच त्या वेळी सुप्रसिद्ध असलेल्या Modern Review या मासिकात त्यांचे चित्र प्रसिद्ध झाले). याचाच अर्थ असा की अश्या ह्या कला महाविद्यालयांमुळे भारतीय ललित कला क्षेत्रात एक नवा वर्ग निर्माण झाला. ह्या विद्यालयातील पदवीधर हे कलाकार झाले.

एकोणिसाव्या शतकातील युरोपियन romantic शैलीच्या आधीन न होता, स्वतंत्र नवीन अशी शैली निर्माण करण्याची ह्या कलाकारात ओढ होती. तो कलाकार बाजारपेठेकडे तिरस्कृत नजरेने पाहू लागला. Artist वेगळे झाले. Artisan झाले. कला वेगळी झाली, कलाकौशल्य वेगळे झाले. कला हे कसब आहे असे समजून जगणारे कलाजगतापासून दूर जावून खेड्या-पाड्यात गेले. असाच बदलाव नृत्यक्षेत्रातदेखील झाला. पण त्याला वेगळेच कारण होते. विसाव्या शतकातील भारतीय नृत्यकलेला पुनर्जीवित होण्यास पाश्चिमात्य जगताची ह्या रहस्यमय भारताबद्दल वाटणारे आकर्षण हेच होते, हे आपली विद्वान विसरले आहेत(किंवा जाणूनबुजून ह्या सत्याकडे दुर्लक्ष करत आहेत). विसाव्या शतकातील पहिल्या दशकात Ruth St Dennis नावाच्या अमेरिकन नर्तकीच्या नजरेस, अकस्मातपणे न्युयॉर्कमध्ये भारतीय खेड्यातील एक छायाचित्र पडले. त्यावरून स्फूर्ती घेवून, स्वतःची कल्पनाशक्ती वापरून, भारतीय नृत्य तेथील लोकांसमोर सादर करून, लोकप्रियता मिळवली. तिच्या नृत्याची नावे नर्तकी, राधा, The Nautch Girl अशी होती. काही वेळेस भारतीय संगीतकारांना रंगमंचावर बोलावले जायचे, पण त्यांचा उपयोग श्राव्य कारणासाठी नव्हे तर दर्शनीय शोभा वाढवण्यास होता. Ruth St Dennis १९१६ मध्ये Ted Shawn यांच्या बरोबर आपला चमू घेवून भारतात आली. ते भारत पहिल्यांदाच पाहत होते. इथले दारिद्र्य, घाणीचे साम्राज्य, रोगराई यामुळे हैराण झाले होते. तरीपण त्यांनी त्यावेळेस शंभरहून अधिक प्रयोग केले.

नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी तिला शांतीनिकेतन मध्ये बोलावून, भारतीय नृत्याचे पुनःर्जीवन करावे असे तिला सुचवले यावरून तिचे नृत्य चांगलेच असले पाहिजे. त्याच वेळेस टागोरांच्या सारख्या प्रभृतीमध्येही भारतीय नृत्याबद्दल किती अज्ञान होते हे दिसून येते. याच सुमारास रशियन नृत्यांगना Anna Pavlova हिने पंडित रविशंकर यांचे थोरले बंधू उदयशंकर यांच्या बरोबर नृत्य प्रयोग सुरु केले. भारतीय नृत्य आणि रशियन ब्याले यांच्या मिश्रणातून एक नवीन नृत्य प्रकार निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उदयशंकर यांनी १९३९ मध्ये भारतात परत येऊन अल्मोडा येथे Indian Dance Academyसुरु केली. तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर पाश्चात्य प्रेक्षकच होता. त्यानंतर चार वर्षानी मद्रास मधील श्रेष्ठ नृत्यांगना बालसरस्वती यांचे नृत्य पाहून ‘मी असे काही या आधी पहिलेच नाही’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पाश्चात्यांच्या आस्वादासाठी उदय शंकर आपल्या कल्पनेप्रमाणे जी ‘भारतीय’ नृत्ये सादर करत होते, त्याला बालसरस्वती यांच्या नृत्यामुळे धक्का बसला.

दक्षिण भारतात कमीत कमी दीड हजार वर्षे देवदासी नृत्य कला जोपासत आहेत. कुलीन स्त्रियांना नृत्य निषिद्ध होते(भरतमुनी आपल्या ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथात नाटक सादर करण्यास स्वतःचे शंभर पुत्र कामी आणतो, पण स्त्रियांच्या भूमिकेसाठी मात्र अप्सरेची योजना करतो!). ह्या दीड हजार वर्षांमध्ये एकाच राजाचे राज्य होते, तर एका बाजूला मंदिरांचे वैभव, ऐश्वर्य होते. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर परिणाम करत होत्या. आणि एकमेकांना पूरक ठरत होत्या. ह्या व्यवस्थेमध्ये देवदासींना राजाश्रय आणि देवाश्राय दोन्ही मिळत गेला., आणि देवदासी प्रथा हि भक्ती तसेच शृंगार यांच्या कलात्मक मिश्रणातून उत्कर्ष पावत गेली.

विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर राजाश्रयामुळे टिकलेल्या कला दक्षिण भारतातील राजांच्या दरबारांत विखुरल्या गेल्या. तंजावूरचे नायक, भोसले राजघराणे, ह्या कलाकारांना आपल्या पदरी ठेवले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर या नृत्यकलेला दासीयाट्टम किंवा मराठी/उर्दू मूळ असलेले सादीर किंवा नाच (Nautch) असे संबोधले जाई. ह्या देवदासी मंदिरांतील उत्सवप्रसंगी सेवा अर्पण करत, तसेच लग्न सोहळ्यासारख्या इतर सामाजिक कार्यक्रमात देखील त्या आपली कला सदर करत असत. देवदासी ह्या देवाला वहिल्या गेल्या असल्यामुळे त्या अखंड सौभाग्यवती असतात असे समजले जात असे. वैधव्य त्यांच्या आसपास देखील फिरकत नसे. त्यामुळे त्या शुभ प्रसंगात सहभागी झाल्या तर कुठलेही संकट कोसळणार नाही असा विश्वास लोकांत होता. संगीत आणि नृत्य ह्या दोन्ही कला ह्या अश्या देवदासींनी जिवंत ठेवले असे म्हणता येईल.

1852 मध्ये ब्रिटीश सरकारने तंजावूर संस्थान बरखास्त केले. त्यामुळे तंजावूर मध्ये असलेल्या सुमारे १५०० देवदासींचा राजाश्रयच एकाएकी निघून गेला. राजा गेला, त्याबरोबर देवदासींचा पोषणकर्ता गेला. त्यामुळे पोटासाठी देवदासींना त्यांच्या जवळ असलेल्या नृत्य संगीतादी कला वापरून उपजीविका करावी लागली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी वेश्या आणि देवदासी यांच्यात भेद उरला नाही असे म्हणावेसे वाटते.

ह्याचा परिणाम असा झाला कि, म्हैसूर संस्थानाच्या दिवाणजी यांनी , हा देवदासी संप्रदायच नष्ट करण्याच्या हेतूने , देवदासींना देण्यात येणारे इनाम, आणि इतर सवलती रद्दबातल करून टाकल्या. ह्यामुळे झाले असे कि, नृत्य गायनाची म्हैसूर परंपरा देखील नष्ट झाली.

१९१० च्या सुमारास मद्रास हे नाच विरोधी आंदोलनाचे केंद्र बनले होते. ह्या चळवळी मध्ये डॉ. मुत्तूलक्ष्मी रेड्डी नावाच्या एक महिला होत्या. मद्रास विधान परिषदेने देवदासी प्रथा बंद करावी तसेच त्याचा भाग असलेले सार्वजनिक नृत्याला निषेध करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती.

डॉ. अमृत श्रीनिवास नावाचे समाजशास्त्रज्ञ, यांच्या नुसार , ह्या नृत्य विरोधी चळवळीला देवदासी समाजातील पुरुषांचा मोठा पाठींबा होता. हि पुरुष मंडळी देवदासी नृत्य सुरु असताना वाद्याची साथ सांगत करायला बसत असत. त्यातील अनेक जण हे स्वतः स्वंतत्र कलाकार देखील होते. असे असून सुद्धा ह्या पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचे उत्पन्न अधिक होते, आणि त्यामुळे स्त्रियांचे वर्चस्व अधिक होते. त्या पुरुषांच्या डोळ्यांसमोर तथाकथित पुढारलेले ब्राम्हण लोकं आणि तसेच इंग्रज लोकांची उदाहरणे होती, जिथे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा अधिक वर्चस्व होते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या समाजात, पुरुषांना स्त्रियांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे, ती बाब त्यांना खुपत होती.

हे anti-nautch (नाच विरोधी) आंदोलन जर यशस्वी झाले तर, भारतीय नृत्यच संपून जाईल हे आपल्या दूरदृष्टीने जाणले ते म्हणजे, मद्रास म्युझिक अकादमी कार्याध्यक्ष असलेले ई. कृष्ण अय्यर हे होत. त्यांनी ‘कल्याणी सिस्टर्स’ ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या दोन तरुण नृत्यांगनाना अकादमीत बोलावून त्यांचा रंगमंचावर कार्यक्रम घडवून आणला. तो कार्यक्रम पाहायला खूप काही प्रेक्षक आले होते असे नाही. ह्या उपक्रमामुळे मद्रास मध्ये कसलाही फरक पडला नाही. तरीसुद्धा भारतीय नृत्याच्या इतिहासात हि सर्वात महत्वाची घटना आहे या बद्दल संशय नाही. त्या दिवशी नृत्य हे मंदिरांतून तसेच राज दरबारांतून बाहेर आले होते. हे नृत्य जे धार्मिक कर्मकांडे यांच्याशी घट्ट बांधले गेले होते, ते बंधन तोडून, नृत्याने लोकाश्रयाच्या अंगणात पाउल टाकले. ह्या उपक्रमाला मद्रास म्युजिक अकादमीचा संपूर्ण पाठींबा होता. नृत्यकला जिवंत ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे या भावनेतून, अकादमीच्या सदस्यांनी एक ठराव समंत केला. त्यात त्यांनी आधीचे ‘सादीर’ हे नाव खोडून ह्या नृत्य प्रकाराला भरतनाट्य असे नाव अर्पण केले.

ज सर्व साधारण पणे जो समज आहे कि भरतनाट्य हे नाट्यशास्त्रावर आधारित आहे, तो अजिबात खरा नाही. ‘सादीर’ नृत्य करणारे कलाकार महिला होत्या. काही वेळेला त्यांचे गुरु पुरुष कलाकार देखील असत. आणि त्यातही ब्राम्हण गुरु देखील असत. ह्या ब्राम्हण गुरूंना ‘भरतन’ असे संबोधले जात असे(देवदासी कुलाच्या गुरुजनांना ‘नत्तुवन’ असे संबोधले जाई). भरतनाट्य नृत्याला ब्राम्हण समुदायाचा असा संबंध जोडून, ब्राम्हण समाजात त्याला स्वीकृती मिळावी यासाठी, ह्या नृत्याचे नामकरण भरतनाट्य असे करण्यात आले.

हे असे सगळे झाल्यानंतर, तसेच ह्या नृत्याचा एका विशिष्ट जातीशी संबंध तोडून कृष्ण अय्यर यांनी नाट्यशास्त्र कर्ता भरत मुनी यांची ह्या नृत्याचा संबंध जोडला हा भाग वेगळा.

त्यांची हि युक्ती अतिशय यशस्वी झाली. ह्या नामकरणानंतर केवळ दहा वर्षातच मद्रास मधील ब्राम्हण समाज भरतनाट्य हे आपल्या पुरातन परंपरेतून आले असे समजू लागले, आणि तसे बोलूही लागले.

ह्या महत्वाच्या अश्या परिवर्तनाच्या युगात जाती, लिंग, तसेच आर्थिक संबंध यांनी कशी भूमिका निभावली हे समजायला पुढचे अर्धे शतक जावे लागले, ज्यात मद्रास मधील कलाजगतात तीन महिला कलाकारांच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले.

सर्प्रथम बालसरस्वती यांच्या पासून सुरुवात करूयात. त्या भारतातील सर्वश्रेष्ठ नर्तकी पैकी आहेत असे निस्संकोचपणे म्हणता येईल. त्या जन्माने देवदासी होत्या आणि देवदासी संप्रदायाशी त्या शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिल्या. त्या मद्रास मध्ये आल्यावर, अकादमीच्या पदाधिकारी यांनी त्यांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच पुढे त्यांना नृत्य प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी जागादेखील देऊ करण्यात आली. तरीसुद्धा त्यांनी आपली कला रसिक रंजंक करून त्यावेळच्या समाजात(म्हणजे ब्राम्हण समाजात) लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना आर्थिक चणचण सोसावी लागली, तसेच त्यांना समाजाचा तिरस्कार देखील सोसावा लागला. त्यामुळे कि काय, त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीला देखील त्यांनी नृत्य शिकवले नाही. आजच्या घडीला मद्रास मधील पालकांना आपल्या लहान मुलीना भरतनाट्य शिकवणे हे शिष्टसंमत झाले आहे, त्या पार्श्भूमी वर हा इतिहास ध्यानात घेणे जरुरीचे आहे.

दुसरी महिला म्हणजे श्रेष्ठ कर्नाटक गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी , ज्या देखील जन्माने देवदासीच होत्या. त्यांचा परिचय सदाशिव नावाच्या एका ब्राम्हण पत्रकाराशी झाला आणि पुढे त्यांच्या बरोबर विवाह देखील झाला. सदाशिव यांनी आपल्या युगाच्या अत्यंत अमुल्य अश्या संगीताच्या ठेव्याचे(म्हणजेच एम. एस. सुब्बलक्ष्मी यांची गायकी) जतन/वर्धन तर केलेच, तसेच ते त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येयच ठरवून घेतले होते. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, तसेच प्रसिद्ध पत्रकार राजगोपालचारी यांचे मित्र होते. ह्या सर्वांमुळे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांची त्या काळातील अनेक मान्यवरांशी झाली. तसेच त्या स्वतः दिसायला अतिशय सुंदर होत्या. ह्या सर्वांचा उपयोग त्यांनी करून घेतला आणि आपली जन्मापासूनची देवदासी अशी ओळख त्यांनी पुसून काढत तमिळ ब्राम्हण समाजात आदर्श गायिका असे स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या. एखाद्या ब्राम्हण कलाकाराला मिळणारे स्थान त्यांनी प्राप्त केले.

तिसरी महिला कलाकार म्हणजे रुक्मिणीदेवी. ब्राम्हण कुटुंबात जन्म होऊन हि ते Theosophical Society of India या संस्थेचे सदस्य असलेल्या एका इंग्रज सद्गृस्थाबरोबर विवाहबद्ध झाले. देवदासींचीनृत्यकला पाहून त्या भारावल्या. ती कला त्यांनी आत्मसात करायची असा निर्धार केला. विदेशी पतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे सामाजिक असंतोषाकडे दुर्लक्ष करायला सुलभ झाले. रुक्मिणीदेवी. ह्या काही श्रेष्ठ अश्या नृत्यांगना नव्हेत. तरी त्यांनी दोन गोष्टी केल्या. नृत्य आणि देवदासी यांचा जो ऐतिहासिक संबंध होता, तो त्यांनी पुढे आणला, तसेच नाट्यकलेला शुद्ध केले. भरतनाट्य कलेच्या प्रचारासाठी त्यांनी ‘कलाक्षेत्र’ नावाचे विद्यालय सुरु केले. आणि ते पुढे जाऊनअत्यंत यशस्वी ठरले. १९५५ मध्ये कलाक्षेत्र विद्यालयात १० विद्यार्थी होते. १९७६ साली ती संख्या १५० पर्यंत पोहोचली. त्यात एकही विद्यार्थिनी देखील देवदासी पार्श्वभूमी असलेली नव्हती हे विशेष!

रुक्मिणीदेवी यांचे दुसरे ध्येय होते ते ‘शुद्धीकरण’ .ते साध्य करण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीचे अनुकरण भारतातील इतर भागात झाले. संस्कृत पंडित(विशेषकरून ब्राम्हण), संगीतज्ञ, संगीत शिकवणारे गुरु या सर्वांच्या मदतीने ‘सादिर’ प्रकारात असलेली मुद्रा, भंगी, पदविन्यास वगैरे गोष्टी त्यांनी वापरून त्यांचे जतन केले. दक्षिण भारतात असलेल्या मंदिरातील शिल्पांतून दिसणाऱ्या मुद्रांचा अभ्यास करून त्यांचे नंदकिशोर यांच्या अभिनयदर्पण ह्या ग्रंथाशी संबंध जोडला. सांप्रदायिक ‘सदीर’ चे परिवर्तन त्यांनी मंदिरातील शिल्पांतून दिसणाऱ्या मुद्रा डोळ्यांसमोर ठेवून भरतनाट्य वेशभूषेत आवश्यक बदल देखील केले. नावाजलेल्या ब्राम्हण संगीतज्ञांना पाचारण करून त्यांनी नवीन रचना देखील बांधून घेतल्या. रुक्मिणीदेवी यांनी ‘सादिरनाच’ चे ब्राम्हणीकरण करून टाकले. एका दृष्टीने सुब्बलक्ष्मी यांनी जे आपल्या स्वतःच्या कलेबाबतीत केले, तेच
रुक्मिणीदेवी यांनी ‘सादिर’ याच्या बाबतीत केले असे म्हणावे लागेल.

केंद्र संगीत नाटक अकादमीचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. नारायण मेनन यांनी मला कथन केलेल्या एका घटनेमुळे मी कला आणि जातीभेद असे का बोलत असतो हे स्पष्ट होईल. १९६० मध्ये दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चा सत्रात रुक्मिणीदेवी यांनी अतिशय विस्ताराने आपण केलेल्या परिश्रमामुळे कसे ग्राम्य, अशुद्ध अश्या नृत्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्या उत्तरादाखल बालसरस्वती म्हणाल्या, ‘रुक्मिणीदेवी जे म्हणाल्या ते अतिशय खरे आहे. ह्या उच्च जाती मधील स्त्रियांनी आमचा व्यवसाय हिसकावून घेतला. आणि आमची कला मात्र आमच्या जवळच राहिली.’

ब्राम्हणी संस्कृतीच्या शिष्टाचार अंगी बाळगलेल्या सुब्बलक्ष्मी यांनी अशा वादविवादाचे प्रसंग जाणूनबुजून टाळले असे दिसते!

मद्रासच्या बुद्धीजीवी ब्राम्हण समाजाने भरतनाट्य हा कलाप्रकार म्हणून स्वीकार करायला तसा बराच अवधी लागला. तसेच साऱ्या भारतभर त्याबद्दल बोलू जाऊ लागले. पुढील एक दोन वर्षांतच शांतीनिकेतन मध्ये रवीन्द्रनाथ टागोर यांनी मणिपूर नृत्य प्रकारची पुन्हा प्रतिष्ठापना केली. मल्याळम कवी नारायण मेनन वल्लत्रोल यांनी कथकली च्या प्रसारासाठी केरळ कला मंडळ स्थापन केले. पुढील पंधरा एक वर्षांत कर्नाटकात के शिवराम कारंथ यांनी यक्षगान नृत्याच्या पुनर्जीवनासाठी स्वतःला वाहून घेतले. हे सर्व जण, इंग्रजी भाषा शिकलेले सुशिक्षित मध्यम वर्गीय लोकं होते हे विसरून चालणार नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आपल्या पारंपारिक कला ह्या राष्ट्राच्या सत्वाचे प्रतिनिधित्व करते अशी धारणा सरकार मध्ये होती आणि त्यामुळे त्याला सरकारने प्रोत्साहन देखील दिले. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ललित कला अकादमी ह्याच सुमारास आकारास आल्या. अज्ञानामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे असेल, तसेच खेड्यापाड्यातून कुजत असलेली कला, शोधून काढून त्यांना प्रकाशात आणणे, प्रचार करणे, तसेच त्यात असलेल्या कलाकारांना आर्थिक आयाम प्रदान करण्याचे काम संगीत नाटक अकादमीने केले. शब्दशः भारताची अत्यंत प्राचीन अशी कला कुडीयात्तम पासून ते मध्ययुगातील धृपद, ग्रामीण पांडवाणी, इत्यादी कलाप्रकारांना नवजीवन मिळाले. इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय संबंध डोळ्यांसमोर ठेवून विविध देशांतून Festival of India सारखे उपक्रम राबवले. राजीव गांधी यांनी सुरु केलेले Zonal Cultural Council भारताची कला व्यापार हे सरकारी कृपादृष्टी असलेले उद्योग क्षेत्र झाले असे म्हणावे लागेल.

(क्रमशः)

बाकीबाब

परवा जुलै ८ रोजी, मराठी कवी बा भ बोरकर(टोपणनाव बाकीबाब) यांचा स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त परत त्यांच्या आठवणी, कविता यांचा जागर झाला. मला गेल्यावर्षी त्यांचे १९८२ मधले ललित लेखांचा संग्रह असलेले एक पुस्तक(चांदण्याचे कवडसे) रस्त्यावर जुन्या पुस्तकाच्या गठ्ठ्यात सापडले होते. त्यावेळी मी तसा थोडासा चकितच झालो होतो. बोरकर मला फक्त कवी म्हणून माहिती होते. त्यांनी गद्य लेखन केले आहे हे माझ्या गावी देखील नव्हते.  मला जाणवले कि बोरकरांबद्द्ल पूर्वी इतके ऐकूनही मी त्यांचे काही वाचले नव्हते. घेतलेले पुस्तक परत वाचले पण त्यांच्या इतर साहित्याची ओळख करून घ्यायला सवड झाली नव्हती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आकाशवाणी वर व्यंकटेश माडगुळकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी सांगितले होते कि ते महात्मा गांधी यांच्यावर महाकाव्य(महात्मायन) रचत आहेत, पण ते पूर्ण करण्याच्या आत त्यांचे निधन झाले. शोध घेता घेता असे समजले कि त्यांनी कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्र, ललित असेही भरघोस विपुल लिहिले आहे. पोर्तुगीज, कोकणी भाषेतही लिहिले आहे.

बोरकर गोव्याचे, गोमंतकातील हे माहित होते. पण बोरकर पुण्यात १४ वर्षे राहिले हे माहिती नव्हते. त्यांना सारखी गोव्याची ओढ वाटत असे. जी ए कुलकर्णी यांच्या बाबतीत तेच झाले होते. त्यांना सारखी बेळगाव/धारवाडची आठवण येत असे आणि पुणे आवडत नसे.

त्यांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम पु ल देशपांडे आणि सुनिता देशपांडे करत असत, दूरदर्शनवर पूर्वी कधीतरी पाहिल्याचे आठवत होते. आजच दूरदर्शनवर पु ल देशपांडे आणि बाकीबाब यांचा सहभाग असलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा जुना कार्यक्रम देखील अनायासे तासभर पाहता आला. त्यात बाकीबाब म्हणतात कि त्यांची कविता हि त्यांचा आत्माविष्कार आणि आत्माविस्तार असते, ते किती खरे आहे हे कार्यक्रम पाहताना आणि त्यांचे मराठी, कोंकणी काव्यगायन ऐकताना वाटत होते.

त्यांच्या निसर्ग आणि प्रेम विषयाच्या कविता यावरून त्यांना आनंदयात्री असे देखील संबोधले जाई. त्यांच्या काही कविता खूप प्रसिद्ध आहेत, जसे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती,  ​ओवीबद्ध असलेली माझ्या गोव्याच्या भूमीत  ही कविता, जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग , झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन, जीवन त्यांना कळले हो, अनंता तुला कोण पाहू शके?  इत्यादी. ही सर्व गीते आपण कायम ऐकत असतो कुठे ना कुठे!

बाकीबाब यांची जन्मशताब्दी २००९ मध्ये झाली. त्या निमित्त त्यांच्या आणि त्यांच्या योगदानावरील वाड्मयाची तपशीलवार सूची तयार करण्यात आली, ती ‘कविवर्य बा भ बोरकर जन्मशतसांवत्सरिक’ या नावाने प्रसिद्ध झाली. ती येथे आहे, रसिकांनी ती जरूर पहावी. त्यात एका पुस्तकाची नोंद  होती, ज्याचे नाव पोएट बोरकर असे होते,आणि ते प्रसिद्ध समीक्षक व दि कुलकर्णी यांनी लिहिले होते. ते ईबुक स्वरूपात मला मिळाले. त्यात त्यांनी केलेल्या बोरकरांच्या कवितांचे निरुपण, प्रेरणा याचे विवेचन भावते. त्यांच्या भक्तीपर असलेल्या कवितांविषयी त्यांनी लिहिले आहे. परवा असे वाचनात आले कि त्यांच्या पत्रांचा एक संग्रह बाकी संचित या नावाने गोवा मराठी अकादमीने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून बोरकर यांच्याबद्दल आणखीन दुर्मिळ माहिती समोर येईल.

आता चांदण्याचे कवडसे या माझ्याकडे असलेल्या ललितलेखांच्या संग्रहाबद्दल. त्यातील सुशेगाद हा लेख मला खूप आवडला. गोव्यावर पोर्तुगीज संस्कृतीचा ठसा उमटला आहे. सुशेगाद  या मूळ पोर्तुगीज शब्दाच्या अर्थाच्या आज कोण कोणत्या छटा प्रचलित आहेत ते सांगितले आहे. एक प्रमुख अर्थछटा आहे तो संथ प्रकृती, संथपणा दर्शवणारी, जी गोव्याच्या जीवनात आहे! अजून एका लेखात ते गृहस्थाश्रामाबाबत सांगताना तीन सूत्रे आपल्या हाती देतात. Sense of priorities(अग्रक्रम), sense of proportion(प्रमाण) आणि sense of propriety(औचित्य) अशी ती तीन सूत्रे! त्यांच्या पुस्तकांच्या आणि वाचनाच्या हव्यासाबद्दल दोन लेख आहेत. हायकू या मुळ जपानी काव्यप्रकाराबद्दल एक लेख आहे. स्वप्नांबद्दल लिहिताना पौगंडावस्थेत असताना त्यांना पडलेल्या एका शृंगारिक/कामुक स्वप्नाबद्दल आणि झालेल्या स्खलनाबद्दल  मनमोकळेपणाने लिहितात. आणि त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणजे निसर्गावर, त्याच्या विविध रूपावर, तन्मयतेने तीन-चार लेख आहेत. ह्या ललितलेखांच्या संग्रहाव्यतिरिक्त कागदी होड्या, पावलापुरता प्रकाश, घुमटावरचे पारवे हे त्यांचे इतर ललितलेख संग्रह देखील आहेत.

बोरकरांचे रवींद्रनाथ टागोरांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांच्यावर देखील त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. पोर्तुगीज राजवटी मध्ये ते लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांच्यावर युरोपियन संस्कृतीचे, संगीताच, सौंदर्य विषयक विचारांचे, तत्वज्ञानाचे संस्कार झाले होते.

मी कवितेच्या प्रांतात शिरलो नाही अजून, थोडा लांबच राहिलो आहे. पण या निमित्ताने का होईना कवितेच्या आस्वादाची रुची लागली तर चांगलेच आहे. कविता ऐकायला मजा येते. आवडते पण जाणून बुजून कविता वाचूयात असे क्वचित घडले आहे. दिवाळी अंकांतील कवितेची पाने मी क्वचित पाहतो. कविता वाचणे म्हणजे शास्त्रीय राग संगीत ऐकण्यासारखे किंवा अमूर्त चित्रांचा आस्वाद घेण्यासारखे थोडा अमूर्त कारभार आहे असे मला वाटते. शास्त्रीय राग संगीत ऐकण्याच्या, कानसेन होण्याच्या मार्गावर चालतो आहे, बाकीच्या दोन गोष्टींकडे वळायचे आहे अजून. काही वर्षांपूर्वी प्रा. विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कवितांचा कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. कवितेला वाहिलेल्या काव्यरत्नावली(१८८७ ते १९३५) द्वैमासिकाच्या वाटचालीवर एक संशोधनपर पुस्तक नुकतेच हाती लागले आहे. कविता-रती या नावाच्या अजून एका कवितेला वाहिलेले द्वैमासिकाबद्दल मला नुकतेच समजले आहे. हे द्वैमासिक १९८५ मध्ये बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्वकीय पुरुषोत्तम पाटील यांनी सुरु केले होते. ह्या दोन्ही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आधुनिक कवितेच्या परंपरेचा इतिहास समोर येतो. नुकतेच सुरेश भटांच्या जयंती निमित्त त्यांची मुलाखत, त्यांच्या कविता, आणि मराठी गझला ऐकल्या होत्या, जाणून घेता आले होते. त्याबद्दल देखील लिहायचे आहे नंतर केव्हातरी.

असो, तात्पुरते तरी बोरकरांच्या इतर साहित्यकृतींचा शोध घ्यायचा आहे. पाहूयात कसे जमते ते. बोरकरांच्या पोर्तुगीज भाषेतील लेखनाबद्दल मराठीत कोणी जाणकारांनी लिहिले आहे का ते माहित नाही, नसेल तर लिहिले पाहिजे. असो, पण त्यांना बाकीबाब हे टोपणनाव कसे मिळाले हे अजून कुठे सापडले नाही!

स्मरण आचार्य अत्र्यांचे

आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघेही मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, आणि तेही विनोदी. पण तसे दोघेही अनेक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहिलेले. या दोघांचे नाव माहित नसलेला मराठी माणूस विरळा, अर्थात आत्ताच्या पिढीचे काही सांगता येत नाही! १२ जून हा पु ल देशपांडे यांचा स्मृतीदिन, तर आचार्य अत्रे यांचा १३ जूनला असतो. काय विचित्र योगायोग आहे नाही! पु ल देशपांडे यांचे निधन होऊन वीस वर्षे झाली ह्या वर्षी(२०२०), तर आचार्य अत्रे यांचे निधनाला दोन वर्षांपूर्वी(२०१८) पन्नास वर्षे झाली. सर्वसामान्य मराठी वाचकांप्रमाणे, रसिकांप्रमाणे, मी दोघांचेहि थोडेबहुत साहित्य वाचले आहे, आणि इतर क्षेत्रातील त्या दोघांचे कर्तृत्व थोड्याफार प्रमाणात माहित आहे. मी पु ल देशपांडे यांच्या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहिले आहे या आधी(काय वाट्टेल ते होईल). आचार्य अत्रे यांच्या बद्दल काहीच लिहिले नव्हते. कालच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला, त्यामुळे हा लेखन-प्रपंच.

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे यांचे अर्कचित्र(निवडक ठणठणपाळ या पुस्तकातून साभार)

अर्थात आचार्य अत्रे यांना मी पुस्तकांतूनच अधिक अनुभवले आहे, कारण त्यांच्या निधनाच्या वेळी मी जेमतेम एक वर्षांचा होतो! सुदैवाने पु ल देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहता आले होते. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी मी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित पुण्यातील बाबुराव कानडे यांच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती विविध वक्ते देत होते. बाबुराव कानडे आचार्य अत्रे यांचे शिष्य. आचार्य अत्रे यांच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रतिष्ठान आणि त्याच बरोबर विनोद विद्यापीठ देखील उभारले आहे. पु ल देशपांडे देखील आचार्य अत्र्यांना गुरु मानायचे.

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या कवडी चुंबक या नाटकातील एक उतारा आमच्या नववी किंवा दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. पण माझ्या वाचनप्रवासात अत्रे थोडे उशिरा आले असे म्हणावे लागेल. अत्र्यांचे आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी (याचे पाचही खंड) हे मला वाटते मी गंभीरपणे वाचलेली त्यांची पहिली साहित्यकृती. त्यांची तोंडओळख हि शाळेतील पाठ्य पुस्तकांतून झालेली होतीच. त्यांच्या मुलीने म्हणजे शिरीष पै यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांतून देखील त्यांच्या बद्दल आणखीन समजते. एकूणच अफाट व्यक्तिमत्व होते त्यांचे. त्यांच्या वकृत्वाचे, हजरजबाबीपणाचे, तसेच फटकळपणाचे किस्से अजूनही चर्चिले जातात. आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान फार मोठे आहे. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला(आणि योगायोग पहा, परवाच ११ जून साने गुरुजींचा स्मृतिदिन होता). प्रसिद्ध नाटके मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी आणि इतरही बरीच अशी त्यांच्या नावावर आहेत.

गेल्यावर्षी असेच पाथारीवरील जुन्या पुस्तकांच्या ढिगात आचार्य अत्रे यांचे केशवकुमार या टोपण नावाने प्रसिद्ध झालेल्या विडंबन काव्याचा संग्रह झेंडूची फुले हे पुस्तक अवचित हाती लागले. विडंबन काव्याची परंपरा खंडित झाली आहे असे दिसते आहे(माझे नागपूरकडील एक नातेवाईक प्रा. सुरेश खेडकर हे विडंबन काव्य करतात आणि ती सादर देखील करतात. त्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे एप्रिल फुले असे आहे). त्यांचे समाधीवरील अश्रू हे मला भावलेले पुस्तक. त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या मृत्युनंतर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखांचा संग्रह आहे. मुलांसाठी लिहिलेले नवयुग वाचनमाला हि पुस्तके देखील अतिशय लोकप्रिय होती. माझ्याकडे असलेले अजून वेगळे पुस्तक जे आचार्य अत्रे यांनी लिहिले नाही, पण ते त्यांच्या विषयी आहे. त्याचे शीर्षक आहे आदेश विरुद्ध अत्रे, पु भा भावे यांचे. आदेश हे नागपूर वरून प्रसिद्ध होत असलेले पु भा भावे संपादित मराठी साप्ताहिक. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या नवयुग मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशिष्ट अशी टीका केली होती. आदेश मधून पु भा भावे यांनी त्याच प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यावरून आदेश आणि अत्रे यांच्यात न्यायालयीन तंटा झाला. त्याचा पु भा भावे यांनी या पुस्तकात वृत्तांत दिला आहे. पुस्तकाची प्रथमावृत्ती आहे १९४४ मधील आहे. ते सर्व वाचणे मनोरंजक आहे; अत्र्यांच्या आणि समोरच्या पक्षाच्या विचारांचे त्यातून दर्शन होते. आचार्य अत्रे यांनी असे अनेक वाद-विवाद ओढवून घेतले आहेत. जसे अत्रे-ना सी फडके वाद, अत्रे-बाळासाहेब ठाकरे वाद!

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या विनोद गाथा या पुस्तकात विनोदाचे थोडेफार तात्विक विवेचन केले आहे. ते नक्कीच उदबोधक आहे. त्यात ते म्हणतात कि समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यात विनोदाचे रत्न कसे सापडले नाही याचे राहूनराहून आश्चर्य वाटते. आचार्य अत्रे यांचा आवडता आणि अतिशय प्रसिद्ध शब्द म्हणजे गेल्या ‘दहा हजार वर्षांत..’! हे अतिशयोक्ती स्वरूपाचा विनोदाचे उदाहरण आहे. या निमित्त एक किस्सा सांगितला जातो. पु ल देशपांडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणतात, ‘पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही’. कुणीतरी बोलले कि, ‘आचार्य, तुम्ही फार अतिशयोक्ती करता बुवा’. यावर आचार्य अत्रे उत्तरले, ‘अरे, यात अतिशयोक्ती कसली? मला अतिशयोक्तीच करायची असती तर मी म्हणालो असतो की पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होईल! असे हे अत्रे!

१९५-६० च्या काळात लोणावळा खंडाळा हे अनेक प्रसिद्ध लोकांचे आवडते ठिकाण होते असे दिसते. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्तच्या चरित्रात त्याच्या लोणावळा खंडाळा येथील घराचा उल्लेख आहे. आचार्य अत्रे यांचे देखील ते आवडते ठिकाण होते, त्याबद्दल, त्यांच्या खाद्य रसिकते बद्दल, तेथील विविध मैफिलीबद्दल त्यांनी चवीने लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून वाचले होते कि त्यांचे तेथील घर राजमाची दर्शन हे डॉ बावडेकर यांच्या मालकीचे आहे आणि त्यांनी त्याची चांगली देखभाल केली आहे. हि चांगली बातमी आहे. साहित्यिकांची घरे हि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतात. त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते(लेखकाचं गाव लेखकाचं घर).

पु ल देशपांडे नवीन पिढीला माहित आहे असे म्हणता येईल, पण तसे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत नाही म्हणता येणार. नव्या पिढीला आचार्य अत्रे नावाच्या झंझावाताची थोडीफार कल्पना यावी याकरिता त्यांच्या नावाचे संकेतस्थळ(website) सुरु करायला हवे किंवा एखादा माहितीपट/चरित्रपट करायला हवा(असेल तर मला कल्पना नाही). जसे पु ल देशपांडे आणि गदिमा यांची संकेतस्थळे आहेत त्याच धर्तीवर. त्यामुळे रसिकांच्या मनात नक्कीच त्यांच्या स्मृती कायम राहतील आणि प्रेरणा देत राहील. आजचे प्रसिद्ध व्हिडियो समाज माध्यम Youtube वर चारी अत्रे यांच्या बद्दल बरेच साहित्य आहे.  दरवर्षी त्यांच्या जन्मगावी(सासवड) येथे त्यांच्या जयंतीच्या(१३ ऑगस्ट) निमित्ताने आचार्य अत्रे साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ती नक्कीच स्पृहणीय गोष्ट आहे.

ता. क. आज(सप्टेंबर ८, २०२०) कळले कि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित हुतात्मा हि कादंबरी खूप गाजली होती. त्यावर आधारित वेब मालिका देखील आली होती गेल्यावर्षी. त्याचे भाग मी पाहतो आहे, त्यात आचार्य अत्र्यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी चांगली आठवली आहे. ती मालिका जरूर पाहा.

लेखकाचं गाव लेखकाचं घर

आपल्याला वाचनाची, साहित्याची आवड असेल तर, आपल्या आवडत्या, प्रसिद्ध लेखकाबद्दल माहिती करून घेणे हे नक्कीच उत्सुकतेचे असते. मॅजेस्टिक प्रकाशनने खूप वर्षांपूर्वी लेखकाचे घर नावाचे पुस्तक प्रकशित केले होते. विख्यात लेखकांचा त्यांच्या वास्तूशी असलेल्या संबंध उलगडून दाखवावा, त्याच्या लेखनाशी घराचे असलेले नाते स्पष्ट करावे या उद्देशाने ललित मासिकात लेखमाला आली होती. त्यांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. त्यात प्रामुख्याने मराठीतील अनेक प्रथितयश लेखकांच्या घरांबद्दल मनोवेधक माहिती संकलित केली आहे. काही वर्षांपूर्वी गणपती पुळे येथे गेलो असता केशवसुत यांचे निवासस्थान पहिले होते.

या पुस्तकात अश्या २५-३० लेखकांच्या स्वकीयांनी, मित्रांनी घराचे, वास्तव्याचे वर्णन करणारे लेख लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ, माधव आचवल, माडगुळकर बंधू (त्यांची घरे म्हणजे पंचवटी, आणि अक्षर), प्रभाकर पाध्ये, मधू मंगेश कर्णिक, अनिल अवचट, जयवंत दळवी, इंदिरा संत, कुसुमाग्रज, गंगाधर गाडगीळ, यांच्या निवासस्थानांबद्द्ल वाचता येईल. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे यांच्या निवासस्थानाबद्द्ल का नाही हे समजले नाही. अरुणा ढेरे यांनी रा. चिं. ढेरे यांच्या घराबद्दल लिहिले आहे, ते आता संशोधन केंद्र झाले आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांच्या चरित्ररंग या पुस्तकातील काही लेख असेच काही लेखकांच्या घराबद्दल, गावाबद्दल लिहिले आहे. आणि तेही पाश्चात्य लेखकांच्या बद्दल. पाश्चात्य जगातील लेखकांच्या गावाबद्दल, घरांबद्दल असलेल्या पुस्तका असले तर मला तरी माहिती नाही. व्यंकटेश माडगुळकर हे किती विविधांगी लेखन करत याचा अनुभव प्रत्येक वेळेस त्यांचे एखादे नवीन पुस्तक हाती घेतल्यावर येतो. हे पुस्तक वाचले त्याचा प्रत्यय परत आला. तो खरे तर पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. त्या लेखांची विभागणी दोन भागात आहे. एका भागात त्यांच्या चित्रपट क्षेत्राशी निगडीत तीन चार आठवणी आहेत. आणखीन एका भागात त्यांनी तीन इंग्रजी लेखकांची आगळीवेगळी ओळख करून दिली आहे. त्या भागात अर्थात इतरही काही लेख आहेत जसे की चित्रकार देऊस्कर यांच्यावरील व्यक्तिचित्रणात्मक लेख.

माडगुळकर यांचे इंग्रजी वाचन देखील अर्थातच अफाट होते. त्यांनी चितारलेले हे तीन इंग्रजी लेखक म्हणजे Liam O’Flaherty, John Steinbeck, Kenneth Wilkie. मला यातील John Steinbeck फक्त माहिती होता, त्याची काही पुस्तके माझ्याकडे आहेत, काही वाचली आहेत. दुसरा Liam O’Flaherty हा कसा समुद्रकिनारी राहून तेथील प्राणी, पक्षी जीवन आपल्या कथा, कादंबऱ्यांत आणले आहे त्याच्याबद्दल आहे, आणि तिसरा लेख Kenneth Wilkie यांचे The van Gogh Assignment या पुस्तकाच्या निर्मितीची कथा, त्याच्याविषयीच्या लेखात आहे.

John Steinbeck च्या लेखात माडगुळकर त्याच्या अमेरिकेतील गावी दिलेल्या भेटीचे वर्णन करतात. John Steinbeck हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील Salinas ह्या गावी जन्माला, बराच काळ तेथेच त्याचे वास्तव्य होते. त्याच्या कादंबऱ्या ह्या सर्व त्याच भागात घडतात. मी देखील २००४ मध्ये कॅलिफोर्नियात गेलो असता, Salinas च्या आसपासच्या (Monterey Bay) भागाला भेट दिली होती. हा लेख वाचताना त्या सर्वांची मला परत आठवण झाली. त्या भेटीबद्दल मी येथे लिहिले आहे. माडगुळकर Salinas मधील त्याच्या घराला भेट देऊन आले.

Liam O’Flaherty वरील लेखात सुद्धा त्यांनी त्याचे आयर्लंड मधील समुद्रकिनारचे गाव, आणि त्याच्या कथा, कादंबऱ्यांतून तो आलेला परिसर यांचे छान वर्णन त्यांनी केले आहे. समुद्र, किनारा, तेथील प्राणी, पक्षी जीवन, हेच त्याचे विषय आहेत. याची कुठलीच पुस्तके माझ्या कडे अजून नाहीत, किंवा वाचली देखील नाही.

Vincent van Gogh वरील त्यांचा लेख म्हणजे त्याच्याविषयी Kenneth Wilkie याच्या शोधाच्या खटपटीचा धावता परिचय आहे, ज्यात Vincent van Gogh च्या वास्तव्याच्या विविध ठिकाणांची माहिती येते. उदाहरणार्थ Netherlands मधील Neunen या खेडेगावी जेथे तो दोन वर्षे राहिले, तेथे छानसे संग्रहालय आहे. तसेच Paris शहरातील एका इमारतीतील असलेले त्याचे वास्तव्य, तसेच लंडनमधील वास्तव्य, बेल्जिअम मधील त्याची वास्तव्याची ठिकाणे याबद्दल आले आहे. फ्रान्स मधील Arles गावातील त्याचे Yellow House नावाने प्रसिद्ध असलेले घर देखील Kenneth Wilkie ने पहिले.  माझ्याकडे Lust for Life नावाचे Irvine Stone लिखित Vincent van Gogh चे चरित्र आहे. मला vangoghroutes.com नावाची एक छान वेबसाईट सापडली . त्याच्या विविध वास्तव्याच्या ठिकाणची माहिती संकलित केली आहे.

असो. मी दोन-तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे गेलो असता Edgar Allan Poe या इंग्रजी कथाकाराचे निवासस्थान पहिले होते, त्याबद्दल येथे लिहिले आहे. फक्त लेखकांच्या घराचे कशाला, प्रसिद्ध व्यक्तीच्या घराबद्दल आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. जसे दिल्लीला गेलो असता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे घर, राष्ट्रपती भवन, मुंबईत चित्रपटसृष्टीतील ताऱ्यांची, तारकांची घरे, आणि इतर. हे सर्व पाहताना, वाचताना समृद्ध करणारे अनुभव देऊन जातात. सुप्रसिद्ध कन्नड लेखक कुवेंपू आणि शिवराम कारंथ यांची कर्नाटकातील निवासस्थाने(अनुक्रमे तीर्थहल्ली, पुत्तूर), शेक्सपिअरचे घर, रविन्द्रनाथ टागोर यांचे घर देखील पाहायला जायचे मनात आहे कितीतरी दिवसापासून, पाहुयात कसे काय जमते.

प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांचे पुण्याजवळ फलटण भागात विंचुर्णी गावात असलेले त्यांचे घर, घराशेजारी असलेले तळे वगैरे त्यांच्या विंचुर्णीचे धडे या पुस्तकातून वाचायला मिळते. पुणे आकाशवाणी वर नुकताच एक कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी निवेदिका गौरी लागू आणि इतर काही लेखिका हे सर्व विंचुर्णी येथे त्यांचे घर पाहायला गेले होते. तेथे गेल्यावर त्यांना काय दिसले, गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांतून आलेल्या विविध व्यक्तीरेखा, स्थळे, विंचुर्णीच्या घराचे बांधकाम चालू असतानाचे उल्लेख या सर्वांबद्दल प्रत्यक्ष भेटीवर चांगला तासभर कार्यक्रम केला.

तुमचे काय आठवणी, अनुभव आहेत अश्या लेखकांच्या घरांबद्दल, गावाबद्दल?

 

माझा वाचनप्रवास, भाग#१

ब्लॉगचे शीर्षक वाचून दचकू नका. मी काही फार मोठा वाचक वगैरे नाही(लेखक तर मुळीच नाही). साहित्याचे माझ्या जीवनात असलेले स्थान याबद्दलही लिहिणार नाहीये. वाचनप्रांतात थोडीफार लुडबुड करतो वेळ मिळेल तसा. आणि वाचलेल्या पुस्तकांबद्दल(तसेच इतर गोष्टींबद्दल) लिहायला आवडते, म्हणून लिहितोही. आज असेच मनात आले की आपण कधीपासून वाचायला लागलो, काय वाचले लहानपणी वगैरे. मग बसलो त्याबद्दलच लिहायला. हे एक प्रकारे स्मरणरंजनच(down the memory lane) म्हणा हवे तर.

मला आठवतय त्याप्रमाणे माझ्या घरी, अथवा आसपास वाचनसंस्कृती अशी काही गोष्ट अस्तित्वातच नव्हती. चाळीतील कनिष्ठ मध्यमवर्गीय जगणे. थोड्याफार अभ्यासाव्यतिरिक्त इतर मुलांबरोबर हूडपणा, व्रात्यपणा यातच वेळ जायचा. घरची परिस्थिती बेतासबात असल्यामुळे वर्तमानपत्र देखील अगदी कधीतरी येत असे. शाळेतही ग्रंथालय वगैरे नव्हते. पण झाले असे, आठवी-नववीत असताना माझा एक हात मोडला, आणि १५-२० दिवस जायबंदी झाला. शाळेला कित्येक दिवस दांडी झाली. तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे, जवळच एक छोटेखानी वाचनालय होते, ते लावले. आणि सुरु झाला आमचा वाचनप्रवास! ते चिंतामणी वाचनालय आणि तेथील उपाध्ये नावाचे गृहस्थ, अजून डोळ्यांसमोर आहे. या आधी मी ब्लॉगवर वाचनालयांवर एक लेख लिहिला होता.

अधून मधून वडील मुलांसाठी असलेली मासिके घरी आणायचे. जसे चांदोबा, चंपक, आनंद वगैरे वाचल्याचे आठवते. चांदोबा विशेष प्रिय, त्यातील विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टींसाठी. काही वर्षांपूर्वी तर मी चांदोबाचा collectors’ edition एक विकत घेतली, या आठवणींकरता. वाचनालयातल्या असलेले अमृत मासिक मला खूप आवडायचे, अजूनही मी ते केव्हातरी वाचत असतो. वाचनालयातच असलेली गुरुनाथ नाईक यांची पुस्तके माझ्या हाती लागली.युद्धस्य कथा रम्य: ह्या उक्ती प्रमाणे त्यांच्या त्या थरारकथा मनाची पकड घेत असत. मेजर भोसले, कप्तान दीप, भारत पाकिस्तान युद्ध, या नायकांच्या करामती, हे सर्व वाचताना मन रंगून जायचे. तेथेच मी रणजित देसाई यांची स्वामी, शिवाजी सावंत यांची पुस्तके वाचल्याचे आठवते. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ आणि इतर पुस्तके देखील वाचली. वाचनालयात बरीच मासिकेही असत, त्यातील देखील किर्लोस्कर, मनोहर सारखी मासिके, साप्ताहिक स्वराज्य सारखी साप्ताहिके वाचायला मिळत. त्याच सुमारास, किंवा थोडे आधी असेल, समोर पाठक म्हणून कुटुंब राहत असे. त्यांच्याकडे असलेली सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविशी सारखी पुस्तके वाचल्याचे आठवते. नंतर दहावीत गेल्यावर दहावीचे वर्ष, म्हणून, अभ्यासावर लक्ष असावे, यासाठी, वाचनालयाची वर्गणी बंद झाली आणि वाचन बंद झाले. अर्थात हे सगळं फुटकळ वाचनच होतं.

अकरावीत असताना घरी नको त्या वयात नको ते पुस्तक हाती लागले. काही दिवस मनाची चाळवाचाळव, आजूबाजूला असलेल्या मोठ्या लोकांकडे पाहताना माझी मलाच वाटलेली शरम, हे सगळे अजून आठवते. काही दिवसांनी ते पुस्तक घरातून गायब झाले आणि मी परत मार्गाला लागलो! त्याच सुमारास घरी कन्नड मासिके, जशी तुषार, तरंग, सुधा अशी मासिके यायला लागली. नुकतेच आईकडून कन्नड वाचायला शिकलो होतो, त्यामुळे ही मासिके वाचायला आवडू लागले. या व्यतिरिक, नंतर कॉलेजमध्ये असताना विशेष वाचनप्रेम जडले नाहीच, का कोणास ठाऊक. तरी बरं त्यावेळेस आम्ही मित्रांनी पुण्यातील प्रसिद्ध अश्या ब्रिटीश लायब्ररी(British Library) नाव नोंदवले होते. पण आमचे उदिष्ट वेगळे होते, ते म्हणजे, संगणकविषयक पुस्तके वाचण्यासाठी, संदर्भासाठी. त्यामुळे की काय काही अपवाद(जॉर्ज ऑर्वेल(George Orwell), पी. जी. वोडहाउस(P G Wodehouse)ची पुस्तके, तसेच क्रिकेटची आवड असल्यामुळे Bob Willis चे Fast Bowling हे पुस्तक) वगळता त्यांच्याकडे असलेल्या इंग्रजी साहित्याच्या खजिन्याकडे कधी लक्षच गेले नाही. माझ्या एका मित्राला इंग्रजी पुस्तके वाचण्याचा नाद होता. एकदा मी त्याच्याकडून घेवून Robin Cook चे Coma हे पुस्तक वाचल्याचे आठवते. कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी अशी जी पुस्तके असत, त्यातील काही विकत घेतली होती. पण तेवढेच.

पुढे कॉलेज संपून नोकरी सुरु केली, तरी सुद्धा माझी वाचनाची गाडी पुढे सरकेना. कामातच इतका गुरफटून गेलो होतो. फक्त एक अपवाद-एकदा एका सहकाऱ्याकडे Frederick Forsyth चे Fist of God हे पुस्तक पहिले, आणि ते वाचल्याचे आठवते. ते पुस्तक माझ्याकडेच राहिले, आणि आजही ते आहे. नंतर मी अमेरिकेत गेलो, तेव्हा जाताना स्वयंपाक हे सिंधुताई साठे यांचे पुस्तक विकत घेतले. हे माझे विकत घेतलेले पहिले मराठी पुस्तक! तेथे गेल्यावर तेथील वाचनालयांची श्रीमंती पाहिली. एका वेळेस १०-१५ पुस्तके/मासिके घरी घेवून जाता येत असत. तेथे बरीच पुस्तके वाचली, त्यातील प्रामुख्याने पर्यटनावरील, इतिहास यावरील. अजूनही साहित्याची गोडी लागली नव्हती. वाचनाने महत्व समजत होते. कामाचा भाग म्हणून, तसेच इतर तत्सम अशी पुस्तके वाचत होतो, विकत घेत होतो. पण निखळ साहित्य, म्हणजे कथा, कादंबरी, कविता यांचे विश्व अजून खुणावत नव्हतेच. त्या दृष्टीने करंटेच राहिलो.

काही वर्षांनतर पुण्यात परतलो. हिंडण्या-फिरण्याचा, भारताचा इतिहास जाणून घेण्याचा छंद जडला होता(Indology च्या नादाने). त्यानिमित्ताने पुस्तके विकत घेण्याचा, वाचण्याचा सपाटा सुरु झाला. दिवाळी अंक घेऊ लागलो आणि त्यामुळेही मराठी साहित्यविश्वाची ओळख होत गेली. नाटकं, त्यातही, प्रायोगिक नाटके पाहण्याचा नाद लागला. त्यानिमित्ताने देखील पुस्तके घेण्याचा, पुस्तक प्रदर्शनात जावू लागलो. हळू एक एक करत, कथा, कादंबऱ्याकडे ओढला गेलोच शेवटी. पुण्यातील Institution of Engineers हे इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन भरवणारे प्रसिद्ध स्थळ. तेथेही हळू-हळू इंग्रजी साहित्यामध्ये, सुरुवात, science fiction ने(Robot Vision-Issac Asimov, The Nuclear Age-Tim O’Brian) होत, अडकू लागलो. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी यांची पुस्तके, शामची आई, माडगुळकर यांची बनगरवाडी, माणदेशी माणसे, विश्राम बेडेकर यांचे नाटक टिळक आणि आगरकर, रा. चिं. ढेरे यांचे लज्जागौरी इत्यादी. त्याचवेळेस चिंचवड गावातील वाचनालयातून प्रभुदेसाई यांचा देविकोश हाती लागला. मग अमरेंद्र गाडगीळ यांचा गणेशकोश सापडला. त्याच सुमारास एका मित्राकडून भारतीय दर्शन की रूपरेखा हे हिंदी पुस्तक हातात पडले आणि भारतीय दर्शन म्हणजे काय हे समजले. नंतर मी भरतविद्या(Indology) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर तर त्या विषयाची बरीच पुस्तके घेतली, वाचली, अजूनही चालूच आहे.

माझ्या वाचनप्रवासातील या पुढची वाटचाल नंतर कधी तरी, याच ठिकाणी!

 

 

दि बा मोकाशी यांच्या कथा

परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रात्रीच्या मुक्कामासाठी बरोबर मोकाशी यांचे पुस्तक नेले होते. त्यातील ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा वाचत होतो आणि तिने मला खिळवून ठेवले. त्यात एकाच्या मुलाच्या मृत्यनंतर निर्माण झालेल्या मानसिक अवस्थेचे वर्णन, आणि समांतर अशी दुसरी घटना, जेथे एक गाय व्यायते आहे, अडली आहे, आणि त्यावेळेस होणाऱ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे, ताण-तणाव यांचे वर्णन असलेली ही कथा न संपवता झोपूच शकलो नाही. गेली ७-८ वर्षे मी मोकाशी यांची पुस्तके जमेल तशी मिळवून वाचतोय. त्यांचा परिचय मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रांच्या संग्रहाचे खंड वाचताना झाला. त्यात त्यांनी मोकाशी यांच्या कथा, लघुकथा याबाबतीत अनुकूल मत(जे अतिशय दुर्मिळ आहे) नोंदवले होते. मला वाटते त्यांनी ‘देव चालले’ या पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यामुळे खरे तर त्यांच्या पुस्तकांकडे वळण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात त्यांचे ‘जरा जाऊन येतो’ हे पुस्तक हाती लागले होते. त्यातीलच वर उल्लेखलेली कथा आहे. हा कथा संग्रहच आहे, पण तो सरोजिनी बाबर यांनी निवडलेल्या कथांचा. त्या आधी कुठे प्रकाशित झाल्या होत्या की काय याचा उल्लेख नाही. हे जरा वेगळेच वाटले. आधी वाचलेले कथासंग्रह मोकाशी यांनीच तयार केलेले होते. परत या संग्रहाला सरोजिनी बाबर यांची छान प्रस्तावना आहे. १९८७ मध्ये प्रकाशीत झालेल्या या पुस्तकाचे निमित्त काय होते हेही समजले नाही. पण प्रस्तावनेतून त्यांच्या बाबतीत, तसेच त्यांची जडण घडण कशी झाली हे समजते.

ते कायम पुण्यात राहिले, त्यांचा छोटासा स्वतंत्र व्यवसाय होता. १९३८-८१ या काळातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवनानुभव यावर सहसा आधारित या कथा आहेत. अतिशय तरल, ललित लेखनाच्या अंगाने जाणाऱ्या, वेगवेगळया शैलीचे घडवणाऱ्या, अतिशय छोट्या छोट्या विषयांच्या, किंवा शुल्लकशा अश्या विषयांच्या आसपास फिरणाऱ्या या कथा आहेत. उदा. ‘आपला-तुपला चहा’ या कथेत विषय असा आहे की एका व्यक्तीला महिनाभर वस्तीला आलेल्या पाहुण्यांनी जेरीस आणले असते. ते बाहेर गेल्यानंतर, त्याला हवा असलेल्या एकांत मिळालेला असतो, पण तो अनुभवता त्याची मानसिक अवस्था म्हणजे ही कथा. ह्या संग्रहात ‘वाया दिवस बालपणीचे’, तसेच ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हे दोन ललितलेखही आहे, ते या कथासंग्रहात कसा आला हे समजत नाही, पण हरकत नाही. ‘डोंगर चढण्याचा दिवस’ हा लेख वाचून माझ्या सारख्या कायम डोंगर-किल्ले चढणाऱ्याला गंमत वाटली. मीही माझ्या ट्रेकिंगचे अनुभव लिहीत असतो, इतरांचे लेख वाचत असतो, पण हे अगदी वेगळेच वाटले.

२०१५ साल हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यावर्षी अंतर्नाद मासिकाच्या दिवाळी अंकात मोकाशी यांच्या पत्नीनी लिहिलेल्या आठवणीचा लेख आला आहे. तो त्यांनी दि बा मोकाशी यांच्या मृत्युनंतर १२ वर्षांनी लिहिला होता(१९८१ मध्ये मोकाशी गेले, लेख १९९३चा आहे, आणि १९९४ मध्ये त्यांच्या पत्नीदेखील निर्वतल्या). त्यांच्या मुलीने तो लेख मासिकासाठी दिला होता. तसेच मासिकाने कथा स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्यांच्या पत्नीच्या लेखात सहजीवनाच्या, कथांच्या जन्माच्या, त्यांच्या लकबी, सवयी इत्यादींचे वर्णन आहे. मी सुरुवातीला उल्लेखलेल्या कथेचे बीज त्यांनी चौक गावात अनुभवलेल्या एका घटनेचे रूपं होते हे (आता परत) वाचून गंमत वाटली. या संग्रहात ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ नावाची एक  गमतीदार कथा, ज्यात, एकाचे गोष्ट सांगणे विविध कारणांमुळे अडते, अडखळते, आणि ती सांगून संपवणे होतच नाही. ह्या कथेचे मूळ मोकाशी पती-पत्नी यांच्या एका हट्टात, खटक्यात आहे हे नमूद केले आहे. पण मला ती गोष्ट, म्हणजे रोमच्या सुताराची, पूर्णपणे काय आहे हे माहीत नाही.

त्यांची इतर काही पुस्तकं मी वाचली आहेत. आदिकथा, वणवा, अठरा लक्ष पावलं इत्यादी. त्यांच्याबद्दल लिहीन कधीतरी परत. पण जी ए कुलकर्णी यांनी प्रशंसलेली ‘देव चालले’ हे पुस्तक काही मिळत नाहीये अजून. त्यांचे अजून एक पुस्तक म्हणजे वात्सायन ही कादंबरी, जी त्याच्या जीवनाचा पट मांडते, तसेच त्याने कामसुत्रे कशी कशी लिहिली याचा देखील तो पट आहे. दि बा मोकाशी यांची कायमच स्त्री पुरुष यांच्या भावविश्वाचा, सहजीवनाचा वेध त्यांनी  त्यांच्या कथांतून घेतलेला आहे. या दृष्टीकोनातून हे पुस्तक वाचायला हवे. पाहुयात कसे जमते ते.