Dance of the wind

मी आजारी असल्यामुळे ऑफिसला दांडी मरून घरीच राहिलो होतो. अशा वेळी झोपून झोपून तरी किती झोपणार? लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे! आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय? म्हटले जरा पाहुयात. पण प्रत्यक्षात, तो संपूर्ण पाहून मगच उठलो.

किटू गिडवानीला किती दिवसांनी पहिले होते. हो, तीच ती, दूरदर्शन मालिकांमधून काम करणारी. नंतर खूप अशी तीला सिनेमात पाहिलेले आठवत नाही. गोविंद निहलानी यांच्या रुक्मावती की हवेली मध्ये होती. Dance of the wind समोर चालू होता, काहीतरी गंभीर दृश्य चालू होते. किटू गिडवानीचीच प्रमुख भूमिका होती. ती एक गायिका होती त्यात, तेही तिचा आवाज गमावलेली. ही गायिका(नाव पल्लवी) म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारी गायिका. गुरुकडे(जी तिची आईच असते) समोरासमोर बसून गाण्याचे धडे ही गायिका घेते आहे, त्यातील विविध बारकावे घोटून घेणे चालू आहे. आपल्या भारतीय संगीत शिक्षणाचे, तालमीची वैशिष्ट्ये दर्शवाणारी ती दृश्ये. गुरु आपल्या शिष्याला मृत्यू जवळ आल्याची, चाहूल झाल्याची सूचना देते. एका जाहीर संगीत कार्यक्रमात, गाणे सुरु करण्यापूर्वी जे काही क्षण असतात, ते छान दाखवले आहे. पण तेथे गायिकेचा आवाज लागत नाही, कारण, आपल्याला असे समजते की गुरूच्या मृत्यूमुळे भावविवश झाल्यामुळे असे झाले असावे.

IMG_1292

Kitu Gidwani, Dance of the Wind

k

Kitu Gidwani, Dance of the Wind

पुढे काही कारणाने, तिचा आवाज पूर्णपणे जातो, कारकीर्द उध्वस्त होते-गाता येत नाही, गाणे शिकवता येत नाही. मानसिक रित्या खच्चीकरण होते, तिची तळमळ, हा सगळं प्रवास किटू गिडवानीने छान रंगवला आहे. ओघाने येणारी गाणी, विविध धून, प्रसंगानुरूप हे सर्व एक छान दृक्‌श्राव्य अनुभूती देतात. ह्या गायिकेला आपला आवाज परत गवसतो हे नंतरच्या ६०-७० मिनिटात उलगडते. चित्रपटाला एक अध्यात्माची, दैवी चमत्काराची किनार आहे. शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म यांचा घनिष्ट संबंध आहे, हे मान्य. पण चित्रपटात येणारी लहान मुलगी, तारा, आणि तिचे गाणे, तिचा वावर हे का आणि कसे सांगता येत नाही. ही गायिका आपल्या आईच्या गुरुकडे, जे अर्थात अतिशय वयोवृद्ध असतात, त्यांचा शोध घेत त्यांना भेटते. त्यांचा देखील आवाज नसतो. पालवीची त्यांच्याकडून गंडा बांधून घेऊन शिकण्याची इच्छा ते धुडकावून लावतात. पण त्यांच्या आणि त्या लहानग्या मुलीच्या सान्निध्यात तीला आपला हरवलेला आवाज गवसतो अशी ही कथा आहे. तर सकाळी सकाळी हा असा शास्त्रीय गाण्यांच्या धुनानी भरपूर, असा, अध्यात्मिक अनुभव देणारा, आणि बऱ्याच वर्षांनी किटू गिडवानीला पाहिल्यामुळे, एकदम मस्त वाटले. इतक्यातच जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले, त्यामुळे मौखिक गुरु-शिष्य परंपरेने शिकलेल्या, शिकवण्याऱ्या त्या होत्या. शेवटी Dance of the wind या नावाबद्दल. काय असावा अर्थ याचा? मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा? इंटरनेट वर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची(राजन खोसा) एक साईट आहे, त्यात त्यांनी ह्या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी नमूद केली आहे. ती छान आहे वाचायला. त्यात त्यांनी लिहिले आहे, की शुभा मुदगल यांना ह्या चित्रपटाच्या कथेत आपली स्वतःची कहाणी दिसली.

असो. बराच जुना, म्हणजे, १९९७ मधील हा सिनेमा आहे. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे पार्श्वसंगीत आहे. हा बहुतेक पाश्चिमात्य देशातील लोकांसाठी बनवला गेला असलेला सिनेमा असला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीतून समजते की जर्मन संस्था, भारतातील NFDC, आणि इतर काही संस्थांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. शास्त्रीय संगीत परंपरेवर हिंदी आणि इतर भारतीय भाषेत तसे बरेच सिनेमे आहेत. हा थोडासा वेगळाच म्हटला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राने एक लघुपट बनवला होता, त्याचा विषय सुद्धा गाणे हाच होता, एका वृद्धाच्या जीवनात एकाकी पण आल्यामुळे, जीवन संपवण्याचा निर्णय तो बदलतो, का तर, त्याचे गाणे ऐकून रस्त्यावरील एक लहानगी त्याच्या पित्याबरोबर गाणे शिकायला येते. त्याबद्दल मी लिहिन कधीतरी.

 

 

पेस्तोनजी आणि पारसी समाज

अमेरिकेसारखा, भारत, हा देखील निर्वासितांचा(migrants) देश म्हणायला हरकत नाही, असे एकूण इतिहासाकडे पहिले तर लक्षात येते. फरक एवढाच आहे, भारतात ते कित्येक हजार वर्षांपासून चालू आहे, अमेरिकेत ही लाट गेल्या काही शतकातील. दुसरा एक फरक असा की निर्वासितांनी अमेरिकेवर राज्य केले अशी उदाहरणे कमीच, पण भारतात ती मात्र भरपूर आहेत. मोगल असतील, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच असतील, सर्वानी कित्येक वर्षे राज्य केले. त्या आधी कुशाण वगैरे लोकांनी देखील राज्य केले. आर्य इथलेच की बाहेरचे हा वाद आहेच. पण ते जर बाहेरचे, निर्वासित असे समजले तर, त्यांनी देखील राज्य केले असे दिसते. पण हे सर्व समाज, निर्वासित, भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत असे दिसते. निर्वासितांची अलीकडचे उदाहरण म्हणजे सिंधी समाज. सिंधी समाज भारताच्या फाळणीनंतर, पाकिस्तानात देलेल्या सिंध प्रांताचे लोक. गेली ७० वर्षे ते येथे राहत आहेत, आणि भारतीय समजाशी एकरूप झाले आहेत. असेच भारतीय मातीशी एकरूप झालेले दुसरे उदाहरण म्हणजे पारसी समाज. पण त्याच बरोबर त्यांनी आपली संस्कृती, वेगळेपण निकाराने जपून ठेवले आहे.

हे सर्व आठवायचे कारण म्हणजे नुकताच पाहिलेला विजया मेहता दिग्दर्शित पेस्तोनजी हा सिनेमा. हा जुना(१९८०च्या दशकातील) सिनेमा आहे, आणि पाहायचे राहून गेले होते. आणि गंमत त्यात १९५०-६० चा काळातील पारसी समाजाचे चित्रण आहे, तेही मुंबईतील. पारसी समाजाचा भारतातील इतिहास बऱ्यापैकी लिहून झाला आहे, त्याची माहितीही इतरत्र भरपूर आहे. पारसी समाजातील व्यक्तींचे चित्रण आपल्याला चित्रपटात दिसते, पण ते अनुषंगिक असे असते, आणि बऱ्याच वेळेस विनोद-निर्मिती साठी योजलेली पात्रे असतात. साहित्यामध्येही पारसी व्यक्तीचित्रण दिसते. उदा. पु. ल. देशपांडे यांचा पेस्तन काका, वसंत सरवटे यांच्या सहप्रवासी या पुस्तकातील सोहराब जमशेदजी बालपोडीवाला वगैरे. खरे तर सरवटे यांनी अजून एक प्रसिद् पारसी व्यक्ती केकी मूस या विलक्षण छायाचित्रकारवर देखील लेख त्यात लिहिला आहे. पेस्तोनजी हा सिनेमा पारसी समाजाचे, त्यांच्या संस्कृतीचे, स्वभाव-वैशिष्ट्यांचे कथारूप चित्रण करतो. चित्रपटाच्या प्रसारणा दरम्यान अधूनमधून विजयाबाईं त्याबद्दल बोलत होत्या. त्यात त्या एकदा म्हणतात की त्यांना National Film Development Corporation(NFDC) चे संचालक काकांजीया यांनी दिलेल्या लघुकथेवर चित्रपट बेतला आहे. मला थोडे आश्चर्य वाटले. पु. ल. देशपांडे यांनी पारसी  व्यक्तीचित्रण करून ठेवले आहे, आणि ते नुसते विनोदी ढंगाने नाही. विजयाबाईंना त्यांच्या साहित्याची नक्कीच माहिती असणार आहे. त्यावरून चित्रपट करावा असे का नाही सुचले.

ते असो. पण चित्रपट अतिशय सुंदर आहे. नसिरुद्दीन शहाने साकारालेली फिरोजची भूमिका, बोलणे, लकबी अतिशय छान. डोळे वारंवार मिचकावणे, एका विशिष्ट पद्धतीने बाक काढून चालणे वगैरे अतिशय छान.

त्याच्याबरोबर शबाना आझमी, अनुपान खेर  यांच्या देखील भूमिका आहेत. त्यांनी देखील सुंदर वठवलेल्या आहेत त्यांच्या भूमिका. एक वेळ असे वाटून गेले की अनुपमच्या एवजी देवेन वर्मा जर, पेसीच्या असता तर आणखी धमाल आली असती. बाकी सर्व कलाकार म्हणे पारसी व्यक्तीच आहेत. चित्रीकरण स्थळे देखील अगदी त्यावेळच्या पारसी घरात असल्यामुळे पाहायला छान वाटते. NFDCचा सिनेमा असूनदेखील, documentation सिनेमा झाला नाही. चंदू पारखी ह्या गुणी नटाची देखील मुंबईतील घरगड्याची छानशी भूमिका त्यात आहे. पारसी व्यक्तीचा पेहराव, बोलणे-चालणे, इतर रिती-रिवाज, स्वभाव-वैशिष्ट्ये, गुजराती, मराठी ढंगाचे बोलणे, हे सर्व पाहताना मजा येते. हा सिनेमा खरे तर दोन मित्रांची(पेसी आणि फिरोज) कथा आहे, दोघेही अतिशय विरुद्ध स्वभावाचे. पण त्याही पेक्षा १९५०च्या दशकातील मुंबईतील पारसी समाजाची वैशिष्ट्ये सांगणार, त्या काळात घेवून जाणारा हा सिनेमा आहे.

पारसी समजाने दिलेले योगदान सुप्रसिद्ध आहे. व्यवसाय असो, नाट्यक्षेत्र असो, लष्कर असो, राजकारण, सामाजिक कार्य असो. तसेच हा समाज फक्त मुंबईच नाही. दिव-दमण भागात ते आहेत, महाबळेश्वर, पाचगणी भागात आहेत. पुण्यातही आहेत. मला तर साताऱ्याजवळ असलेल्या पांडवगड या किल्ल्यावर एक पारसी राहत असलेला दिसला. सह्याद्रीमधील एका सुळक्याचे नावच खडा पारशी असे आहे. इंडोलॉजीचा अभ्यास करताना समजले की वेद आणि पारसी समाजाचे घर्मग्रंथ अवेस्ता यात संबंध आहे. तेव्हापासून तर आणखीनच उत्सुकता वाटत राहिली आहे. ह्या समाजाची घटती लोकसंख्या, जी एक मोठी चिंतेची, त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने, बाब आहे.

Short films fad?

As the saying goes, “The drama which we see when we are asleep is dream, and dream which we witness when we are awake is drama”, film media is amazing mode of communication, entertainment, and even education, awareness. We all have experienced its power and impact it makes on the society. Due to digital, Internet and smart phone revolution, making movies has become easier, particularly short films. Short films were always there in the past too. We have seen documentaries produced by mainly National Films Division Corp(NFDC), which are shown in theaters or television channels. Short film revolution has been occurring since last 10-15 years silently, because of smart phones, cameras, social media and YouTube, and because of common and lay persons are experimenting with this media to express themselves.

I remember watching Atul Pethe’s short film on plight of municipal corporation’s sanitary workers, called Kacharakondi(Garbage Trap) way back in 2006, which was posted on YouTube. To promote short film making, we also are witnessing mushrooming of platforms such as short film festivals. Many of them are theme based such as Kirloskar Vasundhara Film Festival(KVIFF) which is focused on environmental issues. In the past, on this blog, I have talked about my friend and his son, interested in solving water issues, made and presented short films in KVIFF’s earlier edition. I have attended KVIFF few times and quality of films is very high. I also have attended other short film festivals which are mainly organized by film and media institutes to show case their students talents and give them exposure to come out with their best. There you see many topics getting handled, experimented with media, and also art of story telling. I believe even short film festivals are taking place on Internet also via mediums such as YouTube, and some TV channels have created special slots for short film showcase.

We also have seen in general mushrooming film/movies related training institutes claiming to cover various aspects of film making. Satellite TV channels also have played their part to draw general people to go for film industry via route of getting associated with short films in one way or the other. I know at least two of my friends who are seriously considering doing films full time. They have got themselves trained on aspects such script writing, direction. They have stories and scripts which they have made short films on frugal budget. One of them has already left his IT job and has plunged into this to pursue his passion. The other person, who happens to be my colleague at SAA YCM SHSG, wanting to make a film on mental health domain. This is certainly good for film industry in general, as it is bringing in more and more talent to it, with willingness to experiment with the medium and also bringing in wide variety of subjects to the table. So this short film revolution is certainly not a fad, but it is something to stay here.

One interesting piece of fact about short films, before I conclude. When the technique of film making was invented in early 19th century, the films which were made can be called short films as they used to be less than hour in the length. It took quite a while to make a movie which ran over an hour.

So, are we going to back to where we began?

Update on Nov 19, 2015:

My friend Achyut Chopade who ventured into film-making, won a best short film award recently for his film ‘Ardhaviram’.